शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

गळीत हंगामास विलंब होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 01:19 IST

साखर कारखाने सुरू करण्यासाठी आधीच विलंब झाला आहे.

सोमेश्वरनगर : साखर कारखाने सुरू करण्यासाठी आधीच विलंब झाला आहे. शासनाने जरी ५ नोव्हेंबरला साखर कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली असली, तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला ३ हजार २०० रुपयांची पहिली उचल मिळावी,, अशी मागणी करत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे आधीच कारखान्यांच्या गळीत हंगामास उशीर झाला असताना, स्वाभिमानीच्या या भूमिकेमुळे कारखाने ५ नोव्हेंबरला सुरू होणार का, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऊसदराचे आंदोलन तीव्र झाले आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे आता अगोदरच साखर कारखाने सुरू होण्यास उशीर झाला आहे. जर स्वाभिमानी शेतकरी संघटना आपली मागणी तडजोडीने सोडवणार की आंदोलनाचे लोन पसरणार, याबाबत ऊसउत्पादकांमधून चर्चा झडू लागल्या आहेत. आज (दि.३०) कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासह जिल्ह्यातील काही कारखानदार यांच्यात ऊस दराबाबतची बैठक निष्फळ ठरली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदास राजु शेट्टी आदींच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. मात्र, ही बैठक कोणताही तोडगा न निघाल्याने निष्फळ ठरली. ५ नोव्हेबरला गळीत हंगाम सुरु होणार आहे. त्यामुळे तत्पुर्वी ऊसदराबाबत तोडगा निघणे अपेक्षित आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना ३२०० रुपये ऊसदरावर ठाम आहे. ३ वर्षांपासून एफआरपीमध्ये वाढ केली नसून, याही वर्षी उसाची एफआरपी २३०० रुपये ‘जैसे थे’ ठेवली आहे. मात्र, उसाची एफआरपी जरी कमी असली, तरी राज्यातील उसाच्या घटत्या क्षेत्रामुळे या हंगामात ऊसउत्पादकांची चंगळ होणार असून, गेल्या दहा वर्षांतील सर्वांत उच्चांकी दर मिळणार आहे. या वर्षीची एफआरपी जरी २३०० रुपये असली, तरीही या वर्षी ऊस उत्पादक एफआरपीनुसार दर घेणार नसून, जो कारखाना जादा दर देईन त्या कारखान्यांना शेतकरी ऊस घालणार आहे. बारमाही गुऱ्हाळे टनाला ३२०० रुपये दर देत आहेत, मग कारखानदार का देऊ शकत नाहीत, अशी मागणी ऊस उत्पादकांमधून होत आहे. > ३२०० रुपये मागणीवर आम्ही ठाम आहोत, कारखान्यांकडे पैसे उपलब्ध आहेत. मात्र, ते मागे-पुढे होऊ शकतात. आज होणारी बैठक एक औपचारिक बैठक आहे. पहिली उचल ३२०० रुपये देता येतीय, यासाठी कसे देता येतील, हा मार्ग काढण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. खासदार राजू शेट्टीअध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना>आजची साखर कारखान्यांची परिस्थिती पाहता साखर, इथेनॉल, वीज सर्वच गोष्टींना चांगले दर आहेत. त्यामुळे पहिली उचल ३२०० रुपये देता येत आहे. कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना किसन अहिर कारखान्याने गेल्या हंगामातील उसाला २७५० रुपये दर दिला आहे. मग या वर्षी तर साखरेची परिस्थिती चांगली आहे. वन टाईम ३२०० रुपये देता येतील. - सतीश काकडे, नेते शेतकरी कृती समिती > गुऱ्हाळे ३२०० रुपये दर देत आहेत, मग कारखानदांनी ३५०० रुपये दर द्यावा, अशी आमची माणगी आहे. इंदापूर-सोलापूर भागात दुष्काळामुळे ऊस नाही. बेणे व चाऱ्यासाठी ५ हजार रुपये टनाने ऊस सुरू आहे. त्यामुळे पहिली उचल ३५०० रुपयांच्या खाली देता कामा नये. गेल्या वर्षी कायदा मोडून ८०-२० अशी उचल दिली. ३ वर्षे झाले एफआरपी वाढविली नाही. - रघुनाथ पाटील, नेते शेतकरी संघटना>३२०० रुपये दर देता येईल यासाठी सरकारने पॉलिसी बदलण्याची गरज आहे. साखर दराशी निगडित पहिली उचल देता येईल. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर ३८ ते ३९ रुपयांवर आहेत. मात्र, सरकारने साखर निर्यात शुल्क वाढविले आहे. तर, कोठा पद्धत सुरू केल्याने वेळेत साखर न विकल्यास गुन्हे दाखल करण्याचे सांगितले आहे. जीवनावश्यक वस्तूंमधून साखर वगळली पाहिजे. - रंजन तावरे, अध्यक्ष, माळेगाव कारखाना