शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

Coronavirus : विकासकामांना कोरोनामुळे खीळ; राज्यात कोट्यवधींची देयके अडली

By यदू जोशी | Updated: March 24, 2020 02:50 IST

राज्यात विविध शासकीय कार्यालयांमध्ये ११,५४२ आहरण व संवितरण अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांकडे विविध कामांची देयके तयार करण्याची जबाबदारी असते.

- यदु जोशीमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती पाच टक्क्यांवर आलेली असताना आणि त्याच वेळी आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत असताना विविध कार्यालयांची कोट्यवधी रुपयांची देयके अडली आहेत. वित्तीय वर्ष किमान एक महिना पुढे ढकलण्याची मागणी होत असताना मुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी मात्र अशी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.राज्यात विविध शासकीय कार्यालयांमध्ये ११,५४२ आहरण व संवितरण अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांकडे विविध कामांची देयके तयार करण्याची जबाबदारी असते. गेले आठ दिवस हे काम जवळपास थांबले आहे. ही देयके प्रत्यक्ष कोषागार कार्यालयांमध्ये जाऊन जमा करण्याचे काम लिपिक किंवा शिपाई करतात. तेदेखील कार्यालयांमध्ये येत नाहीत, अशी अवस्था आहे. कोणत्याही कामाची देयके काढण्यासाठी तयार होणारी नस्ती चार ते पाच टेबलांवर फिरते. त्यापैकी बहुतांश ठिकाणी आज कर्मचारी व अधिकारी हजर नाहीत. देयकांच्या फायली अडल्या आहेत. प्रचलित तरतुदीनुसार केलेल्या विनियोगाचे समायोजन होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर वर्षाची मुदत पुढे नेण्याची मागणी होत आहे. राज्य शासनाच्या संकेतस्थळावर असलेल्या अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत २०१९-२० या वित्तीय वर्षातील वितरीत निधीच्या ७२ टक्केच खर्च झाला आहे.कोरोनामुळे कर्मचारी, अधिकारीच कार्यालयात येऊ शकत नसल्याने विकास कामांची कोट्यवधी रुपयांची देयके अडलेली आहेत. प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड भार आलेला आहे. त्यामुळे वित्तीय वर्ष ३१ मार्चऐवजी ३० एप्रिलपर्यंत वाढवावे, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी लोकमतशी बोलताना केली.शेतकऱ्यांच्या पीककर्जाला ३१ मार्चची मुदत असते. ती वाढवून देण्याची मागणी सर्वपक्षीय आमदार करीत आहेत. याबाबत एक-दोन दिवसात योग्य निर्णय घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी लोकमतशी बोलताना दिली.कोरोनाचा विषय या ८ दिवसांत उपस्थित झाला आहे. साडेअकरा महिने हा विषय नव्हता. तेव्हा विविध विभागांनी त्यांचा निधी खर्च करायला हवा होता. वर्ष संपता संपता निधी मागायचा त्यामागे बरेचदा काय चालते हे सर्वांना ठाऊक आहे. कोरोनाच्या नावाखाली वित्तीय वर्ष एक महिना अजिबात पुढे जाणार नाही. मात्र कोरोनाशी संबंधित दोन तीन विभागांकरता वेगळा विचार होऊ शकेल.- अजित पवार, उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री.३१ मार्चपर्यंत शेतकºयांनी पीक कर्जाची परतफेड केली नाही तर त्यांना नियमाप्रमाणे पुढील काळासाठी व्याज भरावे लागेल. शेतकºयांवर हा बोजा पडू नये म्हणून राज्य सरकारने ही मुदत किमान ३० मे पर्यंत वाढवून द्यावी.- रणधीर सावरकर, आमदार, अकोलाकोरोनामुळे कर्मचारी, अधिकारीच कार्यालयात येऊ शकत नसल्याने विकासकामांची कोट्यवधी रुपयांची देयके अडलेली आहेत. प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड भार आलेला आहे. त्यामुळे वित्तीय वर्ष ३१ मार्चऐवजी ३० एप्रिलपर्यंत वाढवावे, सरकारने आमच्या मागणी ची वाट पाहू नये.- ग. दि. कुलथे, राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस