शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
4
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
5
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
6
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
7
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
8
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
9
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
10
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
11
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
12
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
13
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
14
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
15
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
16
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
17
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
18
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
19
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
20
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
Daily Top 2Weekly Top 5

'महाविकास' नाही तर महा'कन्फ्युज' आघाडी; एकनाथ शिंदे यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:18 IST

सर्वजण एकत्र येऊनही त्यांना पराभवाची चाहूल

सातारा : महाविकास आघाडीत सर्वजण एकत्र आले म्हणून निवडणूक जिंकण्याचा विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. पण, ते निवडणुका पुढे ढकला म्हणतात. त्यांना पराभवाची चाहूल लागलेली आहे. महायुती जिंकणार म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी नाही, तर ती महा‘कन्फ्यूज’ आघाडी आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.सातारा येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुती पूर्ण ताकदीने उतरली आहे. आताच्या निवडणुकीतही आमच्या लाडक्या बहिणी विरोधकांना चारीमुंड्या चीत करतील. विधानसभा निवडणुकीतही लाडक्या बहिणी, भाऊ आणि शेतकऱ्यांनी त्यांना विरोधी पक्षनेता बनण्याइतपतही संख्याबळ दिलं नाही. यावरून त्यांची मानसिकता खचली आहे. निवडणुकांना सामोरे जाण्याची हिंमत त्यांच्यात नाही हेच दिसत आहे.

विरोधकांनी आत्मचिंतन करावे...ते निवडणुका जिंकतात तेव्हा निवडणूक आयोग चांगला, आक्षेप नाही. पण, पराभव झाला की दोष द्यायचा. खरेतर ईव्हीएम मशीनची प्रक्रिया ही काँग्रेसच्या काळातच सुरू झाली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा हुकूमशाही पाहिली आहे. अधिकाऱ्यांना मारणं, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना जेवण करताना अटक करणं, अभिनेत्री कंगना राणावत यांचं घर तोडणं ही हुकूमशाही त्यांनी दाखवलीय. लोकसभा निवडणुकीनंतर तर त्यांनी जेलमध्ये टाकणार अशी वक्तव्येही केली. ही कसली लोकशाही होती. त्यामुळे विचारपूर्वक बोललं पाहिजे. यासाठी विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला शिंदे यांनी दिला.

बैठकीसाठी अधिकारी ताटकळत...जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत विकासकामांची आढावा बैठक होणार होती. यासाठी दुपारी तीनपासूनच अधिकारी नियोजन भवनमध्ये उपस्थित होते. पण, उपमुख्यमंत्री शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेच नाहीत. नंतर अधिकाऱ्यांना बैठक होणार नसल्याचा निरोप देण्यात आला. त्यामुळे अधिकारी निघून गेले. पण, दोन तास त्यांना ताटकळत वाट पहावी, लागल्याची चर्चा होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Maha Vikas Aghadi is Maha 'Confuse' alliance: Eknath Shinde's Criticism

Web Summary : Eknath Shinde criticized the Maha Vikas Aghadi as a 'Maha Confuse' alliance, sensing defeat in upcoming elections. He accused them of avoiding polls and highlighted past authoritarian actions. Shinde also advised the opposition to introspect on their governance.