शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

धारावीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना सुरुंग लावणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 14:11 IST

अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेला धारावी मतदारसंघ १९८० पासून,१९९५ सोडले तर सलग काँग्रेसच्या ताब्यात आहे.

मुंबई - अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे वारे हळूहळू वाहू लागले आहे. आशिया खंडातील सर्वत मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत, विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची जोरदार तयारी सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या चार विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात पुन्हा काँग्रेस आणि शिवसेनेत लढाई होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर यावेळी तरी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना सुरुंग लावणार का अशी चर्चा मतदारसंघात पहायला मिळत आहे.

अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेला धारावी मतदारसंघ १९८० पासून,१९९५ सोडले तर सलग काँग्रेसच्या ताब्यात आहे. आघाडीत काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ युतीत शिवसेनेला सोडलेला आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी काँग्रेस विरोधात शिवसेना हा संघर्ष विधानसभा निवडणुकीत पहायला मिळत असते. काँग्रेसच्या विद्यमान आमदार वर्षा गायकवाड ह्या सलग तीन वेळापासून या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. मात्र गेल्यावेळी वेगवेगेळे लढणाऱ्या भाजप-शिवसेनेत यावेळी युती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. त्यामुळे २०१४ मध्ये १५ हजार ३२८ मतांनी पराभव स्वीकारावा लागणाऱ्या शिवसेने सोबत यावेळी भाजपची ताकद असणार आहे.

सत्तेवर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावीचा पुनर्विकास प्राधान्याने केला जाईल, असं स्पष्ट केलं होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाहीत. त्यामुळे युतीवर मतदारांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आमदार गायकवाड मतदार संघाच्या विकासाकडे लक्ष दिलं नसल्याचाही आरोप जनतेतून होताना दिसतोय. त्यामुळे मतदारांची नाराजी दूर करण्याचे आव्हान दोन्ही पक्षासमोर असणार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसमधुन विद्यामान आमदार वर्षा गायकवाड यांचे नाव अंतिम समजले जात आहे. तर युतीत सेनेकडून बाबुराव माने यांनी पुन्हा कंबर कसली आहे. गेल्यावेळी माने यांचा १५ हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव झाला होता. त्याच बरोबर सेनेतून मनोहर रायबागे हे देखील इच्छुक आहेत. युती झाली आणि नाही झाली तरीही प्रत्येकवेळी काँग्रेस आणि सेनेतच खरी लढत या मतदारसंघात पहायला मिळत असते. त्यामुळे यावेळी तरी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला शिवसेना सुरुंग लावणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.