शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

coronavirus: भाजपाच्या आंदोलनाला एकनाथ खडसेंनी असा दिला प्रतिसाद....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 14:26 IST

सध्या पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राज्य भाजपाने सरकारविरोधात पुकारलेल्या या आंदोलनाला कसा प्रतिसाद देतात, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

जळगाव - कोरोनामुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना भाजपाने  आज उद्धव ठाकरे सरकारविरोधात 'महाराष्ट्र वाचवा' आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, सध्या पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राज्य भाजपाने सरकारविरोधात पुकारलेल्या या आंदोलनाला कसा प्रतिसाद देतात, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देताना प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेतला. तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले.

एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी कुटुंबीयांसह आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सुनबाई खासदार रक्षाताई खडसे यासुद्धा उपस्थित होत्या. उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार, असा टोला खडसे यांनी यावेळी बॅनरच्या माध्यमातून लगावला.

खासदार रक्षाताई खडसे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, उद्धव सरकार मात्र घरात, अशी टीका त्यांनी केली आहे. खडसे आज या आंदोलनात सहभागी झाल्याने पक्षावर नाराज असले तरी ते पक्षासोबत असल्याचे संकेत मिळत आहेत. 

दरम्यान, भाजपाच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी, मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर आंदोलन केले.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडने पॅकेज दिले, मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही, केंद्राने ४६८ कोटी दिले, याशिवाय १६०० कोटी रुपये मजुरांच्या स्थलांतरासाठी दिले. केंद्राने २० लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, पण राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नाही, राज्य सरकार अंग चोरून काम करतंय, असं टीकास्त्रही फडणवीसांनी सोडलं आहे. राज्य सरकार आणि मंत्री आभासी जगात जगत आहेत, सोशल मीडियावर पेड गँग तयार करून आणि काहींना प्रवक्ता करून सरकारला लढाई जिंकू असं वाटतंय, पण ग्राऊंड लेव्हलला परिस्थिती वेगळी आहे, रुग्णांना उपचार मिळत नाहीत, रस्त्यावर फिरावं लागतं, सरकारी रुग्णालयात जागा नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. देशातील २० टक्के कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने समोर येत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपाPoliticsराजकारणJalgaonजळगाव