शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

Coronavirus : जानेवारीत राज्यात २ लाख रूग्ण; ८० लाख रुग्ण झाल्यास ८० हजार जणांचे मृत्यू होण्याची सरकारला भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 09:26 IST

Coronavirus : राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्तांना डॉ. व्यास यांनी यासाठी दोन पत्रे तातडीने पाठविली आहेत. एका पत्रात त्यांनी कोरोनाची भयानकता विशद केली असून, दुसऱ्या पत्रात यासाठी कोणती पावले उचलायची आहेत याची विस्तृत माहिती दिली आहे.

मुंबई : कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्ण वाढीचा वेग पाहता जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यातली रुग्ण संख्या २ लाखांच्या घरात जाईल. या गतीने राज्यातील रुग्णसंख्या जर ८० लाखांच्या घरात गेली तर होणारे मृत्यू ८० हजारांच्या घरात जातील, अशी धक्कादायक माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

व्हायरस जरी सौम्य असला तरी त्याच्या संसर्गाचा वेग भयंकर आहे. त्यामुळे तो अधिक लोकांना बाधित करेल. बाधितांची संख्या लाखाच्या घरात जाईल व होणाऱ्या मृत्यूची टक्केवारी कमी दिसली तरी तो आकडा मोठा असेल. या सूत्रानुसार अंदाजे ८० हजार मृत्यू होतील. तातडीने गर्दी करणे टाळले, खबरदारीचे उपाय केले तर बाधितांच्या संख्येत घट होईल व मृत्यूदेखील कमी होतील. पण, बेफिकिरी दाखवली तर ८० हजारांच्या घरात मृत्यू १५ दिवसांतही होऊ शकतात, अशी भीतीही पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्तांना डॉ. व्यास यांनी यासाठी दोन पत्रे तातडीने पाठविली आहेत. एका पत्रात त्यांनी कोरोनाची भयानकता विशद केली असून, दुसऱ्या पत्रात यासाठी कोणती पावले उचलायची आहेत याची विस्तृत माहिती दिली आहे. मुंबईत रुग्ण वाढीचा वेग प्रचंड आहे. त्या मानाने बेडची संख्या कितीही जास्त असली तरी वाढत्या रुग्णांना त्याचा किती उपयोग होईल, असा प्रश्न या पत्राने निर्माण झाला आहे.

लसीकरणाला पर्याय नाहीकोणत्याही चर्चांवर जाऊ नका. जर लसीकरण झाले नसेल आणि सहव्याधी (अन्य आजार/कोमॉरबिडिटी) असतील तर ही लाटदेखील तेवढीच घातक ठरेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जास्तीतजास्त लसीकरण करून घ्या.

व्यवस्था उभारण्याच्या सरकार तातडीच्या सूचना२२ डिसेंबरच्या आकडेवारीनुसार मुंबई वगळता राज्यातील एकही जिल्हा कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी पूर्णत: तयार नव्हता. १७ ठिकाणी किरकोळ दुरुस्त्या तर १६ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे सांगत अतिरिक्त मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले.ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड आणि अपेक्षित रुग्णवाढ याबद्दल याआधीच तपशीलवार माहिती सर्व जिल्ह्यांत दिली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने त्यांच्या सुविधा तातडीने तपासाव्या. गरज असेल तर नवीन व्यवस्था उभी करा. केंद्राच्या निर्देशानुसार ऑक्सिजनची प्राधान्याने व्यवस्था करा.

विनाकारण बेड अडवू देवू नका ६०% रुग्णांना सौम्य लक्षणे असतील. त्यामुळे त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये भरती करू नका. नाहीतर, ज्यांना बेडची खरोखरच गरज आहे त्यांना ते मिळू शकणार नाहीत.

राज्यात एका दिवसात ८,०६७राज्यात दिवसभरात तब्बल आठ हजार ६७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ॲक्टिव्ह रुग्ण २४ हजार ५०९ एवढे आहेत. एक हजार ७६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. - सध्या राज्यात एक लाख ७५ हजार ५९२ व्यक्ती होम क्वाॅरंटाइनमध्ये आहेत तर एक हजार ७९ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरंटाइन आहेत.- राज्यात चार ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. वसई-विरार, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि पनवेल येथील प्रत्येकी एक रुग्ण ओमायक्रॉनबाधित आढळला आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात  एकूण ४५४ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली.

अतिरिक्त मुख्य सचिवांच्या सूचना...

...तर बेड वाढवाज्या दिवशी एकूण बेडच्या ५० टक्के बेड वापरात येतील त्याच्या तिसºया दिवशी पासून बेडची क्षमता तातडीने वाढवा.

ऑक्सिजन तयार ठेवाएमबीबीएस डॉक्टरांची संख्या पुरेशी आहे की नाही हे तपासा. मेडीकल गॅस पाईलाईन, किमान ३ दिवस पुरेल एवढे लिक्वीड ऑक्सिजन, मोबाईल एक्सरे मशिन यांची उपलब्धता ठेवा.

गरजूनांच बेड द्याज्यांना गरज आहे अशाच रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटीलेटर असणारे बेड मिळतील याची खात्री करा, गरज नसणाऱ्यांना असे बेड देऊन गरजूंची अडवणूक होईल असे करु नका.

लसीकरण नव्हते म्हणून कोरोना कुठलाही असो, लसीकरण झाले नसेल तर धोका अधिक आहे या निष्कर्षावर या तिसऱ्या लाटेतही शिक्कामोर्तब झाले आहे. याचे कारण अमेरिकेत लहान मुलांचे लसीकरण झाले नव्हते त्यामुळे त्यांचे हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचे प्रमाणही वाढले होते. मार्च ते मे २०२१ या काळात लसीकरण झाले नव्हते. त्यामुळे त्यावेळी आपल्याकडे तीव्रता होती. ही बाब लक्षात ठेवावी लागेल.

...तर लॉकडाऊनची स्थिती ओढवू शकते राज्य सरकारने काल कडक निर्बंध लागू केले असतानाच, कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. नियम पाळले नाही तर लॉकडाऊनची स्थिती येऊ शकते. कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्याचे काम लोकांचे आहे. मागील लॉकडाऊनमध्ये लोकल आणि शाळांवर काही निर्बंध लावले होते. यंदाही निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील.      - विजय वडेट्टीवार,     मदत व पुनर्वसन मंत्री 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस