शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

महिला अत्याचाराच्या प्रश्नावरून राज्यपाल-मुख्यमंत्री यांच्यात पत्रसंघर्ष; कोश्यारी यांच्या सूचनेला ठाकरेंचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 06:28 IST

साकीनाका येथील बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर भाजप महिला आघाडीचे एक शिष्टमंडळ राज्यपाल कोश्यारी यांना भेटले होते व राज्यातील महिलांवरील वाढत्या त्याचारासंदर्भात निवेदनही दिले होते. 

मुंबई : राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार यांच्यातील संघर्षाची धार अधिक तीव्र होत असतानाच आता त्यात एका पत्रसंघर्षाची भर पडली आहे. मुंबईत साकीनाका येथे महिलेवर झालेला बलात्कार, तिचा मृत्यू आणि महिलांची सुरक्षितता यावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. त्यावर, हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. देशातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी आपण पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करावी, असे जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्राद्वारे दिले आहे. (Correspondence between the Governor and the Chief Minister on the issue of atrocities against women; Thackeray's reply to Koshyari's suggestion)

साकीनाका येथील बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर भाजप महिला आघाडीचे एक शिष्टमंडळ राज्यपाल कोश्यारी यांना भेटले होते व राज्यातील महिलांवरील वाढत्या त्याचारासंदर्भात निवेदनही दिले होते. 

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रासोबत या निवेदनाची प्रत जोडली असून त्यात राज्यातील अलिकडच्या महिला अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. आपल्याला भेटलेल्या शिष्टमंडळांमधील महिलांच्या मनात एकूण महिला वर्गाविषयी असुरक्षिततेची भावना दिसून आली, तसेच महिला आमदारांनीही याकडे लक्ष वेधले होते, असे नमूद करून राज्यपालांनी या पत्रात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.

सरकार सरकारचे काम करीत आहे. त्यामुळे आता विधिमंडळाचे खास अधिवेशन बोलावून चर्चा घडविण्याची आपली सूचना नवा वाद निर्माण करू शकते, सरकारविरोधी लोकांची विशेष अधिवेशनाची मागणी सुरू असताना राज्यपालांनी त्याच सुरांत सूर मिसळून तीच मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे.     - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील मुद्दे...- गुजरातमध्ये बलात्काराच्या रोज तीन घटना घडतात. यावर चर्चा करायची झाल्यास गुजरात विधानसभेचे एक महिन्याचे विशेष अधिवेशनच बोलावावे लागेल.

- जगात दिल्लीची ‘बलात्काराची राजधानी’ अशी नाचक्की झाली आहे. उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या नृशंस घटना सतत घडत असतात. 

- भाजपशासित ‘रामराज्या’त महिला खरोखरच सुरक्षित आहेत काय? गुजरात मॉडेलमध्ये महिला खरेच सुरक्षित आहेत काय?

- आपण मुख्यमंत्री होतात त्या उत्तराखंडमध्ये महिला अत्याचार दीडशे टक्क्यांनी वाढले, तिथे काय उपाययोजना करावी?

- जम्मू-कश्मीरमधील पंडितांच्या माय-भगिनींना नराधमांच्या अत्याचाराचे शिकार व्हावे लागले. त्यांच्यावरील अत्याचार तालिबान्यांना लाजविणारे आहेत, पण जम्मू-कश्मिरात भाजपचे सरकार असताना या प्रश्नी ना विशेष अधिवेशन बोलावले ना कधी चर्चा केली. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीMolestationविनयभंगWomenमहिला