शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

दंगलखोरांवर कडक कारवाई करणार - दीपक केसरकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 02:47 IST

कोरेगाव भीमा : ‘ज्यांनी दंगल घडविली ते कोणत्याही गटाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. निरपराध्यांचा यात बळी जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानाचा पोलीस व महसूल प्रशासनाकडून पंचनामा करुन योग्य ती मदत मिळवून दिली जाईल, असे अश्वासन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.केसरकर यांनी मंगळवारी ...

कोरेगाव भीमा : ‘ज्यांनी दंगल घडविली ते कोणत्याही गटाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. निरपराध्यांचा यात बळी जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानाचा पोलीस व महसूल प्रशासनाकडून पंचनामा करुन योग्य ती मदत मिळवून दिली जाईल, असे अश्वासन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.केसरकर यांनी मंगळवारी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार बाबूराव पाचर्णे, कायदा-सुव्यवस्थेचे महासंचालक बिपीन शर्मा, पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील आदी उपस्थित होते. या वेळी केसरकर यांनी पेरणे फाटा येथील विजय स्तंभ, वढु बुद्रुक येथील संभाजी महाराज समाधीस्थळ व गोविंद गोपाळ यांच्या स्मारकाची पाहणी केल्यानंतर कोरेगाव, सणसवाडी व शिक्रापूर यथील नुकसानाचीही धावती पाहणी केली.यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी पोलिसांनी कालची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली असून, बफर झोन तयार करून दोन गटांमधील अंतर कायम ठेवले. पोलिसांवरच दगडफेक होत असताना त्यांनी संयम ठेवून फक्त अश्रुधूर व लाठीचार्ज केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, असा दावा केला.पूर्वकल्पना असतानाही घटनास्थळी पोलीस बळ कमी पडले का? असा सवाल पत्रकारांनी केला असता, वढूतील झालेली घटना सामंजस्याने मिटविली होती. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होईल, असे वाटत नव्हते. काढण्यात आलेली रॅलीही पूर्वनियोजित नव्हती. दोन रॅली समोरासमोर आल्यावर घोषणाबाजी होऊन हा तणाव निर्माण झाल्याचे केसरकर यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याची गरज आहे, तर यापुढील काळामध्ये अशा प्रकरच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे.दंगलीमध्ये ठार झालेल्या राहुल बाबाजी फटांगडे (वय ३०, रा. साईनाथनगर डोंगरवस्ती, सणसवाडी) व इतर जखमींना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. इतर नुकसानाचा विमा नसला तरी मदत मिळवून देऊ, त्याचप्रमाणे यापुढे स्तंभ परिसरात येणाºया जनसमुदयाबाबत शासनाकडुून योग्य ती खबरदारी घेऊ असे त्यांनी सांगितले.पोलीस अकार्यक्षम असल्यानेच दुर्घटनाकोरेगाव भीमाची दुर्घटना दुर्दैवी असून पोलीस प्रशासन अकार्यक्षम राहिल्याने व परिस्थिती योग्य पद्धतीने न हाताळल्यानेच घटना घडल्याची टीका खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केली आहे. लोकसभेत उद्या कोरेगाव भीमा दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगून त्यांनी नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन या वेळी केले.तरीही कमी बंदोबस्तयावेळी बाबुराव पाचर्णे यांनी सांगितले की,‘ वढु बुद्रुक येथे झालेली घटनेबाबात पोलीस यंत्रणेला एक महिन्यापूर्वीच कल्पना दिली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली नाही. पूर्वकल्पना असतानाही कोरेगाव भीमाला कमी पोलीस बंदांबस्त ठेवला. या घटनेत अनेकांचे उपजिविकेचे साधनच नष्ट झाले असल्याने प्रशासनाला योग्य पध्दतीने पंचनामे करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी आमदार अशोक पवार यांनीही योग्य ती खबरदारी न घेतल्याने व परिस्थिती हाताळताना लोकप्रतिनीधींना विश्वासात न घेतल्याने घटना घडली असल्याचे सांगितले.केसरकरांनी पाठ फिरवताच पुन्हा गोंधळकेसरकर येथून भेट देत शिक्रापूर कडे जाताच कोरेगाव भीमा येथे महामार्गावर जमा झालेल्या जमावाने काही दुकानांची जाळपोळ केल्याने गोंधळ निर्माण झाला.पोलिसांनी घेतली बघ्याची भुमिकापोलिसांसमोर जमाव स्थानीकांची वाहने, दुकाने जाळीत असतानाही पोलीस बघ्याची भुमिका घेत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तर पोलीसंनी कारण नसताना केवळ घरावर शिवरायांचा पुतळा असल्याने तोडफोड केल्याचीही तक्रार नागरिक करित होते.पंचनाम्यासाठी एसआयटी टीमकोरेगाव भीमा येथील नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यासाठी एसआयटी नेमली आहे. पंचनामे केले जातील व भरपाई मिळवून देण्यावर भर दिलाजाईल. घटनेवेळीचे सीसीटीव्ही फुटेजमिळविले असून, दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी दिले. 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावDeepak Kesarkarदीपक केसरकर