शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

राज्यात गोवंशाचे घटते प्रमाण चिंताजनक

By admin | Updated: September 12, 2015 02:01 IST

शेतीकामासाठी ट्रॅक्टर, अत्याधुनिक अवजारांचा वापर सुरू झाला आणि हळूहळू शेतीकामातील बैलजोड्यांचे महत्त्व कमी झाले. गोवंशाची कत्तल होऊ लागली आणि गोवंशाचे

- नितीन गव्हाळे,  अकोलाशेतीकामासाठी ट्रॅक्टर, अत्याधुनिक अवजारांचा वापर सुरू झाला आणि हळूहळू शेतीकामातील बैलजोड्यांचे महत्त्व कमी झाले. गोवंशाची कत्तल होऊ लागली आणि गोवंशाचे प्रमाण घटू लागले. १९व्या पशुगणनेतील आकडेवारीनुसार दरवर्षी राज्यात ३0 हजारांवर गोवंश घटत आहे.गोवंशाचा विचार केला असता, पूर्वी महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक होता आणि दर १00 हेक्टर पिकांखालील जमिनीमागे ११६ जनावरे एवढी घनता होती. २00७च्या पशुगणनेनुसार महाराष्ट्रात दर लाख लोकसंख्येमागे ३८ हजार इतके गोवंश होते. हेच प्रमाण २00३ मध्ये ३९ हजार होते. १९९७मध्ये दर लाख लोकसंख्येमागील गोवंशाचे प्रमाण ५0 हजार होते. सातत्याने गोवंशाचे प्रमाण घटत असल्याचे यावरून स्पष्ट होते. गोवंश घटण्यामागे मांसासाठी सुरू असलेली कत्तल, ट्रॅक्टरचा वाढलेला अतिवापर, चाऱ्याची टंचाई ही प्रमुख कारणे आहेत. पशुगणनेनुसार २00७ मध्ये राज्यात १ कोटी ६१ लाख ८३ हजार ५२७ (गाय व बैल) होते. २0१२ मध्ये त्यात ६ लाख ९९ हजार ३२0 गोवंशाची घट होऊन, ते १ कोटी ५४ लाख ८४ हजार २0७ पर्यंत आले.पशुसंवर्धन विभागामार्फत कृत्रिम रेतन कार्यक्रमाच्या माध्यमातून गोधन वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. असे असतानाही गोधन घटत आहे. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून गोपालनाकडे वळले पाहिजे तरच शेती, कुटुंबाचा विकास साधला जाईल आणि गोधनवाढीसही हातभार लागेल. -डॉ. अशोक हजारे, विभागीय सहआयुक्त, पशुसंवर्धन विभाग, अमरावती