शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

CoronaVirus News: ट्विटरवर #UddhavMustAnswer ट्रेंडिंग; कोरोनावरून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 09:21 IST

CoronaVirus Marathi News: मुख्यमंत्र्यांच्या बचावासाठी काँग्रेस नेता धावला; केंद्र सरकारवर निशाणा

मुंबई: देशातील कोरोनाबाधितांची संख्या ५६ हजारांच्या पुढे गेली असून त्यात महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. एकट्या मुंबईत कोरोनाचे ११ हजारांहून अधिक रुग्ण आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल रोष व्यक्त होत आहे. ट्विटरवर #UddhavMustAnswer हॅशटॅग ट्रेंडमध्ये असून अनेकजण या हॅशटॅगचा वापर करुन मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत आहेत.सायन रुग्णालयातल्या वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या शेजारी मृतदेह ठेवण्यात आले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर भाष्य करताना यावरुन राजकारण करण्याची गरज नाही. रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या शरीरातून विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी तो काळ्या रंगाच्या मोठ्या पिशवीमध्ये ठेवला जातो, असं उत्तर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं. यानंतर भाजपा महाराष्ट्रनं एक ट्विट केलं. आरोग्यमंत्र्यांच्या असंवेदनशील प्रतिक्रियेशी सहमत आहात का, असा प्रश्न भाजपानं ट्विटमधून विचारला. या ट्विटमध्ये #UddhavMustAnswer वापरण्यात आला. 

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबद्दल या बैठकीत चर्चा झाली. मंत्रालयात झालेल्या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मनसे प्रमुख राज ठाकरेंसह अनेक नेते उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री मंत्रालयात नव्हते. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व नेत्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री स्वत: मंत्रालयात येत नसतील, तर ते इतरांना कशाला बोलावतात, असा प्रश्न विचारला जात आहे. इतर नेतेही उद्धव यांच्याप्रमाणेच स्वत:च्या घरातून बैठकीला उपस्थित राहू शकले असते, असं अनेकांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या, विशेषत: मुंबईत झपाट्यानं वाढणारे रुग्ण, पीपीई किट्स, मास्कची कमतरता यावरुन अनेकांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी काही जणांनी केली आहे.

ट्विटरवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सुरू असलेल्या टीकेला काँग्रेस नेते चरणसिंग सप्रांनी उत्तर दिलं आहे. राज्य सरकारनं केलेल्या कामांची माहिती सप्रा यांनी आकडेवारीसह दिली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारनं उचलेली पावलं, घेतलेले महत्त्वाचे निर्णय यांचा तपशील सप्रा यांनी दिला आहे.

 

कोरोनाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक आहे. मात्र केंद्र सरकार जीएसटीमधील महाराष्ट्राचा वाटा अजूनही देत नाही. राज्याचे १५ हजार कोटी मोदी सरकारनं थकवले आहेत. २५ हजार कोटींच्या पॅकेजची गरज असताना केवळ १६०० कोटी रुपये देण्यात आले आहेत, असं सप्रांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस