शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

Delhi Election Results: भविष्यात नरेंद्र मोदींना पर्याय कोण?, शिवसेना म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 1:01 PM

दिल्ली निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता मोदींना पर्याय कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देदिल्ली निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता मोदींना पर्याय कोण याची चर्चा सुरू झाली आहे. आपला नाकारण्याचं दिल्लीकरांना मोदींनी केलेलं आवाहन जनतेनं झिडकारलं आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांना मोदींना भविष्यात पर्याय कोण असं विचारलं असता सूचक विधान केलं आहे. 

नवी दिल्ली- दिल्ली निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता मोदींना पर्याय कोण याची चर्चा सुरू झाली आहे. आपला नाकारण्याचं दिल्लीकरांना मोदींनी केलेलं आवाहन जनतेनं झिडकारलं आहे. त्यानंतर शिवसेनेनंही भाजपाला कोंडीत पकडण्याची संधी साधली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांना मोदींना भविष्यात पर्याय कोण असं विचारलं असता सूचक विधान केलं आहे. मोदींना पर्याय कोण असेल ते काळ आणि वेळच ठरवेल. शिवसेनेनं पर्याय दिला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. तसाच देशाचा पर्यायदेखील कदाचित शिवसेना ठरवेल.पुढच्या निवडणुकीत आणखी चित्र स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत देशाचा कल समजेल. निवडणुकांमधूनच लोकांचं कौल मिळत असतो. त्याचा कौल आता मिळालेला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान लोकांच्या मनात काय आहे, हे मतपेटीतून दिसेल. राजकारणात ओहोटी आणि भरती सुरूच असते. आपच्या विकासावरती दिल्लीकरांनी विश्वास दाखवलेला आहे. परंतु सदा न् कदा आम्हीच राज्य करू, आमच्याशिवाय कोणीच राज्य करू शकत नाही हा जो अहंकार असतो. तो लोक कधी ना कधी तरी उतरवतात. मोदींना पर्याय कोण असेल ते काळ आणि वेळच ठरवेल. शिवसेनेनं पर्याय दिला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. तसाच देशाचा पर्यायदेखील शिवसेना ठरवेल. पुढच्या निवडणुकीत आणखी चित्र स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत देशाचा कल समजेल. आपच्या विकासावरती दिल्लीकरांनी विश्वास दाखवलेला आहे, असंही अनिल परब म्हणाले आहेत.तसेच मोदींच्या देशद्रोह्यांसंदर्भातील विधानाचा हवाला देत शिवसेनेनं त्यावर भाष्य केलं आहे. देशद्रोहाची व्याख्या काय हे सर्वात महत्त्वाचं असून, ते लोकांनी मान्यसुद्धा करायला पाहिजे. एका व्यक्तीनं देशद्रोहाची व्याख्या करणं म्हणजे ती देशद्रोहाची व्याख्या होत नाही. लोकांनादेखील ती मान्य असावी लागते. लोकांना काय मान्य आहे ते लोकांनी दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रात जे सत्तापरिवर्तन झालेलं आहे, त्याचा परिणाम दिल्लीत दिसतो आहे.देशाच्या राजकारणाला शिवसेनेनं वेगळं वळण दिलं आहे. त्या वळणाचे परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. दिल्लीत आपची सत्ता उलथवण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर संपूर्ण देशातून भाजपाचे दिग्गज नेते उतरवले गेले होते. एवढे सगळे दिग्गज नेते उतरवल्यानंतरही दिल्लीसारख्या छोट्या प्रदेशावर ते आपला कब्जा करू शकलेले नाहीत. जिंकू शकलेले नाहीत. यातच सगळ्या पुढच्या भविष्याची दिशा दिसते आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhi electionदिल्ली निवडणूकShiv SenaशिवसेनाAnil Parabअनिल परब