शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

coronavirus: चाकरमान्यांसाठीचे धोरण एकदाच काय ते निश्चित करा, नितेश राणेंचा राज्य सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 18:59 IST

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली तरी कोकणी चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत अद्याप तरी संभ्रमाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देमुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांबाबत राज्य सरकारने एकदाच काय ते धोरण निश्चित करावेजिल्हा प्रशासनाकडून कधी फॉर्म, कधी नाव मागितली जात आहेत. कधी भरलेले फॉर्म परत घेतले जात आहेतअशा परिस्थितीत सरकारने उशीर होण्याआधी स्पष्टीकरण द्यावे

मुंबई - राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे अनेकजण मुंबई, पुण्यात अडकून पडले आहेत. यामध्ये कोकणातील चाकरमान्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. दरम्यान, परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली तरी कोकणी चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत अद्याप तरी संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांबाबत राज्य सरकारने एकदाच काय ते धोरण निश्चित करावे, असा सल्ला भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

कोरोनाचा वाढता फैलाव आणि लॉकडाऊन यामुळे मुंबई आणि आसपासच्या उपनगरात राहत असलेल्या चाकरमान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लॉकडाऊनदरम्यान आपल्याला गावी जाऊ द्यावे अशी मागणी मुंबईकर चाकरमान्यांकडून करण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप तरी स्पष्ट निर्णय होऊ शकलेला नाही. त्यावरून नितेश राणे यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

 याबाबत केलेल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात की,’’राज्य सरकारने मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांबद्दल एकदाच काय ते धोरण निश्चित करावे. जिल्हा प्रशासनाकडून कधी फॉर्म, कधी नाव मागितली जात आहेत. कधी भरलेले फॉर्म परत घेतले जात आहेत. त्यामुळे गावात भांडणे सुरु झाली आहेत. अशा परिस्थितीत सरकारने उशीर होण्याआधी स्पष्टीकरण द्यावे.’’

दरम्यान, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे जास्त रुग्ण सापडलेले नाहीत. तसेच जे रुग्ण सापडले आहेत त्यापैकी बहुतांश रुग्ण हे मुंबई आणि आसपासच्या शहरांतून कोकणात आलेले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईkonkanकोकणNitesh Raneनीतेश राणे Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार