शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

एवढा उशीर का केला?... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिडले; थेट शरद पवारांशीच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 11:57 IST

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर जनतेला पोलिसांच्या दंडुक्यांचा धाकही दाखवला होता. मात्र, त्यांच्याच खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांच्या महाबळेश्वर दौऱ्याला हिरवा कंदील दिला.

ठळक मुद्देगृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना आज सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.वाधवान कुटुंबाला लॉकडाऊनदरम्यान महाबळेश्वरला जाण्याची लेखी परवानगी त्यांनी दिली होती.त्यांच्यावरील कारवाईला उशीर झाल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यातच नव्हे, तर देशभरात लॉकडाऊन सुरू असताना, येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबाचे 23 सदस्य महाबळेश्वरला पोहोचल्याची बातमी समोर आली आणि एकच खळबळ उडाली होती. त्यांना ही परवानगी कुणी दिली, का दिली, कशी काय दिली, असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आणि राज्य सरकार संशयाच्या फेऱ्यात आलं. चौकशीअंती, गृह विभागाचे प्रधान सचिव, आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी ही परवानगी दिल्याचं स्पष्ट झालं. त्यांना आज सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं असलं, तरी या कारवाईला उशीर झाल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकाराबाबत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही फोनवरून चर्चा केल्याचंही समजतं. 

वाधवान कुटुंबियांना दिलेलं शिफारसपत्र भोवलं?; अनिल देशमुखांची गृह खात्याच्या सचिवांवर कारवाई

‘पेज थ्री’ इमेज असणारे अधिकारी म्हणून अमिताभ गुप्ता यांच्याविषयी चर्चा होत असते. दिवाण बिल्डरशी संबंधित बड्या लोकांना, लॉकडाऊनदरम्यान महाबळेश्वरला जाण्याची लेखी परवानगी त्यांनीच दिल्याचं कळताच उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नोंदवली होती. त्यानंतर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कालच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणं गरजेचं होतं. पण, त्याला उशीर केला गेला. स्वाभाविकच, सरकारच्या भूमिकेबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केलीय. त्यामुळे उद्धव ठाकरे उद्विग्न झाल्याचं कळतं. 

राज्यातून कोणालाही बाहेर जायचे असेल किंवा जिल्हा बदलायचा असेल तर त्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांना आहेत, याची पूर्ण कल्पना अमिताभ गुप्ता यांना होती. तरीदेखील त्यांनी स्वतःच्या अधिकारात वाधवान कुटुंबीयांना परवानगी दिली. ती देत असताना त्यात त्यांनी ‘फॅमिली फ्रेंड’ आहेत असा उल्लेख केला. देश भयंकर संकटात असताना एखादा अधिकारी आपले ‘फॅमिली फ्रेंड’ आहेत म्हणून आपल्या अधिकाराचा वापर करत चुकीची सवलत देत असेल तर तो अक्षम्य गुन्हा ठरू शकतो. एवढ्या एका कारणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अमिताभ गुप्ता यांचे निलंबन करू शकतात. मात्र, अधिकारी आणि नेते यांच्या संगनमताची अनेक उदाहरणं आहेत. तशा संगनमतातूनच तर हा प्रकार झाला नाही ना, अशीही कुजबूज ऐकू येतेय.

वाधवान कुटुंबियांना दिलेल्या पत्रामागे 'या' बड्या नेत्याचा हात; भाजपाचा घणाघात

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं पंतप्रधानांपासून सगळेच नेते सांगत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेला वारंवार हे आवाहन केलंय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर जनतेला पोलिसांच्या दंडुक्यांचा धाकही दाखवला होता. मात्र, त्यांच्याच खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांच्या महाबळेश्वर दौऱ्याला हिरवा कंदील दिला. वाधवान बंधू आपल्या 5 आलिशान कारमधून 23 कुटुंबीयांना घेऊन महाबळेश्वरला पोहोचले. तातडीच्या कौटुंबिक कामासाठी महाबळेश्वरला पोहोचता येईल, यासाठी सहकार्य करावं असं गृहखात्यानं दिलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.  

Video : खळबळजनक! लॉकडाऊनचे उल्लंघन, वाधवान कुटुंबीय पोचले महाबळेश्वरला 

उद्धव ठाकरे निलंबनाची कारवाई करणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाई करू शकतात. तो अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. एखाद्या अधिकाऱ्यांला निलंबित केल्यानंतर कारणांसहित याची माहिती मुख्यमंत्री केंद्र सरकारला देतात. केंद्राकडून ती माहिती युपीएससीकडे पाठवली जाते.  त्यामुळे आता, वाधवान कुटुंबीयांना स्पेशल ट्रिटमेंट देणाऱ्या अमिताभ गुप्ता यांचे निलंबन करून केंद्राला तसे कळवावे असा दबाव उद्धव ठाकरेंवर वाढतोय. ते आता कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुखSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस