शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

जाहिराती, आरोप-प्रत्यारोप, एकनाथ शिंदेंसोबतच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 15:06 IST

Devendra Fadnavis Vs Eknath Shine: शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच जाहीर झालेला एक सर्व्हे, वृत्तपत्रांमध्ये आलेल्या जाहिराती आणि शिंदेंची शिवसेना आणि भाजपामधील काही नेत्यांनी केलेली विधाने यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मतभेदा निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला पायउतार करून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपाने सरकार स्थापन केल्याच्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच जाहीर झालेला एक सर्व्हे, वृत्तपत्रांमध्ये आलेल्या जाहिराती आणि शिंदेंची शिवसेना आणि भाजपामधील काही नेत्यांनी केलेली विधाने यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेदा निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, आज पालघर येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले आहेत. मात्र तत्पूर्वी एकाच हेलिकॉप्टरमधून आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या कारमधून प्रवास केल्याने दोन्ही नेत्यांमध्ये मदभेदांची दरी रुंदावल्याचा दावा माध्यमांकडून करण्यात येत होता. मात्र या सर्व चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. आमचा एकत्रित प्रवास २५ वर्षांचा. पण आता गेल्या वर्षभरात अधिक घट्ट झाला आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता करण्याचं कारण नाही, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. 

पालघर येथील कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मगाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी हेलिकॉप्टरमधून उतरलो. तेव्हा मीडियातला एक बंधू आला आणि म्हणाला तुम्ही दोघांनी एकत्रित प्रवास केला कसं वाटतं. मी सांगू इच्छितो की, आमचा एकत्रित प्रवास २५ वर्षांचा आहे. पण आता गेल्या वर्षभरात तो अधिक घट्ट झाला आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता करण्याचं कारण नाही. तो कालही सोबत होता. आजही सोबत आहे आणि पुढेही राहील. कारण आम्ही सरकार तयार केलं खुर्चा तोडण्यासाठी नाही, आम्ही पदं मिळवण्यासाठी सरकार स्थापन केलेलं नाही. तर हे जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे म्हणून हे सरकार स्थापन केलं आहे, असे फडणवीस म्हणाले. 

त्यांनी पुढे सांगितलं की, मला असं वाटतं. एखाद्या जाहीरातीमुळे, एखाद्या वक्तव्यामुळे या सरकारमध्ये काय होईल, एवढं तकलादू सरकार हे नाही.  हे जुनं सरकार नाही. कुणी आधी भाषण करायचं कोणी नंतर म्हणून एकमेकांची गच्ची पकडणारे आम्ही बघितलेत. हे सरकार सामान्यांकरता काम करणारं सरकार आहे. सामान्यांच्या जीवनात जोपर्यंत परिवर्तन होत नाही तोपर्यंत हे सरकार कायम राहील, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा