शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: योजना स्थगित वा रद्द करण्याची सामाजिक न्याय विभागावर वेळ,मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनांनाही खीळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 06:33 IST

एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ३३ टक्के तरतूद मिळणार आहे, तेव्हा आवर्ती योजनांपैकी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनांच्या खर्चावर खूप मर्यादा येतील, असे विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.

 - यदु जोशी मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात शासकीय विभागांवर ३३ टक्के खर्चाची मर्यादा आणल्याचा मोठा फटका सामाजिक न्याय विभागाला बसणार असून काही योजना रद्द तर काही स्थगित कराव्या लागणार आहेत.वित्त विभागाच्या ४ मेच्या आदेशात भांडवली खर्च व बांधकामे करता येणार नाहीत, असे बंधन घातले. त्यामुळे रमाई आवास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामूहिक विकास योजना (राज्यस्तरीय), जिल्हा स्तरावरील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती (पूर्वाश्रमीची दलित वस्ती विकास) विकास योजना, शासकीय वसतिगृह निवासी शाळा बांधकामे तसेच नवीन प्रस्तावित योजना सर्व बंद कराव्या लागतील. एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ३३ टक्के तरतूद मिळणार आहे, तेव्हा आवर्ती योजनांपैकी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनांच्या खर्चावर खूप मर्यादा येतील, असे विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन सबळीकरण योजनेवर देखील परिणाम होणार आहे. कारण ही भांडवली खर्चाची योजना आहे. ती एक वर्ष स्थगित ठेवावी लागेल. शेतकऱ्यांच्या निकडीच्या विद्युत पंप, विहीर अनुदान, पाइप लाइन अनुदान यावरही परिणाम होणार आहे.२०२०-२१ च्या अर्थसंकल्पात सामाजिक न्याय विभागासाठीची तरतूद ९,६६८ कोटी रुपये होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विभागाला मोठा निधी देऊन न्याय देण्याची भूमिका घेतली, पण कोरोनामुळे विभागाच्या आशांवर पाणी फिरणार आहे.सामाजिक न्याय विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी काही महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली होती, मात्र आता त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी निधीची कमतरता भासणार आहे. मुंबई आणि पुणे येथील विद्यापीठात ५०० विद्यार्थी क्षमता असलेले वसतिगृह मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, आता हा प्रकल्प तूर्त बारगळला आहे.राज्यातील सर्व मागासवर्गीय वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यासाठी मध्यवर्ती भोजनालय सुरू करण्याचा विषय प्राधान्याने हाती घेण्यात आला होता. आता ही महत्त्वाकांक्षी योजना पुढे ढकलावी लागणार आहे. सर्व वसतीगृहांत सीसीटीव्ही बसविणे आणि शाळा, वसतिगृहाचे आधुनिकीकरणाची योजनादेखील स्थगित करावी लागेल.आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील मागासवर्गीय, ऊसतोड व वीटभट्टी महिला मजुरांना शेळी पालन प्रकल्प पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला होता, आता या प्रकल्पापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कोविडच्या परिणामी शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असून ती कधी उघडतील, हे सांगता येणार नाही. सामाजिक न्याय विभागाची विद्यालये व वसतिगृह देखील बंद आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ई लर्निंग, दूरस्थ शिक्षण या पर्यायांचा विचार करण्यात येत आहे.बंधनाची झळ न पोहोचण्यासाठी नियोजनवित्त विभागाने घातलेल्या बंधनांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना व कामांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक सुविधा ३१ मेपर्यंत विनाव्यत्यय सुरू राहतील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. एकूणच बंधनांची झळ विभागाच्या योजनांना पोहोचणार नाही, या पद्धतीने नियोजन करू. - धनंजय मुंडे, मंत्री, सामाजिक न्याय विभाग

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार