शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

...एकनाथ शिंदेंच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का ? राष्ट्रवादीचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 18:00 IST

'एकनाथ शिंदेंना उध्दव ठाकरे यांनी मानसन्मान दिला मात्र मुख्यमंत्रीपदावर बसूनदेखील त्यांना भाजपच्या इशाऱ्यावर चालावे लागते.'

मुंबई- सत्तांतराचे बंड यशस्वी झाले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती, या दिपक केसरकरांच्या वक्तव्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात झालेल्या सर्वात मोठ्या सत्तांतराच्या नाट्यमय घटनाबाबत काही गोष्टींचा खुलासा मंत्री दीपक केसरकर यांनी नुकताच प्रसारमाध्यमांसमोर केला, त्यावर बोलताना महेश तपासे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना परमेश्वर दीर्घायुष्य देवो, परंतु ज्यापद्धतीने दीपक केसरकर यांनी बंडाबाबत काही गोष्टींचा खुलासा केला व बंड अयशस्वी झाल्यास काय झाले असते असे सांगितले, त्यातून स्वाभाविकच काही प्रश्न निर्माण होतात, असेही महेश तपासे म्हणाले. एकेकाळी अमर्यादित असे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होते. ते ठरवतील ती पूर्व दिशा, एवढा मान उध्दव ठाकरे कुटुंबाने दिला होता याची आठवणही महेश तपासे यांनी करून दिली आहे. 

आज मात्र एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर बसून देखील भाजपच्या इशाऱ्यावर चालावे लागते आहे, ही शोकांतिका आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत किती जागा शिंदे गटाला मिळतील याबाबत एकनाथ शिंदेंच्या आमदारांना व खासदारांनाच खात्री नाही, असेही महेश तपासे म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पूर्णपणे असहकार्याची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने 'राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' अशी ठळक जाहिरात वर्तमानपत्रात करुन भाजपला अंगावर घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसऱ्या दिवशीच जाहिरातीचा मजकूर बदलवून घ्यावा लागला, इतका दबाव भाजपने मुख्यमंत्र्यांवर आणल्याचे चित्र होते. 

मंत्रिमंडळाचा विस्तार असो की, इतर कुठल्याही महत्वपूर्ण बाबींचे निर्णय असो, तेथे केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी हिरवा कंदील दाखवल्याशिवाय मुख्यमंत्री महोदयांना निर्णय घेता येऊ शकत नाही, हे सध्या महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत आहे, असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला. बंडाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या मनावर नक्कीच दडपण असू शकेल, परंतु त्यापेक्षा मोठा दबाव आज भाजपचा आहे, हे कोणी नाकारू शकत नाही असेही महेश तपासे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना