शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

जाहिराती, आरोप-प्रत्यारोप, एकनाथ शिंदेंसोबतच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 15:06 IST

Devendra Fadnavis Vs Eknath Shine: शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच जाहीर झालेला एक सर्व्हे, वृत्तपत्रांमध्ये आलेल्या जाहिराती आणि शिंदेंची शिवसेना आणि भाजपामधील काही नेत्यांनी केलेली विधाने यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मतभेदा निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला पायउतार करून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपाने सरकार स्थापन केल्याच्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच जाहीर झालेला एक सर्व्हे, वृत्तपत्रांमध्ये आलेल्या जाहिराती आणि शिंदेंची शिवसेना आणि भाजपामधील काही नेत्यांनी केलेली विधाने यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेदा निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, आज पालघर येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले आहेत. मात्र तत्पूर्वी एकाच हेलिकॉप्टरमधून आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या कारमधून प्रवास केल्याने दोन्ही नेत्यांमध्ये मदभेदांची दरी रुंदावल्याचा दावा माध्यमांकडून करण्यात येत होता. मात्र या सर्व चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. आमचा एकत्रित प्रवास २५ वर्षांचा. पण आता गेल्या वर्षभरात अधिक घट्ट झाला आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता करण्याचं कारण नाही, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. 

पालघर येथील कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मगाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी हेलिकॉप्टरमधून उतरलो. तेव्हा मीडियातला एक बंधू आला आणि म्हणाला तुम्ही दोघांनी एकत्रित प्रवास केला कसं वाटतं. मी सांगू इच्छितो की, आमचा एकत्रित प्रवास २५ वर्षांचा आहे. पण आता गेल्या वर्षभरात तो अधिक घट्ट झाला आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता करण्याचं कारण नाही. तो कालही सोबत होता. आजही सोबत आहे आणि पुढेही राहील. कारण आम्ही सरकार तयार केलं खुर्चा तोडण्यासाठी नाही, आम्ही पदं मिळवण्यासाठी सरकार स्थापन केलेलं नाही. तर हे जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे म्हणून हे सरकार स्थापन केलं आहे, असे फडणवीस म्हणाले. 

त्यांनी पुढे सांगितलं की, मला असं वाटतं. एखाद्या जाहीरातीमुळे, एखाद्या वक्तव्यामुळे या सरकारमध्ये काय होईल, एवढं तकलादू सरकार हे नाही.  हे जुनं सरकार नाही. कुणी आधी भाषण करायचं कोणी नंतर म्हणून एकमेकांची गच्ची पकडणारे आम्ही बघितलेत. हे सरकार सामान्यांकरता काम करणारं सरकार आहे. सामान्यांच्या जीवनात जोपर्यंत परिवर्तन होत नाही तोपर्यंत हे सरकार कायम राहील, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा