शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धारावीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना सुरुंग लावणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 14:11 IST

अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेला धारावी मतदारसंघ १९८० पासून,१९९५ सोडले तर सलग काँग्रेसच्या ताब्यात आहे.

मुंबई - अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे वारे हळूहळू वाहू लागले आहे. आशिया खंडातील सर्वत मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत, विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची जोरदार तयारी सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या चार विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात पुन्हा काँग्रेस आणि शिवसेनेत लढाई होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर यावेळी तरी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना सुरुंग लावणार का अशी चर्चा मतदारसंघात पहायला मिळत आहे.

अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेला धारावी मतदारसंघ १९८० पासून,१९९५ सोडले तर सलग काँग्रेसच्या ताब्यात आहे. आघाडीत काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ युतीत शिवसेनेला सोडलेला आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी काँग्रेस विरोधात शिवसेना हा संघर्ष विधानसभा निवडणुकीत पहायला मिळत असते. काँग्रेसच्या विद्यमान आमदार वर्षा गायकवाड ह्या सलग तीन वेळापासून या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. मात्र गेल्यावेळी वेगवेगेळे लढणाऱ्या भाजप-शिवसेनेत यावेळी युती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. त्यामुळे २०१४ मध्ये १५ हजार ३२८ मतांनी पराभव स्वीकारावा लागणाऱ्या शिवसेने सोबत यावेळी भाजपची ताकद असणार आहे.

सत्तेवर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावीचा पुनर्विकास प्राधान्याने केला जाईल, असं स्पष्ट केलं होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाहीत. त्यामुळे युतीवर मतदारांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आमदार गायकवाड मतदार संघाच्या विकासाकडे लक्ष दिलं नसल्याचाही आरोप जनतेतून होताना दिसतोय. त्यामुळे मतदारांची नाराजी दूर करण्याचे आव्हान दोन्ही पक्षासमोर असणार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसमधुन विद्यामान आमदार वर्षा गायकवाड यांचे नाव अंतिम समजले जात आहे. तर युतीत सेनेकडून बाबुराव माने यांनी पुन्हा कंबर कसली आहे. गेल्यावेळी माने यांचा १५ हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव झाला होता. त्याच बरोबर सेनेतून मनोहर रायबागे हे देखील इच्छुक आहेत. युती झाली आणि नाही झाली तरीही प्रत्येकवेळी काँग्रेस आणि सेनेतच खरी लढत या मतदारसंघात पहायला मिळत असते. त्यामुळे यावेळी तरी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला शिवसेना सुरुंग लावणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.