शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

काँग्रेसचा घोळ पाहून उद्धव ठाकरे हताश, एका वाक्यात मांडली उद्विग्नता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 4:53 AM

काही खात्यांसाठी अजूनही आग्रह; मंत्री, राज्यमंत्री अस्वस्थ

मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आता पाच दिवस उलटले असले, तरी अद्याप खातेवाटप मात्र झालेले नाही. काही खात्यांबाबत काँग्रेस नेते अद्यापही आग्रही असल्याने हे खातेवाटप रखडल्याची माहिती आहे. मात्र, लांबत चाललेल्या या खातेवाटपामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतापले असल्याचे समजते. इतके दिवस खातेवाटप रेंगाळल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता आहे.मंत्री व राज्यमंत्र्यांना आपल्याला कोणते खाते मिळणार, हे समजू शकलेले नाही. खात्याविना मंत्रालयात बसायचे कसे, लोकांना भेटायचे कसे, कोणत्या अधिकाऱ्यांसह बैठका घ्यायच्या आणि त्यांना सूचना तरी काय द्यायच्या, असा प्रश्न या मंत्री आणि राज्यमंत्र्यांना पडला आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी सत्तेवर येण्यापूर्वीच तिन्ही पक्षांकडे कोणती खाती असतील, हे निश्चत झाले आहे. खातेवाटप झालेले आहे. त्यामुळेच काँग्रेसकडे कोणती खाती असतील, याची माहिती प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस के. सी. वणुगोपाल यांना आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समक्ष हे खातेवाटप झाले होते. असे असताना काँग्रेसचे मंत्री दुसºया खात्यासाठी का आग्रही आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.शिवसेनेने मात्र अतिशय सामंजस्याची भूमिका घेत, त्यांच्या वाट्याला आलेली सांस्कृतिक कार्य व बंदरे विकास ही दोन खाती काँग्रेस पक्षाला देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, तरीही काँग्रेस नेते आणखी काही खात्यांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘आता कुठे तरी हे थांबवा,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत वादावादी झाल्याचे वृत्त उपमुख्यमंत्री अजित पवार व कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावले आहे.ज्यांचे आमदार जास्त त्यांचा पालकमंत्रीज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त आहेत, त्यांना संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात येणार आहे. मात्र काही जिल्ह्यांबाबत निर्णय बाकी आहे. लवकरच खाते वाटप होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा