शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
2
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
3
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
4
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
5
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
6
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
7
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
8
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
9
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
10
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
11
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
12
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर
13
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
14
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
15
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
16
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
17
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
18
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
19
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
20
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?

'महाविकास' नाही तर महा'कन्फ्युज' आघाडी; एकनाथ शिंदे यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:18 IST

सर्वजण एकत्र येऊनही त्यांना पराभवाची चाहूल

सातारा : महाविकास आघाडीत सर्वजण एकत्र आले म्हणून निवडणूक जिंकण्याचा विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. पण, ते निवडणुका पुढे ढकला म्हणतात. त्यांना पराभवाची चाहूल लागलेली आहे. महायुती जिंकणार म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी नाही, तर ती महा‘कन्फ्यूज’ आघाडी आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.सातारा येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुती पूर्ण ताकदीने उतरली आहे. आताच्या निवडणुकीतही आमच्या लाडक्या बहिणी विरोधकांना चारीमुंड्या चीत करतील. विधानसभा निवडणुकीतही लाडक्या बहिणी, भाऊ आणि शेतकऱ्यांनी त्यांना विरोधी पक्षनेता बनण्याइतपतही संख्याबळ दिलं नाही. यावरून त्यांची मानसिकता खचली आहे. निवडणुकांना सामोरे जाण्याची हिंमत त्यांच्यात नाही हेच दिसत आहे.

विरोधकांनी आत्मचिंतन करावे...ते निवडणुका जिंकतात तेव्हा निवडणूक आयोग चांगला, आक्षेप नाही. पण, पराभव झाला की दोष द्यायचा. खरेतर ईव्हीएम मशीनची प्रक्रिया ही काँग्रेसच्या काळातच सुरू झाली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा हुकूमशाही पाहिली आहे. अधिकाऱ्यांना मारणं, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना जेवण करताना अटक करणं, अभिनेत्री कंगना राणावत यांचं घर तोडणं ही हुकूमशाही त्यांनी दाखवलीय. लोकसभा निवडणुकीनंतर तर त्यांनी जेलमध्ये टाकणार अशी वक्तव्येही केली. ही कसली लोकशाही होती. त्यामुळे विचारपूर्वक बोललं पाहिजे. यासाठी विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला शिंदे यांनी दिला.

बैठकीसाठी अधिकारी ताटकळत...जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत विकासकामांची आढावा बैठक होणार होती. यासाठी दुपारी तीनपासूनच अधिकारी नियोजन भवनमध्ये उपस्थित होते. पण, उपमुख्यमंत्री शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेच नाहीत. नंतर अधिकाऱ्यांना बैठक होणार नसल्याचा निरोप देण्यात आला. त्यामुळे अधिकारी निघून गेले. पण, दोन तास त्यांना ताटकळत वाट पहावी, लागल्याची चर्चा होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Maha Vikas Aghadi is Maha 'Confuse' alliance: Eknath Shinde's Criticism

Web Summary : Eknath Shinde criticized the Maha Vikas Aghadi as a 'Maha Confuse' alliance, sensing defeat in upcoming elections. He accused them of avoiding polls and highlighted past authoritarian actions. Shinde also advised the opposition to introspect on their governance.