शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : विकासकामांना कोरोनामुळे खीळ; राज्यात कोट्यवधींची देयके अडली

By यदू जोशी | Updated: March 24, 2020 02:50 IST

राज्यात विविध शासकीय कार्यालयांमध्ये ११,५४२ आहरण व संवितरण अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांकडे विविध कामांची देयके तयार करण्याची जबाबदारी असते.

- यदु जोशीमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती पाच टक्क्यांवर आलेली असताना आणि त्याच वेळी आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत असताना विविध कार्यालयांची कोट्यवधी रुपयांची देयके अडली आहेत. वित्तीय वर्ष किमान एक महिना पुढे ढकलण्याची मागणी होत असताना मुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी मात्र अशी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.राज्यात विविध शासकीय कार्यालयांमध्ये ११,५४२ आहरण व संवितरण अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांकडे विविध कामांची देयके तयार करण्याची जबाबदारी असते. गेले आठ दिवस हे काम जवळपास थांबले आहे. ही देयके प्रत्यक्ष कोषागार कार्यालयांमध्ये जाऊन जमा करण्याचे काम लिपिक किंवा शिपाई करतात. तेदेखील कार्यालयांमध्ये येत नाहीत, अशी अवस्था आहे. कोणत्याही कामाची देयके काढण्यासाठी तयार होणारी नस्ती चार ते पाच टेबलांवर फिरते. त्यापैकी बहुतांश ठिकाणी आज कर्मचारी व अधिकारी हजर नाहीत. देयकांच्या फायली अडल्या आहेत. प्रचलित तरतुदीनुसार केलेल्या विनियोगाचे समायोजन होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर वर्षाची मुदत पुढे नेण्याची मागणी होत आहे. राज्य शासनाच्या संकेतस्थळावर असलेल्या अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत २०१९-२० या वित्तीय वर्षातील वितरीत निधीच्या ७२ टक्केच खर्च झाला आहे.कोरोनामुळे कर्मचारी, अधिकारीच कार्यालयात येऊ शकत नसल्याने विकास कामांची कोट्यवधी रुपयांची देयके अडलेली आहेत. प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड भार आलेला आहे. त्यामुळे वित्तीय वर्ष ३१ मार्चऐवजी ३० एप्रिलपर्यंत वाढवावे, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी लोकमतशी बोलताना केली.शेतकऱ्यांच्या पीककर्जाला ३१ मार्चची मुदत असते. ती वाढवून देण्याची मागणी सर्वपक्षीय आमदार करीत आहेत. याबाबत एक-दोन दिवसात योग्य निर्णय घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी लोकमतशी बोलताना दिली.कोरोनाचा विषय या ८ दिवसांत उपस्थित झाला आहे. साडेअकरा महिने हा विषय नव्हता. तेव्हा विविध विभागांनी त्यांचा निधी खर्च करायला हवा होता. वर्ष संपता संपता निधी मागायचा त्यामागे बरेचदा काय चालते हे सर्वांना ठाऊक आहे. कोरोनाच्या नावाखाली वित्तीय वर्ष एक महिना अजिबात पुढे जाणार नाही. मात्र कोरोनाशी संबंधित दोन तीन विभागांकरता वेगळा विचार होऊ शकेल.- अजित पवार, उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री.३१ मार्चपर्यंत शेतकºयांनी पीक कर्जाची परतफेड केली नाही तर त्यांना नियमाप्रमाणे पुढील काळासाठी व्याज भरावे लागेल. शेतकºयांवर हा बोजा पडू नये म्हणून राज्य सरकारने ही मुदत किमान ३० मे पर्यंत वाढवून द्यावी.- रणधीर सावरकर, आमदार, अकोलाकोरोनामुळे कर्मचारी, अधिकारीच कार्यालयात येऊ शकत नसल्याने विकासकामांची कोट्यवधी रुपयांची देयके अडलेली आहेत. प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड भार आलेला आहे. त्यामुळे वित्तीय वर्ष ३१ मार्चऐवजी ३० एप्रिलपर्यंत वाढवावे, सरकारने आमच्या मागणी ची वाट पाहू नये.- ग. दि. कुलथे, राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस