शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

CoronaVirus News: जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री ठाकरेंकडून मोदींचा खास उल्लेख; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 9:49 PM

आपल्या हिमतीवर महाराष्ट्र घडवू; मुख्यमंत्र्यांची जनतेला भावनिक साद

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्याच आठवड्यात कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली. संकट हीच संधी असून आपण कोरोना संकटाचा वापर देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी करू, अशी साद मोदींनी घातली. यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधताना पंतप्रधानांनी वापरलेल्या आत्मनिर्भर शब्दाचा खास उल्लेख केला. पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे. त्यासाठी कोरोना संकट संपल्यानंतर सगळ्यांनी जोमानं कामाला लागायचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातल्या जनतेशी संवाद साधला.कोरोना रुग्णांची संख्या कमी असलेल्या ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ग्रीन झोनमधले उद्योगधंदे सुरू केले गेले आहेत. या भागातील नागरिकांनी आता महाराष्ट्राला उभं करण्यासाठी पुढे यावं, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी घातली. आतापर्यंत सरकारचं ऐकून नागरिक घरात राहिले. मात्र आता उद्योगधंदे सुरू झालेल्या भागातल्या लोकांनी घराबाहेर पडावं. राज्याला आत्मनिर्भर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपला महाराष्ट्र लढवय्या असल्याचं दाखवून द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्यातले लाखो परप्रांतीय मजूर त्यांच्या राज्यांमध्ये परत गेले आहेत. महाराष्ट्रात असताना त्यांची उत्तम व्यवस्था सरकारनं केली. मात्र त्यांना घरी जायचं होतं. त्यासाठीही सरकारनं उत्तम नियोजन केल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. परप्रांतीय कामगार, मजूर परतले असताना आता राज्यातल्या भूमिपुत्रांनी पुढे यावं. आपण आपल्या पायावर महाराष्ट्र उभा करू, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी घातली. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर शब्दाचा वापर केला.लवकर लॉकडाऊन केल्यानं राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. लॉकडाऊन करण्यास उशीर झाला असता, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील उद्योगधंदे हळूहळू सुरू करत असल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत ५० हजार उद्योग सुरू करण्यात आले असून त्यात ५ लाख मजूर काम करत आहेत, अशी आकडेवारी त्यांनी सांगितली. कोरोनानंतर राज्यात येणाऱ्या उद्योगांसाठी ४० हजार एकर जमीन राखून ठेवण्यात आली आहे. ग्रीन उद्योगांसाठी कोणत्याही अटी असणार नाहीत. त्यांना कोणत्याही परवानगीशिवाय उद्योग सुरू करता येतील. कोरोनानंतर आपण राज्यात नवं उद्योगपर्व सुरू करू, असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.... म्हणून मी लॉकडाऊन वाढवला, उद्धव ठाकरेंची नागरिकांना भावनिक सादकोरोना चौकशीला आमचा पाठिंबा, पण...; चीननं सांगितली महत्त्वाची अटचीनला हवीय भारतातील भाजी; कोरोनाचा सामना करताना वाढवणार रोगप्रतिकारशक्ती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे