शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

महिला अत्याचाराच्या प्रश्नावरून राज्यपाल-मुख्यमंत्री यांच्यात पत्रसंघर्ष; कोश्यारी यांच्या सूचनेला ठाकरेंचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 06:28 IST

साकीनाका येथील बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर भाजप महिला आघाडीचे एक शिष्टमंडळ राज्यपाल कोश्यारी यांना भेटले होते व राज्यातील महिलांवरील वाढत्या त्याचारासंदर्भात निवेदनही दिले होते. 

मुंबई : राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार यांच्यातील संघर्षाची धार अधिक तीव्र होत असतानाच आता त्यात एका पत्रसंघर्षाची भर पडली आहे. मुंबईत साकीनाका येथे महिलेवर झालेला बलात्कार, तिचा मृत्यू आणि महिलांची सुरक्षितता यावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. त्यावर, हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. देशातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी आपण पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करावी, असे जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्राद्वारे दिले आहे. (Correspondence between the Governor and the Chief Minister on the issue of atrocities against women; Thackeray's reply to Koshyari's suggestion)

साकीनाका येथील बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर भाजप महिला आघाडीचे एक शिष्टमंडळ राज्यपाल कोश्यारी यांना भेटले होते व राज्यातील महिलांवरील वाढत्या त्याचारासंदर्भात निवेदनही दिले होते. 

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रासोबत या निवेदनाची प्रत जोडली असून त्यात राज्यातील अलिकडच्या महिला अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. आपल्याला भेटलेल्या शिष्टमंडळांमधील महिलांच्या मनात एकूण महिला वर्गाविषयी असुरक्षिततेची भावना दिसून आली, तसेच महिला आमदारांनीही याकडे लक्ष वेधले होते, असे नमूद करून राज्यपालांनी या पत्रात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.

सरकार सरकारचे काम करीत आहे. त्यामुळे आता विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलावून चर्चा घडविण्याची आपली सूचना नवा वाद निर्माण करू शकते, सरकारविरोधी लोकांची विशेष अधिवेशनाची मागणी सुरू असताना राज्यपालांनी त्याच सुरांत सूर मिसळून तीच मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे.     - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील मुद्दे...- गुजरातमध्ये बलात्काराच्या रोज तीन घटना घडतात. यावर चर्चा करायची झाल्यास गुजरात विधानसभेचे एक महिन्याचे विशेष अधिवेशनच बोलावावे लागेल.

- जगात दिल्लीची ‘बलात्काराची राजधानी’ अशी नाचक्की झाली आहे. उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या नृशंस घटना सतत घडत असतात. 

- भाजपशासित ‘रामराज्या’त महिला खरोखरच सुरक्षित आहेत काय? गुजरात मॉडेलमध्ये महिला खरेच सुरक्षित आहेत काय?

- आपण मुख्यमंत्री होतात त्या उत्तराखंडमध्ये महिला अत्याचार दीडशे टक्क्यांनी वाढले, तिथे काय उपाययोजना करावी?

- जम्मू-कश्मीरमधील पंडितांच्या माय-भगिनींना नराधमांच्या अत्याचाराचे शिकार व्हावे लागले. त्यांच्यावरील अत्याचार तालिबान्यांना लाजविणारे आहेत, पण जम्मू-कश्मिरात भाजपचे सरकार असताना या प्रश्नी ना विशेष अधिवेशन बोलावले ना कधी चर्चा केली. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीMolestationविनयभंगWomenमहिला