शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

coronavirus: कांदा उत्पादकांच्या मुळावर लॉकडाउन! शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 07:27 IST

कोरोना रुग्ण आढळल्याने आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ७ मे पासून लिलाव बेमुदत बंद करण्यात आले आहेत.

- योगेश बिडवई  मुंबई : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनचा कांदा उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला असून देशभरात मागणीत घट झाल्याने दीड महिन्यात कांद्याचे भाव निम्म्यावर आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहेत. त्यातच कोरोनाच्या संक्रमणामुळे राज्यभरातील बाजार समित्यांचे कामकाजही प्रभावित झाल्याने खरेदीत अडथळे येत आहेत. एकप्रकारे लॉकडाउन कांद्याच्या मुळावर आले आहे.कोरोना रुग्ण आढळल्याने आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ७ मे पासून लिलाव बेमुदत बंद करण्यात आले आहेत. २४ मार्चला देशभरात लॉकडाउन करण्यात आले. त्यापूर्वी २३ मार्चला लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याचे क्विंटलमागे सर्वसाधारण भाव १,२५० रुपये होते. ते ६ मे रोजी थेट निम्म्यावर म्हणजे ६३० रुपयांवर आले. त्यातच कोरोनामुळे ११ मे पासून सात दिवस मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे. त्याचाही शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.मागील वर्षी राज्यात ४ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर झालेल्या लागवडीत यंदा वाढ होऊन कांद्याचे क्षेत्र तब्बल ५ लाख ८० हजार ३१९ हेक्टर झाले आहे. थंडी व पाणी उपलब्ध झाल्याने पीकही जोमदार आले आहे, अशी माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिली. तर साठवणूक केल्यानंतरही मोठ्या प्रमाणात शिल्लक असलेला कांदा मातीमोल भावात विकावा लागणार असल्याची खंत नगर जिल्ह्यातील शेतकरी गुलाबराव डेरे यांनी व्यक्त केली.देशात सध्या कांद्याला मोठी मागणी नसली तरी दैनंदिन कांदा पॅकिंग व लोडिंग करण्यासाठी मजूर मिळत नसल्याची माहिती लासलगावचे व्यापारी नितीन जैन यांनी दिली.मध्य प्रदेश, उत्तर भारत तसेच दक्षिणेतील राज्यात यंदा कांद्याचे चांगले उत्पादन झाल्याने तेथे कांद्याला मागणी नाही, असे व्यापारी नवीनकुमार सिंहयांनी सांगितले. त्यात बांग्लादेशात माल जात आहे, ते दिलासादायक आहे.केंद्र सरकारने १ लाख टन कांदा खरेदी करावाकेंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने यंदा नाफेडमार्फत एक लाख टन कांदा खरेदीचे जानेवारीत नियोजन केले होते. मात्र नंतर केवळ ५० हजार टन खरेदीला नाफेडला परवानगी दिली. केंद्र सरकारने आणखी ५० हजार टन कांदा खरेदी करण्याची गरज आहे.- नानासाहेब पाटील,संचालक, नाफेड

टॅग्स :onionकांदाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिक