शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

coronavirus: चाकरमान्यांसाठीचे धोरण एकदाच काय ते निश्चित करा, नितेश राणेंचा राज्य सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 18:59 IST

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली तरी कोकणी चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत अद्याप तरी संभ्रमाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देमुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांबाबत राज्य सरकारने एकदाच काय ते धोरण निश्चित करावेजिल्हा प्रशासनाकडून कधी फॉर्म, कधी नाव मागितली जात आहेत. कधी भरलेले फॉर्म परत घेतले जात आहेतअशा परिस्थितीत सरकारने उशीर होण्याआधी स्पष्टीकरण द्यावे

मुंबई - राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे अनेकजण मुंबई, पुण्यात अडकून पडले आहेत. यामध्ये कोकणातील चाकरमान्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. दरम्यान, परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली तरी कोकणी चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत अद्याप तरी संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांबाबत राज्य सरकारने एकदाच काय ते धोरण निश्चित करावे, असा सल्ला भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

कोरोनाचा वाढता फैलाव आणि लॉकडाऊन यामुळे मुंबई आणि आसपासच्या उपनगरात राहत असलेल्या चाकरमान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लॉकडाऊनदरम्यान आपल्याला गावी जाऊ द्यावे अशी मागणी मुंबईकर चाकरमान्यांकडून करण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप तरी स्पष्ट निर्णय होऊ शकलेला नाही. त्यावरून नितेश राणे यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

 याबाबत केलेल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात की,’’राज्य सरकारने मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांबद्दल एकदाच काय ते धोरण निश्चित करावे. जिल्हा प्रशासनाकडून कधी फॉर्म, कधी नाव मागितली जात आहेत. कधी भरलेले फॉर्म परत घेतले जात आहेत. त्यामुळे गावात भांडणे सुरु झाली आहेत. अशा परिस्थितीत सरकारने उशीर होण्याआधी स्पष्टीकरण द्यावे.’’

दरम्यान, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे जास्त रुग्ण सापडलेले नाहीत. तसेच जे रुग्ण सापडले आहेत त्यापैकी बहुतांश रुग्ण हे मुंबई आणि आसपासच्या शहरांतून कोकणात आलेले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईkonkanकोकणNitesh Raneनीतेश राणे Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार