शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

जीवा महाला यांचे वंशज जगतायत हलाखीत

By admin | Updated: July 4, 2017 16:08 IST

होता जीवा म्हणून वाचला शिवा. हे आपण इतिहास वाचताना समजून घेतले पण जीवा महालाचे तेरावे वंशज सध्या हलाखीत जीवन जगत आहेत.

आनंद कांबळे /ऑनलाइन लोकमत 
आपटाळे दि ४ - होता जीवा म्हणून वाचला शिवा. हे आपण इतिहास वाचताना समजून घेतले पण जीवा महालाचे तेरावे वंशज सध्या हलाखीत जीवन जगत आहेत. शिवाजी ट्रेल संस्थेचे संस्थापक मिलींद क्षीरसागर सर व टीमने जीवा महालाचे वंशज प्रकाश व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. 
जीवा महालाचे तेरावे वंशज प्रकाश सपकाळ हे सातारा जिल्ह्यातील वाई जवळील कोढविंली येथे राहतात. प्रतापगडचे युद्ध हे स्वराज्य स्थापनेतील अतिशय म्हत्त्वाचा टप्पा होता. खुद्ध थोरले महाराज साहेब शहाजी राजे यांना नजरकैदेत तसेच शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांना कपटाने मारणारा अफजल खान स्वराज्यावरती चालून आला होता. त्याला संपविण्याच्या उद्देशाने महाराजांनी त्याला प्रतापगडच्या पायथ्याला बोलावून त्याचा कोथळा काढला होता. 
पण त्याचा अंगरक्षक व दांडपट्टा चालविण्यात पटाईत असणारा सय्यद बंडा महाराजांच्यावरती वार करता झाला त्यावेळी त्याचा वार पलटावून लावत "होता जीवा म्हणून वाचला शिवा" अशी म्हण प्रचलित करणारे जीवा महाले यांच्या वंशजांना मोल-मजुरी करून आपले पोट भरावे लागत आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कृष्णानदीच्या तीरावर कोंढीवली हे गाव आहे. याच गावात या वीर जिवा महालाचे १३ वे वंशज राहतात. प्रकाश बाळकृष्ण सपकाळ असे त्यांचे नाव आहे. 
त्यांची पत्नी जयश्री व दोन मुले प्रतिक्षा, व प्रतीक यांच्यासोबत एका झोपडीमध्ये ते राहत आहेत. प्रकाश यांना पॅरेलिसीस असल्यामुळे ते अंथरुणावर खिळून आहेत. त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांना गावात मजुरीला जावे लागते. 
हि बातमी समजताच शिवाजी ट्रेलच्या टीमने आज कोंढवली गावात जाऊन प्रकाश यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना वैद्यकीय सेवा पुरविण्याची हमी दिली. दुर्गपूजेच्या निम्मिताने २०१६ साला पासून शिवाजी ट्रेलने ऐतेहासिक घराण्यातील वंशजनां एकत्रित केले होते. या ऐतेहासिक घराण्यातील वंशज समजापुढे यावेत म्हणून शिवाजी ट्रेल प्रयत्नशील असून याच उपक्रमाअंतर्गत महाले यांना मदत करण्यात येणार आहे. शिवाजी ट्रेल ही संस्था किल्ले संवर्धनचे काम करते.जीवा महालाच्या वंशजाना मदत करण्याचे आवाहन संस्थेचे सदस्य प्रा. विनायक खोत यांनी केले आहे.