शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

धारावीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना सुरुंग लावणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 14:11 IST

अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेला धारावी मतदारसंघ १९८० पासून,१९९५ सोडले तर सलग काँग्रेसच्या ताब्यात आहे.

मुंबई - अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे वारे हळूहळू वाहू लागले आहे. आशिया खंडातील सर्वत मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत, विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची जोरदार तयारी सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या चार विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात पुन्हा काँग्रेस आणि शिवसेनेत लढाई होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर यावेळी तरी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना सुरुंग लावणार का अशी चर्चा मतदारसंघात पहायला मिळत आहे.

अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेला धारावी मतदारसंघ १९८० पासून,१९९५ सोडले तर सलग काँग्रेसच्या ताब्यात आहे. आघाडीत काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ युतीत शिवसेनेला सोडलेला आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी काँग्रेस विरोधात शिवसेना हा संघर्ष विधानसभा निवडणुकीत पहायला मिळत असते. काँग्रेसच्या विद्यमान आमदार वर्षा गायकवाड ह्या सलग तीन वेळापासून या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. मात्र गेल्यावेळी वेगवेगेळे लढणाऱ्या भाजप-शिवसेनेत यावेळी युती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. त्यामुळे २०१४ मध्ये १५ हजार ३२८ मतांनी पराभव स्वीकारावा लागणाऱ्या शिवसेने सोबत यावेळी भाजपची ताकद असणार आहे.

सत्तेवर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावीचा पुनर्विकास प्राधान्याने केला जाईल, असं स्पष्ट केलं होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाहीत. त्यामुळे युतीवर मतदारांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आमदार गायकवाड मतदार संघाच्या विकासाकडे लक्ष दिलं नसल्याचाही आरोप जनतेतून होताना दिसतोय. त्यामुळे मतदारांची नाराजी दूर करण्याचे आव्हान दोन्ही पक्षासमोर असणार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसमधुन विद्यामान आमदार वर्षा गायकवाड यांचे नाव अंतिम समजले जात आहे. तर युतीत सेनेकडून बाबुराव माने यांनी पुन्हा कंबर कसली आहे. गेल्यावेळी माने यांचा १५ हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव झाला होता. त्याच बरोबर सेनेतून मनोहर रायबागे हे देखील इच्छुक आहेत. युती झाली आणि नाही झाली तरीही प्रत्येकवेळी काँग्रेस आणि सेनेतच खरी लढत या मतदारसंघात पहायला मिळत असते. त्यामुळे यावेळी तरी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला शिवसेना सुरुंग लावणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.