शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

"मनसुख हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना आधीच माहिती होतं की नव्हतं?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 14:06 IST

अनिल देशमुख हे वारंवार देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत आहेत त्याला आज फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. 

मुंबई - मनसुख हिरेन हत्येवरून देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहे. मनसुख हिरेनची हत्या होणार हे त्यांना माहिती होतं की नव्हतं या प्रश्नाचं उत्तर अनिल देशमुखांनी द्यावे असं फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यामुळे मविआ काळात घडलेले मनसुख हिरेन हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनिल देशमुख प्रकरणावर आपण जर कोर्टाचे निर्णय वाचला तर अनिल देशमुखांवर आरोप लावणारे त्यांचे पोलीस आयुक्त, ते गृहमंत्री आणि मी विरोधी पक्षनेता. देशमुखांवरील आरोपाची दखल कोर्टाचे मुख्य न्यायाधीश घेतात. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. पोलीस गुन्ह्याचा तपास नीट करत नाही त्यामुळे तपास सीबीआयला द्या असं कोर्ट सांगते, मग गुन्ह्याचा तपास सीबीआय करते. हे सगळे घडते त्यांचे सरकार असताना...आम्ही विरोधी पक्षात होतो. माझा एकच सवाल आहे. ते उत्तर देणार नाही. मनसुख हिरेनची हत्या होणार आहे हे त्यांना माहिती होतं की नव्हतं, याचे उत्तर अनिल देशमुखांनी द्यावे, बाकी मी काही विचारत नाही असं फडणवीसांनी म्हटलं. एबीपी माझाच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

तसेच खरं बोलायला विचार करावा लागत नाही. खोटं बोलायला विचार करावा लागतो आणि खोट्याचा पर्दाफाश होतो. अनिल देशमुखांनी परवा ट्विट करून त्यांना जेलमध्ये किती त्रास झाला हे सांगितले. नोव्हेंबर २०२२ ला ते जेलमध्ये गेले, ११ महिने ते जेलमध्ये होते त्यात ८ महिने त्यांचे सरकार होते. मग जेलमध्ये त्यांच्या सरकारने त्रास दिला का...अनिल देशमुख यांनी आत्ताच हे बोलणे का सुरू केले. काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरे गट यांचा एकत्रित थिंक टँक आहे. त्यांनी स्ट्रॅटर्जी तयार केली त्यात देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिना करायची तर आपण भाजपाला रोखू शकतो, मग अचानक एकेदिवशी कपोलकल्पित कथा अनिल देशमुखांनी सुरू केली. मग त्यातून पुस्तक लिहिलं असा आरोपही फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केला. 

दरम्यान, मी सदनात सांगितले, मनसुख हिरेनला गायब करण्यात आले आहे. त्याची हत्या होऊ शकते अशी शंका उपस्थित केली. त्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. माझं स्पष्ट मत आहे, मनसुख हिरेनची हत्या होणार हे माहिती होतं की नव्हते त्याचे उत्तर कधीतरी द्यावे लागेल. ते योग्यवेळी येईल. निवडणूक सुरू आहे. काही बोलले तरी त्याला राजकीय रंग येईल. चांदिवालांनी जर अनिल देशमुखांना क्लिनचिट दिली होती तर हा रिपोर्ट आमच्यासमोर थोडी आला. चांदिवाल आयोगाचा रिपोर्ट उद्धव ठाकरेंना सुपूर्द केला होता. मग का बरं त्यावर कार्यवाही झाली नाही..जर क्लिनचिट आली होती मग तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी लगेच घोषणा करून टाकायला हवी होती. पण नाही केली. हा रिपोर्ट माझ्याकडे आला नाही. त्यावेळी ती कार्यवाही होऊन हा रिपोर्ट सामान्य प्रशासन विभागाकडे गेला, तो गृहमंत्रालयाकडे नाही असा खुलासा करत फडणवीसांनी चांदिवाल आयोगावरून ठाकरे-देशमुखांना दोषी ठरलं.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Deshmukhअनिल देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरेMansukh Hirenमनसुख हिरण