शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

Coronavirus : दहावीचा शेवटचा पेपर होणार की नाही? विद्यार्थी, पालकांची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 3:42 AM

coronavirus : सुरुवातीला नववी व अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येतील आणि भूगोल पेपरचा निर्णय ३१ मार्चनंतर घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्र्यांकडून घोषित करण्यात आले होते.

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावीच्या परीक्षेतील शेवटचा भूगोलाचा पेपर शालेय शिक्षण विभागाकडून ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. ३१ मार्चनंतर याबाबतीत निर्णय घेतला जाणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी सोमवारी देशात २१ दिवसांच्या लॉकडाउनच्या घोषणेनंतर या पेपरवर अनिश्चिततेचे सावट पसरल्याने दहावीचे विद्यार्थी व पालकांची धाकधूक वाढली आहे.सुरुवातीला नववी व अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येतील आणि भूगोल पेपरचा निर्णय ३१ मार्चनंतर घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्र्यांकडून घोषित करण्यात आले होते. मात्र देशभरातील लॉकडाउनच्या घोषणेनंतर या परीक्षा होतील की नाही किंवा घ्याव्यात की नाहीत, असा प्रश्न पालक, विद्यार्थी, शिक्षकांपुढे उभा राहिला आहे. लॉकडाउनच्या घोषणेनंतर सीईटी सेलकडून होणारी १३ ते २३ एप्रिल दरम्यानची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली. यामुळे दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर होईल की नाही, असा गोंधळ पालकांमध्ये उडाला.पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या मूल्यांकनाच्या सरासरी गुणांवर पुढील वर्गात प्रवेश द्यावा, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. असाच निर्णय दहावीच्या भूगोलाच्या पेपरच्या बाबतीत घेता येईल का, याची चाचपणी शिक्षण विभागाने करावी, असा सूर पालकांमधून येत आहे. शिक्षण विभागाच्या बेजबाबदारपणामुळे आधीच पालक विद्यार्थ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हा उरलेला पेपर घ्यायचाच हा हट्ट करण्यात अर्थ नाहीच. याऐवजी योग्य निर्णय घेऊन वेळीच पालक, विद्यार्थ्यांना दिलासा कसा देता येईल याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली आहे.‘विद्यार्थ्यांना वेठीस धरु नये’राज्य शिक्षण मंडळाने ज्या विषयांची परीक्षा झाली आहे, त्याच विषयांचे गुण ग्राह्य धरीत निकाल लावावा, ४० गुणांसाठी पुन्हा विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, असे मत सह्याद्री, कांदिवली येथे राहणारे पालक मंगेश कळंबे यांनी व्यक्त केले. तर पेपर होईल की नाही याबाबत आम्हाला शंकाच आहे, मात्र आम्ही एका विषयाचाच अभ्यास किती दिवस करत राहायचा, असा सवाल दहावीच्या सुमेध रहाटे याने उपस्थित केला.

टॅग्स :examपरीक्षाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस