शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

जाहिराती, आरोप-प्रत्यारोप, एकनाथ शिंदेंसोबतच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 15:06 IST

Devendra Fadnavis Vs Eknath Shine: शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच जाहीर झालेला एक सर्व्हे, वृत्तपत्रांमध्ये आलेल्या जाहिराती आणि शिंदेंची शिवसेना आणि भाजपामधील काही नेत्यांनी केलेली विधाने यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मतभेदा निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला पायउतार करून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपाने सरकार स्थापन केल्याच्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच जाहीर झालेला एक सर्व्हे, वृत्तपत्रांमध्ये आलेल्या जाहिराती आणि शिंदेंची शिवसेना आणि भाजपामधील काही नेत्यांनी केलेली विधाने यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेदा निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, आज पालघर येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले आहेत. मात्र तत्पूर्वी एकाच हेलिकॉप्टरमधून आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या कारमधून प्रवास केल्याने दोन्ही नेत्यांमध्ये मदभेदांची दरी रुंदावल्याचा दावा माध्यमांकडून करण्यात येत होता. मात्र या सर्व चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. आमचा एकत्रित प्रवास २५ वर्षांचा. पण आता गेल्या वर्षभरात अधिक घट्ट झाला आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता करण्याचं कारण नाही, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. 

पालघर येथील कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मगाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी हेलिकॉप्टरमधून उतरलो. तेव्हा मीडियातला एक बंधू आला आणि म्हणाला तुम्ही दोघांनी एकत्रित प्रवास केला कसं वाटतं. मी सांगू इच्छितो की, आमचा एकत्रित प्रवास २५ वर्षांचा आहे. पण आता गेल्या वर्षभरात तो अधिक घट्ट झाला आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता करण्याचं कारण नाही. तो कालही सोबत होता. आजही सोबत आहे आणि पुढेही राहील. कारण आम्ही सरकार तयार केलं खुर्चा तोडण्यासाठी नाही, आम्ही पदं मिळवण्यासाठी सरकार स्थापन केलेलं नाही. तर हे जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे म्हणून हे सरकार स्थापन केलं आहे, असे फडणवीस म्हणाले. 

त्यांनी पुढे सांगितलं की, मला असं वाटतं. एखाद्या जाहीरातीमुळे, एखाद्या वक्तव्यामुळे या सरकारमध्ये काय होईल, एवढं तकलादू सरकार हे नाही.  हे जुनं सरकार नाही. कुणी आधी भाषण करायचं कोणी नंतर म्हणून एकमेकांची गच्ची पकडणारे आम्ही बघितलेत. हे सरकार सामान्यांकरता काम करणारं सरकार आहे. सामान्यांच्या जीवनात जोपर्यंत परिवर्तन होत नाही तोपर्यंत हे सरकार कायम राहील, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा