शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

CoronaVirus योगी सरकारचा मजुरांना ठेंगा पण विद्यार्थ्यांच्या प्रवासाला ग्रीन सिग्नल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 20:30 IST

केंद्र सरकारने सर्वच राज्यांना आपले मजूर तसेच कामगार यांना आपल्या गावी पाठवण्यात यावे असा आदेश काढला होता. मजूर कामगार यांना न स्वीकारणारे उत्तर प्रदेश सरकारने मात्र नवोदय विद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांना तसेच ३ शिक्षकांना स्वीकारण्याचे ठरवले असून, सावंतवाडीतून सोमवारी रात्री उशिरा एक बस उत्तर प्रदेशकडे रवाना झाली आहे.

- अनंत जाधव सावंतवाडी : उत्तर प्रदेश सरकारने आपल्या मजूर कामगारांना स्वीकारणार नसल्याचे जाहीर करत तसे पत्रच महाराष्ट्र सरकारला दिल्यानंतर याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. या विषयावरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले असतानाच महाराष्ट्रासाठी पहिल्यांदाच आनंददायी बातमी आली असून, उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्रात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मात्र स्वीकारण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २१ मुलांना घेउन जाणारी पहिली बस सोमवारी रात्री सावंतवाडीतून सुटली आहे. या बसला प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. या बसमध्ये मुलांसोबत तीन शिक्षकही आहेत.

केंद्र सरकारने सर्वच राज्यांना आपले मजूर तसेच कामगार यांना आपल्या गावी पाठवण्यात यावे असा आदेश काढला होता. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने परराज्यातील मजूर कामगार यांची यादी सुध्दा तयार केली होती. मात्र दोन दिवसापूर्वी उत्तरप्रदेश सरकारने महाराष्ट्रात अडकलेल्या मजूर कामगार यांना स्वीकारणार नाही. असे जाहीर केल्याने वादाची ठिणगी पडली आहे. मजूर कामगार न स्वीकारत नसल्याने महाविकास आघाडी व भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप ही सुरू झाले आहेत.

मात्र हे आरोप प्रत्यारोप सुरू असतनाच सिंधुदुर्गसाठी आनंदाची बातमी आली असून, मजूर कामगार यांना न स्वीकारणारे उत्तर प्रदेश सरकारने मात्र नवोदय विद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांना तसेच ३ शिक्षकांना स्वीकारण्याचे ठरवले असून, सावंतवाडीतून सोमवारी रात्री उशिरा एक बस उत्तर प्रदेशकडे रवाना झाली आहे. या बसला सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

कारण हे लॉकडाउन झाल्यापासून सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांचे आई वडिलही चिंतेत होते. ते सतत येथील जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात होते. मात्र त्यांना आपली मुले केव्हा येणार याची प्रतिक्षा करण्याशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते. केंद्र सरकारने चार दिवसापूर्वी राज्यात अडकून पडलेल्यांना आपल्या घरी सोडण्याचे आदेश सर्व सरकारना दिले खरे पण उत्तर प्रदेशने आपण बाहेरील मजुरांना तसेच कामगारांना स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांच्या चिंतेत आणखी भर पडली होती.

या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अखेर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्यासह सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या महत्वाच्या अधिकाºयांशी संपर्क करून या मुलांना अखेर उत्तर प्रदेशकडे रवाना केले. तत्पूर्वी या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. त्यांच्यासाठी ई पास तयार करण्यात आले. त्यानंतरच शासनाने त्यांना जाण्याची परवानगी दिली आहे. एसटी बस बरोबर अतिरिक्त चालक तसेच मॅकानिक ही पाठवण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेश सरकारने पहिल्यांदाच मुलांना स्वीकारले :खांडेकरउत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्रासह अन्य राज्यातून येणारे कामगार, ूमजूर यांना उत्तर प्रदेशात घेतले जाणार नाही, अशा प्रकारचे पत्र राज्य सरकारला दोन दिवसांपूर्वी दिले होते. मात्र असे असतानाही सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी विशेष मेहनत घेतल्याने हे सर्व शक्य झाल्याचे सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus धक्कादायक! आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना; सिंधुदुर्गात खळबळ

CoronaVirus अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठी पंतप्रधानांना राहुल गांधींचा सल्ला

किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले

चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण

दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्या