शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

CoronaVirus: नवाब मलिक कमी बोलले, तर अडचणी कमी होतील; प्रवीण दरेकरांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 17:36 IST

CoronaVirus: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेला भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देनवाब मलिक कमी बोलले, तर अडचणी कमी होतील नवाब मलिक यांचे केवळ राजकारणाकडे लक्षदुसऱ्या राज्यांच्या चांगल्या गोष्टीही घ्याव्यात

मुंबई: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. मात्र, यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणावर झडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी केलेल्या टीकेला भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक कमी बोलले, तर अडचणी कमी होतील, असे दरेकर यांनी म्हटले आहे. (coronavirus bjp pravin darekar replied nawab malik on corona situation) 

गेल्या सलग दिवसांपासून देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाखांवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र, राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे दिसत आहे. केवळ केंद्र सरकारला टार्गेट करून आणि दुसऱ्या राज्यांतील स्वतःच्या सोयीची असलेली  उदाहरणे देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न मंत्री नवाब मलिक करतात. त्यामुळे ते जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

गायीच्या शेणाने खरंच कोरोना बरा होतो?; डॉक्टरांनी दिलेला हा इशारा वाचाच!

नवाब मलिक यांचे केवळ राजकारणाकडे लक्ष

राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात नवाब मलिक यांनी उपाययोजना सुचवल्याचे कधी ऐकीवात नाही. उपलब्ध व्यवस्था गतिमान कशा होतील, याबाबत सूचना केल्याचे त्यांच्या प्रेममध्ये सांगितल्याचे मला आठवत नाही. केंद्राला टार्गेट करत केवळ आपल्या सोयीची दुसऱ्या राज्यांची उदाहरणे देत राजकारण करण्याचा प्रयत्न नवाब मलिक करताना दिसतायत, अशा शब्दांत दरेकरांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. 

दुसऱ्या राज्यांच्या चांगल्या गोष्टीही घ्याव्यात

दुसऱ्या राज्यांची उदाहरणे देत असताना, त्या राज्यांनी कोरोनाच्या काय चांगल्या उपाययोजना, चांगल्या गोष्टी केल्या, त्या आपल्याकडे अमल करण्यासाठी राज्य सरकारने काय केले, याचे उत्तर नवाब मलिक देऊ शकत नाहीत, अशी टीका करत केंद्र आणि राज्य असा वाद आताच्या घडीला बंद होण्याची आवश्यकता आहे, असे दरेकर यांनी यावेळी बोलताना नमूद केले.  

“ठाकरे सरकराचं ‘मुंबई मॉडेल’ फसवं, हा निव्वळ खोटारडेपणा”; नितेश राणेंची टीका

सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका

कोरोनाच्या बिकट परिस्थितीत परदेशातून आलेल्या मदतीवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली जात आहे. एक गिव्ह अँड टेक पॉलिसी असते. आपण परदेशांना मदत केली नसती, तर आपल्याला मदत करण्याची भूमिका त्या देशांनी घेतली नसती. संकटाच्या काळात संकुचित विचार करणे योग्य नाही. व्यापकदृष्टिने विचार होण्याची गरज आहे. सुसंवादातून, चांगल्या समन्वयातून सर्वांनी एकत्रितपणे या संकटाला सामोरे जायला हवे. अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो, असे दरेकर यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याNCPराष्ट्रवादी काँग्रेसnawab malikनवाब मलिकBJPभाजपाpravin darekarप्रवीण दरेकरPoliticsराजकारण