शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

धारावीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना सुरुंग लावणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 14:11 IST

अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेला धारावी मतदारसंघ १९८० पासून,१९९५ सोडले तर सलग काँग्रेसच्या ताब्यात आहे.

मुंबई - अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे वारे हळूहळू वाहू लागले आहे. आशिया खंडातील सर्वत मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत, विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची जोरदार तयारी सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या चार विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात पुन्हा काँग्रेस आणि शिवसेनेत लढाई होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर यावेळी तरी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना सुरुंग लावणार का अशी चर्चा मतदारसंघात पहायला मिळत आहे.

अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेला धारावी मतदारसंघ १९८० पासून,१९९५ सोडले तर सलग काँग्रेसच्या ताब्यात आहे. आघाडीत काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ युतीत शिवसेनेला सोडलेला आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी काँग्रेस विरोधात शिवसेना हा संघर्ष विधानसभा निवडणुकीत पहायला मिळत असते. काँग्रेसच्या विद्यमान आमदार वर्षा गायकवाड ह्या सलग तीन वेळापासून या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. मात्र गेल्यावेळी वेगवेगेळे लढणाऱ्या भाजप-शिवसेनेत यावेळी युती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. त्यामुळे २०१४ मध्ये १५ हजार ३२८ मतांनी पराभव स्वीकारावा लागणाऱ्या शिवसेने सोबत यावेळी भाजपची ताकद असणार आहे.

सत्तेवर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावीचा पुनर्विकास प्राधान्याने केला जाईल, असं स्पष्ट केलं होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाहीत. त्यामुळे युतीवर मतदारांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आमदार गायकवाड मतदार संघाच्या विकासाकडे लक्ष दिलं नसल्याचाही आरोप जनतेतून होताना दिसतोय. त्यामुळे मतदारांची नाराजी दूर करण्याचे आव्हान दोन्ही पक्षासमोर असणार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसमधुन विद्यामान आमदार वर्षा गायकवाड यांचे नाव अंतिम समजले जात आहे. तर युतीत सेनेकडून बाबुराव माने यांनी पुन्हा कंबर कसली आहे. गेल्यावेळी माने यांचा १५ हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव झाला होता. त्याच बरोबर सेनेतून मनोहर रायबागे हे देखील इच्छुक आहेत. युती झाली आणि नाही झाली तरीही प्रत्येकवेळी काँग्रेस आणि सेनेतच खरी लढत या मतदारसंघात पहायला मिळत असते. त्यामुळे यावेळी तरी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला शिवसेना सुरुंग लावणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.