शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

दंगलखोरांवर कडक कारवाई करणार - दीपक केसरकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 02:47 IST

कोरेगाव भीमा : ‘ज्यांनी दंगल घडविली ते कोणत्याही गटाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. निरपराध्यांचा यात बळी जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानाचा पोलीस व महसूल प्रशासनाकडून पंचनामा करुन योग्य ती मदत मिळवून दिली जाईल, असे अश्वासन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.केसरकर यांनी मंगळवारी ...

कोरेगाव भीमा : ‘ज्यांनी दंगल घडविली ते कोणत्याही गटाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. निरपराध्यांचा यात बळी जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानाचा पोलीस व महसूल प्रशासनाकडून पंचनामा करुन योग्य ती मदत मिळवून दिली जाईल, असे अश्वासन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.केसरकर यांनी मंगळवारी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार बाबूराव पाचर्णे, कायदा-सुव्यवस्थेचे महासंचालक बिपीन शर्मा, पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील आदी उपस्थित होते. या वेळी केसरकर यांनी पेरणे फाटा येथील विजय स्तंभ, वढु बुद्रुक येथील संभाजी महाराज समाधीस्थळ व गोविंद गोपाळ यांच्या स्मारकाची पाहणी केल्यानंतर कोरेगाव, सणसवाडी व शिक्रापूर यथील नुकसानाचीही धावती पाहणी केली.यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी पोलिसांनी कालची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली असून, बफर झोन तयार करून दोन गटांमधील अंतर कायम ठेवले. पोलिसांवरच दगडफेक होत असताना त्यांनी संयम ठेवून फक्त अश्रुधूर व लाठीचार्ज केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, असा दावा केला.पूर्वकल्पना असतानाही घटनास्थळी पोलीस बळ कमी पडले का? असा सवाल पत्रकारांनी केला असता, वढूतील झालेली घटना सामंजस्याने मिटविली होती. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होईल, असे वाटत नव्हते. काढण्यात आलेली रॅलीही पूर्वनियोजित नव्हती. दोन रॅली समोरासमोर आल्यावर घोषणाबाजी होऊन हा तणाव निर्माण झाल्याचे केसरकर यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याची गरज आहे, तर यापुढील काळामध्ये अशा प्रकरच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे.दंगलीमध्ये ठार झालेल्या राहुल बाबाजी फटांगडे (वय ३०, रा. साईनाथनगर डोंगरवस्ती, सणसवाडी) व इतर जखमींना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. इतर नुकसानाचा विमा नसला तरी मदत मिळवून देऊ, त्याचप्रमाणे यापुढे स्तंभ परिसरात येणाºया जनसमुदयाबाबत शासनाकडुून योग्य ती खबरदारी घेऊ असे त्यांनी सांगितले.पोलीस अकार्यक्षम असल्यानेच दुर्घटनाकोरेगाव भीमाची दुर्घटना दुर्दैवी असून पोलीस प्रशासन अकार्यक्षम राहिल्याने व परिस्थिती योग्य पद्धतीने न हाताळल्यानेच घटना घडल्याची टीका खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केली आहे. लोकसभेत उद्या कोरेगाव भीमा दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगून त्यांनी नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन या वेळी केले.तरीही कमी बंदोबस्तयावेळी बाबुराव पाचर्णे यांनी सांगितले की,‘ वढु बुद्रुक येथे झालेली घटनेबाबात पोलीस यंत्रणेला एक महिन्यापूर्वीच कल्पना दिली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली नाही. पूर्वकल्पना असतानाही कोरेगाव भीमाला कमी पोलीस बंदांबस्त ठेवला. या घटनेत अनेकांचे उपजिविकेचे साधनच नष्ट झाले असल्याने प्रशासनाला योग्य पध्दतीने पंचनामे करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी आमदार अशोक पवार यांनीही योग्य ती खबरदारी न घेतल्याने व परिस्थिती हाताळताना लोकप्रतिनीधींना विश्वासात न घेतल्याने घटना घडली असल्याचे सांगितले.केसरकरांनी पाठ फिरवताच पुन्हा गोंधळकेसरकर येथून भेट देत शिक्रापूर कडे जाताच कोरेगाव भीमा येथे महामार्गावर जमा झालेल्या जमावाने काही दुकानांची जाळपोळ केल्याने गोंधळ निर्माण झाला.पोलिसांनी घेतली बघ्याची भुमिकापोलिसांसमोर जमाव स्थानीकांची वाहने, दुकाने जाळीत असतानाही पोलीस बघ्याची भुमिका घेत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तर पोलीसंनी कारण नसताना केवळ घरावर शिवरायांचा पुतळा असल्याने तोडफोड केल्याचीही तक्रार नागरिक करित होते.पंचनाम्यासाठी एसआयटी टीमकोरेगाव भीमा येथील नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यासाठी एसआयटी नेमली आहे. पंचनामे केले जातील व भरपाई मिळवून देण्यावर भर दिलाजाईल. घटनेवेळीचे सीसीटीव्ही फुटेजमिळविले असून, दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी दिले. 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावDeepak Kesarkarदीपक केसरकर