शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Coronavirus : राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 07:36 IST

राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यात २ फेब्रुवारी रोजी ४१ हजार ५८६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू होते तर बुधवारी यात चार हजारांनी घट झाल्याचे दिसून आले.

मुंबई : राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यात २ फेब्रुवारी रोजी ४१ हजार ५८६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू होते तर बुधवारी यात चार हजारांनी घट झाल्याचे दिसून आले. राज्यात बुधवारी ३७ हजार ५१६ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यात दिवसभरात ७ हजार ३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण १९ लाख ४३ हजार ३३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५८ टक्के झाले आहे. राज्यात बुधवारी २ हजार ९९२ रुग्ण आणि ३० मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २० लाख ३३ हजार २६६ झाली आहे, तर मृतांचा आकडा ५१ हजार १६९ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ३० मृत्यूंपैकी १८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ३० मृत्यूंमध्ये मुंबई ७, नवी मुंबई मनपा २, नाशिक मनपा १, अहमदनगर मनपा १, पुणे ५, पुणे मनपा १, सातारा २, औरंगाबाद मनपा १, बीड १, अमरावती मनपा १, वाशिम २, नागपूर २, नागपूर मनपा २, नंदुरबार २ या रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४७ लाख ६४ हजार ७४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.७७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 

मुंबईत २ लाख ९२ हजार २२५ रुग्ण कोरोनामुक्तमुंबई : मुंबईत बुधवारी ३९७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ९२  हजार २२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर उपनगरात बरे होण्याचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५६३ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ५ हजार ६२५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.१२  टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत २८ लाख ४७ हजार ३६८ चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ५०३ रुग्ण आणि ७ मृत्यूंची नोंद झाली आहे. शहर उपनगरात कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ लाख १० हजार १३४ झाली आहे.राज्यात साडेतीन लाखांहून  अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लसमुंबई : राज्यात १६ जानेवारीपासून सुरु झालेल्या कोरोना लसीकऱण प्रक्रियेत आतापर्यंत ३ लाख ५४ हजार ६३३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. राज्यात बुधवारी ५५५ लसीकरण सत्रात दिवसभरात ५७ हजार ७५८ चे लक्ष्य होते, त्यापैकी ३५ हजार ८८९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, एकूण ६२ टक्के लसीकऱण पार पडले. यात ३५ हजार ९६ आरोग्य कर्मचारी तर ७९३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. ३५ हजार ४८१ लाभार्थ्यांना कोविशिल्ड तर ४०८ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीने लसीकऱण कऱण्यात आले.राज्यात दिवसभरात अकोला आणि भंडारा जिल्ह्यांत १०० हून अधिक टक्के लसीकरण झाले, यात अकोला जिल्ह्यात ३०० लाभार्थ्यांचे लक्ष्य होते, तर ३२० लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर भंडारामध्ये १०१ टक्के लसीकरण झाले. भंडाऱ्यात ७०० चे उद्दिष्ट होते त्यात ७०४ लाभार्थ्यांनी लस घेतली. परभणी, हिंगोली, सांगली, बुलढाणा, बीड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, यवतमाळ , औऱंगाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांत दिवसभरात ५० टक्क्यांपेक्षाही कमी लसीकरण करण्यात आले.कोव्हॅक्सिनचे दिवसभरात ४०८ लाभार्थीराज्यात अमरावती जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसीचा सर्वाधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला, या जिल्ह्यात १०० जणांचे लक्ष्य होते, त्यात ११३ जणांनी लस घेतली. तर एकूण १ हजार १०१ लाभार्थ्यांनी लस घेतली. तर पुण्यात ७६, नागपूर १२०, औरंगाबाद ५६, मुंबई ४०,सोलापूर ३ लाभार्थ्यांनी लस घेतली. राज्यात आतापर्यंत ३ हजार ५८५ लाभार्थ्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई