Cyrus Mistry Accident : सायरस मिस्त्री यांच्या निधनानं भारतीय उद्योग जगताची मोठी हानी, अजित पवारांनी व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 20:34 IST2022-09-04T20:33:14+5:302022-09-04T20:34:08+5:30
Cyrus Mistry Accident News & Live Updates उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं रविवारी दुपारच्या सुमारास अपघाती निधन झालं.

Cyrus Mistry Accident : सायरस मिस्त्री यांच्या निधनानं भारतीय उद्योग जगताची मोठी हानी, अजित पवारांनी व्यक्त केल्या भावना
उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं रविवारी दुपारच्या सुमारास अपघाती निधन झालं. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
“टाटा सन्सचे माजी प्रमुख, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनानं भारतीय उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. भारतानं एक महान सुपुत्र गमावला आहे. भारतीय उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं त्यांनी वेगळी छाप उमटवली होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!,” असे म्हणत अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
टाटा सन्सचे माजी प्रमुख, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनानं भारतीय उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. भारतानं एक महान सुपुत्र गमावला आहे. भारतीय उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं त्यांनी वेगळी छाप उमटवली होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/lGUTBqBUYK
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 4, 2022
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ मर्सिडीज गाडीच्या झालेल्या अपघातात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एकूण दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास अहमदाबादवरून ते मुंबईला येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. मर्सिडिस गाडीतून ते प्रवास करत होते. त्यांची गाडी डिव्हायडला धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. सूर्या नदीवरील नवीन पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने धोकादायक डिव्हायडरला कार धडकली.