शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Update: राज्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच; आज तब्बल 62,097 नवे कोरोना बाधित, कडक लॉकडाऊनची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 22:58 IST

राज्यात आतापर्यंत एकूण 39,60,359 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण 32,13,464 रुग्ण कोरोनातून बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. (CoronaVirus)

मुंबई - संपूर्ण देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मात्र, याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसत आहे. राज्य सरकार प्रयत्न करत असूनही महाराष्ट्रातील नव्या कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 62,097 नवे कोरोना बाधीत सरमोर आले आहेत. तर याच काळात नवीन 54,224 कोरोना बाधित बरे झाले आहेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज 519 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा आता 61,343 वर पोहोचला आहे. (CoronaVirus update Maharashtra reports 62097 new covid-19 cases)

राज्यात आतापर्यंत एकूण 39,60,359 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण 32,13,464 रुग्ण कोरोनातून बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. याच बरोबर राज्यात आता एकूण 6,83,856 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.14 टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात सोमवारी, 58,924 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 351 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील टॉप 15 मुद्दे... एका क्लिकवर

लावला जाऊ शकतो कडक लॉकडाउन -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच संपूर्ण लॉकडाऊन जाहीर होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच, मंत्री अस्लम शेख यांनीही संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले होते. त्यानुसार, बुधवारी मध्यरात्रीपासून राज्यात पुढील 15 दिवसासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भातील घोषणा बुधवारी होणार असल्याची मंत्रालयीन सुत्रांची माहिती आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. 

CoronaVirus : कोरोनाचा डबल म्यूटेंट व्हेरिएंट किती घातक? लस ठरेल का परिणामकारक? जाणून घ्या

असा असेल कडक लॉकडाऊन -सरकारच्या लॉकडाऊन घोषणेनुसार खासगी कार्यालये पूर्णपणे बंद राहतील. तर, सरकारी कार्यालयात 50 टक्क्यांपेक्षाही कमी कर्मचाऱ्यांनी हजर रहावे, ज्यांना शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा, असे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक वाहतूकही सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात येणार असून केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच ती वाहतूक उपलब्ध राहिल. जिल्हाबंदीच्या दृष्टीकोनातूनही सरकार विचार करत आहे. त्यामध्ये, जिल्ह्याबाहेर जायचे असल्यास यापूर्वीप्रमाणे प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागणार असल्याचे समजते. 

अत्यावश्यक सेवांना सकाळी 7 ते 11 पर्यंतच परवानगी -राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह ), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच सुरू राहतील. त्यानंतर संपूर्ण दिवसभर ही दुकाने बंद राहणार आहेत. 

CoronaVirus : कोरोना काळात यमराजांपर्यंत कसे पोहोचतायत लोक? आनंद महिंद्रांनी ट्विट करून सांगितलं

राज्यांनी लॉकडाऊन टाळायचाच प्रयत्न करा, तो शेवटचा पर्याय असू देत - पंतप्रधानलहान मित्रांना माझी विनंती आहे, घरातील लोकांना घराबाहेर पडू देऊ नका. प्रसार माध्यमांनीही लोकांना कोरोना निमयावलींचे पालन करण्याचे आवाहन करावे. आजच्या स्थितीत आपल्याला लॉकडाऊनपासून दूर रहायचं आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा, लॉकडाऊन पासून दूर राहण्याचा प्रयत्न राज्य सरकारने करावा, असे आवाहन मोदींनी केलंय.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे