शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

गळीत हंगामास विलंब होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 01:19 IST

साखर कारखाने सुरू करण्यासाठी आधीच विलंब झाला आहे.

सोमेश्वरनगर : साखर कारखाने सुरू करण्यासाठी आधीच विलंब झाला आहे. शासनाने जरी ५ नोव्हेंबरला साखर कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली असली, तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला ३ हजार २०० रुपयांची पहिली उचल मिळावी,, अशी मागणी करत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे आधीच कारखान्यांच्या गळीत हंगामास उशीर झाला असताना, स्वाभिमानीच्या या भूमिकेमुळे कारखाने ५ नोव्हेंबरला सुरू होणार का, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऊसदराचे आंदोलन तीव्र झाले आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे आता अगोदरच साखर कारखाने सुरू होण्यास उशीर झाला आहे. जर स्वाभिमानी शेतकरी संघटना आपली मागणी तडजोडीने सोडवणार की आंदोलनाचे लोन पसरणार, याबाबत ऊसउत्पादकांमधून चर्चा झडू लागल्या आहेत. आज (दि.३०) कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासह जिल्ह्यातील काही कारखानदार यांच्यात ऊस दराबाबतची बैठक निष्फळ ठरली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदास राजु शेट्टी आदींच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. मात्र, ही बैठक कोणताही तोडगा न निघाल्याने निष्फळ ठरली. ५ नोव्हेबरला गळीत हंगाम सुरु होणार आहे. त्यामुळे तत्पुर्वी ऊसदराबाबत तोडगा निघणे अपेक्षित आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना ३२०० रुपये ऊसदरावर ठाम आहे. ३ वर्षांपासून एफआरपीमध्ये वाढ केली नसून, याही वर्षी उसाची एफआरपी २३०० रुपये ‘जैसे थे’ ठेवली आहे. मात्र, उसाची एफआरपी जरी कमी असली, तरी राज्यातील उसाच्या घटत्या क्षेत्रामुळे या हंगामात ऊसउत्पादकांची चंगळ होणार असून, गेल्या दहा वर्षांतील सर्वांत उच्चांकी दर मिळणार आहे. या वर्षीची एफआरपी जरी २३०० रुपये असली, तरीही या वर्षी ऊस उत्पादक एफआरपीनुसार दर घेणार नसून, जो कारखाना जादा दर देईन त्या कारखान्यांना शेतकरी ऊस घालणार आहे. बारमाही गुऱ्हाळे टनाला ३२०० रुपये दर देत आहेत, मग कारखानदार का देऊ शकत नाहीत, अशी मागणी ऊस उत्पादकांमधून होत आहे. > ३२०० रुपये मागणीवर आम्ही ठाम आहोत, कारखान्यांकडे पैसे उपलब्ध आहेत. मात्र, ते मागे-पुढे होऊ शकतात. आज होणारी बैठक एक औपचारिक बैठक आहे. पहिली उचल ३२०० रुपये देता येतीय, यासाठी कसे देता येतील, हा मार्ग काढण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. खासदार राजू शेट्टीअध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना>आजची साखर कारखान्यांची परिस्थिती पाहता साखर, इथेनॉल, वीज सर्वच गोष्टींना चांगले दर आहेत. त्यामुळे पहिली उचल ३२०० रुपये देता येत आहे. कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना किसन अहिर कारखान्याने गेल्या हंगामातील उसाला २७५० रुपये दर दिला आहे. मग या वर्षी तर साखरेची परिस्थिती चांगली आहे. वन टाईम ३२०० रुपये देता येतील. - सतीश काकडे, नेते शेतकरी कृती समिती > गुऱ्हाळे ३२०० रुपये दर देत आहेत, मग कारखानदांनी ३५०० रुपये दर द्यावा, अशी आमची माणगी आहे. इंदापूर-सोलापूर भागात दुष्काळामुळे ऊस नाही. बेणे व चाऱ्यासाठी ५ हजार रुपये टनाने ऊस सुरू आहे. त्यामुळे पहिली उचल ३५०० रुपयांच्या खाली देता कामा नये. गेल्या वर्षी कायदा मोडून ८०-२० अशी उचल दिली. ३ वर्षे झाले एफआरपी वाढविली नाही. - रघुनाथ पाटील, नेते शेतकरी संघटना>३२०० रुपये दर देता येईल यासाठी सरकारने पॉलिसी बदलण्याची गरज आहे. साखर दराशी निगडित पहिली उचल देता येईल. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर ३८ ते ३९ रुपयांवर आहेत. मात्र, सरकारने साखर निर्यात शुल्क वाढविले आहे. तर, कोठा पद्धत सुरू केल्याने वेळेत साखर न विकल्यास गुन्हे दाखल करण्याचे सांगितले आहे. जीवनावश्यक वस्तूंमधून साखर वगळली पाहिजे. - रंजन तावरे, अध्यक्ष, माळेगाव कारखाना