शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

coronavirus: चाकरमान्यांसाठीचे धोरण एकदाच काय ते निश्चित करा, नितेश राणेंचा राज्य सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 18:59 IST

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली तरी कोकणी चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत अद्याप तरी संभ्रमाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देमुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांबाबत राज्य सरकारने एकदाच काय ते धोरण निश्चित करावेजिल्हा प्रशासनाकडून कधी फॉर्म, कधी नाव मागितली जात आहेत. कधी भरलेले फॉर्म परत घेतले जात आहेतअशा परिस्थितीत सरकारने उशीर होण्याआधी स्पष्टीकरण द्यावे

मुंबई - राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे अनेकजण मुंबई, पुण्यात अडकून पडले आहेत. यामध्ये कोकणातील चाकरमान्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. दरम्यान, परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली तरी कोकणी चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत अद्याप तरी संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांबाबत राज्य सरकारने एकदाच काय ते धोरण निश्चित करावे, असा सल्ला भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

कोरोनाचा वाढता फैलाव आणि लॉकडाऊन यामुळे मुंबई आणि आसपासच्या उपनगरात राहत असलेल्या चाकरमान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लॉकडाऊनदरम्यान आपल्याला गावी जाऊ द्यावे अशी मागणी मुंबईकर चाकरमान्यांकडून करण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप तरी स्पष्ट निर्णय होऊ शकलेला नाही. त्यावरून नितेश राणे यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

 याबाबत केलेल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात की,’’राज्य सरकारने मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांबद्दल एकदाच काय ते धोरण निश्चित करावे. जिल्हा प्रशासनाकडून कधी फॉर्म, कधी नाव मागितली जात आहेत. कधी भरलेले फॉर्म परत घेतले जात आहेत. त्यामुळे गावात भांडणे सुरु झाली आहेत. अशा परिस्थितीत सरकारने उशीर होण्याआधी स्पष्टीकरण द्यावे.’’

दरम्यान, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे जास्त रुग्ण सापडलेले नाहीत. तसेच जे रुग्ण सापडले आहेत त्यापैकी बहुतांश रुग्ण हे मुंबई आणि आसपासच्या शहरांतून कोकणात आलेले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईkonkanकोकणNitesh Raneनीतेश राणे Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार