शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

कोर्ट ट्रायल नव्हे मिडीया ट्रायल , सनातनचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2016 19:24 IST

सनातन संघटनेवर मागील अनेक दिवसांपासून होत असणारे आरोप बिनबुडाचे असून संस्थेच्या निरापराध साधकांना या सर्व प्रकरणात गोवण्यात आले असल्याचा आरोप करत

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १९ : सनातन संघटनेवर मागील अनेक दिवसांपासून होत असणारे आरोप बिनबुडाचे असून संस्थेच्या निरापराध साधकांना या सर्व प्रकरणात गोवण्यात आले असल्याचा आरोप करत याचा निषेध करण्यासाठी हिंदुत्त्ववादी संघटनांतर्फे याचा निषेध करण्यासाठी शनिवारी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे, हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले उपस्थित होते.

वर्तक म्हणाले, दाभोलकर हत्याप्रकरणी सनातनचे डॉ. तावडे यांना अटक करून ६० दिवस होत आले, तरी अद्याप अन्वेषण यंत्रणा त्यांच्याविरोधात भक्कम पुरावा सादर करू शकली नाही. मात्र केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये निराधार बातम्या पेरल्या. पानसरे हत्या प्रकरणातही समीर गायकवाड यांच्यावरील खटला चालू करण्यास पानसरे कुटुंबियांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. सनातनच्या निष्पाप साधकांना कारागृहात खितपत ठेवण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला. अन्वेषण यंत्रणा आपले अपयश झाकण्यासाठीच हे सर्व करत आहे. मात्र सर्व हिंदुत्ववादी संघटनेवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात जनक्षोभ आहे. तो व्यक्त करण्यासाठीच पुण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्थेवरील अन्यायाच्या विरोधात २० आॅगस्ट या दिवशी भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानापासून सकाळी ८.३० वाजता या मोर्चाला प्रारंभ होईल. महाराणा प्रताप उद्यान, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शगून चौक, ओंकारेश्ववर मंदिर ते शनिवारवाडा असे मार्गक्रमण करत ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर येथे मोर्चाची सांगता होईल. यामध्ये ३० ते ४० संघटना सहभागी होणार असल्याचेही ते म्हणाले. पुण्याबरोबरच मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर या शहरांतही निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलेआहे.

आनंद दवे म्हणाले, दाभोलकर कुटुंबियांकडून या घटनेतील आरोपींसाठी दिशा देण्याचा प्रयत्न होत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. अनिंस कडून करण्यात येणारी सनातन संघटनेच्या बंदीची मागणी चुकीची असून आमचा संस्थेला पूर्ण पाठिंबा आहे. तपासयंत्रणांकडून अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे सोयीस्कररितीने दुर्लक्ष होत असून संस्थेच्या साधकांना तुरुंगात सडविण्याचा प्रयत्न हा मानहानी करणारा आहे. दाभोलकरांच्या ट्रस्टमधील आर्थिक घोटाळे आणि विदेशातून बेकायदेशीरपणे येणारा प्रचंड निधी यांमुळे दाभोलकरांची हत्या झाली आहे काय, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात येणार असल्याचे वर्तक यांनी सांगितले. 

 
 
 

पुरोगाम्यांच्या दबावापोटी सनातनच्या साधकांना नाहक अडकवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात येत आहे. पानसरे हत्या प्रकरणात अटकेत असलेले सनातनचे साधक समीर गायकवाड यांच्यावरील खटला चालू करावा, अशी मागणी करूनही तो खटला चालूच केला जात नाही. सनातनला नाहक आरोपीच्या पिंजऱ्याात उभे केले जात आहे. आज सनातनची कोर्ट ट्रायल नाही, तर मिडिया ट्रायल चालू आहे.अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था