शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

CoronaVirus : ...तर राज्यात 2 ते 4 आठवड्यांत धडकू शकते कोरोनाची तिसरी लाट, कोवीड-19 टास्क फोर्सचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 11:56 AM

या बैठकीत सादर केलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेदरम्यान राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होऊ शकते. तसेच, सक्रीय रुग्णांची संख्या 80 लाखवर पोहोचू शकते. (Corona Virus Third wave)

मुंबई- देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड हाहाकार माजविला. आता ही लाट ओसरत असतानाच महाराष्ट्र कोवीड-19 टास्क फोर्सने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. गेल्या तीन दिवसांतील गर्दी पाहता आणि कोरोना व्हायरस प्रोटोकॉलचे योग्य पद्धतीने पालन केले गेले नाही, तर कोरोनाची संभाव्य तिसरी लाट (CoronaVirus Third wave) दोन ते चार आठवड्यातच महाराष्ट्र अथवा मुंबईला धडकू शकते, असे महाराष्ट्र कोवीड-19 टास्क फोर्सने म्हटले आहे. (CoronaVirus Third wave could hit as early as in 2-4 weeks, says Maharashtra Covid-19 task force)

तथापि, निम्न मध्यम वर्गाच्या समुहावर जेवढा परिणाम होतो, तेवढा परिणाम मुलांवर होणार नाही, असेही यावेळी म्हणण्यात आले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तयारीसंदर्भात समीक्षेसाठी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्सने हा अंदाज वर्तवला आहे. यावेळी टास्क फोर्सचे सदस्य, राज्याचे आरोग्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

CoronaVirus: भारतात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर 'ही' लस सर्वात प्रभावी, कंपनीचा मोठा दावा!

या बैठकीत सादर केलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेदरम्यान राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होऊ शकते. तसेच, सक्रीय रुग्णांची संख्या 80 लाखवर पोहोचू शकते. तसेच, कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 19 लाख नोंदवली गेली. तर दुसऱ्या लाटेत ही संख्या वाढून 40 लाखांवर पोहोचली, असेही या बैठकीत सांगण्यात आले आहे. तथापि, यात मागील दोन लाटांप्रमाणेच 10 टक्के रुग्ण हे मुले आणि तरूण असू शकतात, असा अंदाजही यावेळी वर्तवण्यात आला आहे.

यावेळी टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, “दुसरी लाट ओसरल्यानंतर केवळ चार आठवड्यातच इग्लंडला तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. यामुळे, आपण सतर्क झालो नाही आणि कोरोना व्हायरस प्रोटोकॉलचे योग्य पद्धतीने पालन केले गेले नाही, तर आपल्यावरही ती वेळ येऊ शकते.”

कोव्हॅक्सीनमध्ये वापरलं गेलं गाईच्या वासराचं सीरम? काँग्रेसच्या प्रश्नावर भारत बायोटेकनं दिलं असं स्पष्टीकरण

“अनियंत्रित गर्दी आणि मास्क लावणे तसेच गरज नसताना घराबाहेर न पडणे, यांसारख्या कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करणे हे अत्यंत चिंताजनक आहे. मुंबईत काही ठराविक वेळेत निर्बंध असतानाही, दिवसभर लोकांची ये-जा सुरूच असते," असे या बैठकीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसState Governmentराज्य सरकारMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र