शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

"दिल्लीसमोर अजितदादा झुकले असे चित्र..."; विरोधकांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 20:48 IST

अजितदादांच्या राष्ट्रवादीची जास्त भीती वाटत असल्यानेच विरोधकांकडून बदनामीची मोहीम सुरु आहे, असे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं.

Ajit pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील निकालाचे विश्लेषण करताना आरएसएसच्या मुखपत्रातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेण्याची काय गरज होती असे म्हणत भाजपला फटकारलं होतं. बहुमत असताना अजित पवार यांना सोबत घेण्याची काय गरज होती? तसेच अजित पवारांमुळे भाजपची किंमत कमी झाली अशा शब्दात भाजपवर ताशेरे ओढले. राज्यातील पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पाडली. या बैठकीत अजित पवार यांना बाजूला करण्याची रणनीती आखल्याचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवारांच्या दाव्याला आता राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपच्या दिल्लीतील बैठकीनंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांबाबत मोठा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत अजित पवारांना बाजूला काढण्याची रणनीती आखल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. "मविआच्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे, तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो, असा भाजपच्या चाणक्यांचा कयास आहे. त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येत असून आधी आरएसएसच्या मुखपत्रातून टीका, नंतर झोपलेले तथाकथित गांधी जागा करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे," असं रोहित पवार यांनी म्हटलं.  

आमदार रोहित पवार यांनी केलेल्या दाव्याला आता राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  अजितदादांच्या राष्ट्रवादीची जास्त भीती वाटत असल्यानेच विरोधकांकडून बदनामीची मोहीम सुरु आहे.  परंतु या सगळयांना चारीमुंड्या चीत करुन राष्ट्रवादी काँग्रेस उभारी घेईल, असं सुनिल तटकरे यांनी म्हटलं आहे. 

"अजित पवार यांनी जे केले ते चूक हा जो अपप्रचार आणि खलनायक ठरवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे त्याला प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. याचे भांडवल विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फायदा विरोधकांना झाला नाही. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी सहानुभूती आणली त्यात ते काहीप्रमाणात यशस्वीही झाले परंतु ती सहानुभूती आता टिकणार नाही आता अजितपर्व नावाने सहानुभूती निर्माण करायची आहे," असे सुनील तटकरे म्हणाले.

"दिल्लीसमोर अजितदादा झुकले असे चित्र निर्माण केले जातेय परंतु तशी वस्तुस्थिती नाहीय. एनडीएच्या शिर्षस्थ नेत्यांसोबत आपले अजितदादा पहिल्या रांगेत बसले ही आपल्यासाठी आणि पक्षासाठी अभिमानास्पद बाब आहे हे कार्यकर्त्यांनी प्रत्येकवेळी सांगण्याची गरज आहे," असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवारsunil tatkareसुनील तटकरेRohit Pawarरोहित पवार