शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

CoronaVirus योगी सरकारचा मजुरांना ठेंगा पण विद्यार्थ्यांच्या प्रवासाला ग्रीन सिग्नल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 20:30 IST

केंद्र सरकारने सर्वच राज्यांना आपले मजूर तसेच कामगार यांना आपल्या गावी पाठवण्यात यावे असा आदेश काढला होता. मजूर कामगार यांना न स्वीकारणारे उत्तर प्रदेश सरकारने मात्र नवोदय विद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांना तसेच ३ शिक्षकांना स्वीकारण्याचे ठरवले असून, सावंतवाडीतून सोमवारी रात्री उशिरा एक बस उत्तर प्रदेशकडे रवाना झाली आहे.

- अनंत जाधव सावंतवाडी : उत्तर प्रदेश सरकारने आपल्या मजूर कामगारांना स्वीकारणार नसल्याचे जाहीर करत तसे पत्रच महाराष्ट्र सरकारला दिल्यानंतर याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. या विषयावरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले असतानाच महाराष्ट्रासाठी पहिल्यांदाच आनंददायी बातमी आली असून, उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्रात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मात्र स्वीकारण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २१ मुलांना घेउन जाणारी पहिली बस सोमवारी रात्री सावंतवाडीतून सुटली आहे. या बसला प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. या बसमध्ये मुलांसोबत तीन शिक्षकही आहेत.

केंद्र सरकारने सर्वच राज्यांना आपले मजूर तसेच कामगार यांना आपल्या गावी पाठवण्यात यावे असा आदेश काढला होता. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने परराज्यातील मजूर कामगार यांची यादी सुध्दा तयार केली होती. मात्र दोन दिवसापूर्वी उत्तरप्रदेश सरकारने महाराष्ट्रात अडकलेल्या मजूर कामगार यांना स्वीकारणार नाही. असे जाहीर केल्याने वादाची ठिणगी पडली आहे. मजूर कामगार न स्वीकारत नसल्याने महाविकास आघाडी व भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप ही सुरू झाले आहेत.

मात्र हे आरोप प्रत्यारोप सुरू असतनाच सिंधुदुर्गसाठी आनंदाची बातमी आली असून, मजूर कामगार यांना न स्वीकारणारे उत्तर प्रदेश सरकारने मात्र नवोदय विद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांना तसेच ३ शिक्षकांना स्वीकारण्याचे ठरवले असून, सावंतवाडीतून सोमवारी रात्री उशिरा एक बस उत्तर प्रदेशकडे रवाना झाली आहे. या बसला सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

कारण हे लॉकडाउन झाल्यापासून सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांचे आई वडिलही चिंतेत होते. ते सतत येथील जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात होते. मात्र त्यांना आपली मुले केव्हा येणार याची प्रतिक्षा करण्याशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते. केंद्र सरकारने चार दिवसापूर्वी राज्यात अडकून पडलेल्यांना आपल्या घरी सोडण्याचे आदेश सर्व सरकारना दिले खरे पण उत्तर प्रदेशने आपण बाहेरील मजुरांना तसेच कामगारांना स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांच्या चिंतेत आणखी भर पडली होती.

या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अखेर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्यासह सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या महत्वाच्या अधिकाºयांशी संपर्क करून या मुलांना अखेर उत्तर प्रदेशकडे रवाना केले. तत्पूर्वी या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. त्यांच्यासाठी ई पास तयार करण्यात आले. त्यानंतरच शासनाने त्यांना जाण्याची परवानगी दिली आहे. एसटी बस बरोबर अतिरिक्त चालक तसेच मॅकानिक ही पाठवण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेश सरकारने पहिल्यांदाच मुलांना स्वीकारले :खांडेकरउत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्रासह अन्य राज्यातून येणारे कामगार, ूमजूर यांना उत्तर प्रदेशात घेतले जाणार नाही, अशा प्रकारचे पत्र राज्य सरकारला दोन दिवसांपूर्वी दिले होते. मात्र असे असतानाही सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी विशेष मेहनत घेतल्याने हे सर्व शक्य झाल्याचे सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus धक्कादायक! आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना; सिंधुदुर्गात खळबळ

CoronaVirus अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठी पंतप्रधानांना राहुल गांधींचा सल्ला

किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले

चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण

दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्या