शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

कोरोनाचा कहर, राज्यात दिवसभरात २३ हजार रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:11 IST

राज्यात दिवसभरात २३ हजार १७९ रुग्ण आणि ८४ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २३ लाख ७० हजार ५०७ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ८० पर्यंत पोहोचला आहे.

मुंबई: राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने तब्बल २३ हजारांचा टप्पा ओलांडल्याने पुन्हा एकदा मागील वर्षीच्या कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळाची सुरुवात होत असल्याचे चित्र आहे. परिणामी, यंत्रणांसमोर संसर्ग नियंत्रणाचे आव्हान असून, दुसरीकडे सामान्य नागरिकांनीही कोरोनाविषयी मनोवृत्ती बदलण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी अधोरेखित केली आहे. यापूर्वी, सप्टेंबर महिन्यात दैनंदिन रुग्ण २० हजारांपर्यंत पोहोचले होते. (Corona's havoc, 23,000 patients a day in the state)

राज्यात दिवसभरात २३ हजार १७९ रुग्ण आणि ८४ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २३ लाख ७० हजार ५०७ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ८० पर्यंत पोहोचला आहे. सध्या राज्यात एक लाख ५२ हजार ७६० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

दिवसभरात नऊ हजार १३८ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत २१ लाख ६३ हजार ३९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.२६ टक्के झाले असून, मृत्युदर २.२४ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एक कोटी ७५ लाख ३५ हजार ४९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.२९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात सहा लाख ७१ हजार ६२० व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, सहा हजार ७३८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

बुधवारी नोंद झालेल्या एकूण ८४ मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर २८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. हे १४ मृत्यू ठाणे ७, नाशिक ३, गडचिरोली २, नागपूर १ आणि नांदेड १ असे आहेत. या ८४ मृत्यूंमध्ये मुंबई ८, नवी मुंबई मनपा १, उल्हासनगर मनपा ८, रायगड १, पनवेल मनपा ३, नाशिक १, नाशिक मनपा ५, मालेगाव मनपा २, अहमदनगर १, अहमदनगर मनपा १, जळगाव मनपा १, नंदुरबार १, सोलापूर २, सातारा १, रत्नागिरी १, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ४, जालना ७, उस्मानाबाद १, बीड २, नांदेड १, नांदेड मनपा २, अमरावती ४, अमरावती मनपा २, नागपूर ४, नागपूर मनपा १२, वर्धा २, चंद्रपूर २, गडचिरोली २ आणि अन्य राज्य-देशातील एका रुग्णांचा समावेश आहे.

बाधितांच्या प्रमाणात १३ टक्क्यांनी वाढ -राज्यात कोरोना प्रसाराचा वेग वाढला असून, बाधितांचे प्रमाण सरासरी १३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे, तर आठवडाभरातील नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या ५० हजारांवरून ९० हजारांच्या घरात पोहोचली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात गेल्या वर्षीच्या (२०२०) जुलैप्रमाणे स्थिती झाली असून, आठवड्याला ५० हजार रुग्णांची नव्याने भर पडली. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच रुग्णसंख्या ४ टक्क्यांनी वाढून ९० हजारांपर्यंत गेला आहे. यापूर्वी ऑगस्टच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात ८९ ते ९० हजार रुग्णांचे निदान होत होते.

मुंबईत २३७७ रुग्ण -- मुंबईत बुधवारी दोन हजार ३७७ रुग्ण आणि आठ मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची एकूण  संख्या तीन लाख ४९ हजार ९५८ झाली असून, बळींचा आकडा ११ हजार ५४७ झाला आहे. सध्या शहर-उपनगरात १६ हजार ७५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.- मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के झाला असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १४५ दिवसांवर आला आहे. १० ते १६ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.४८ टक्के झाला आहे.- मुंबईतील झोपडपट्ट्या आणि चाळींत सक्रिय कंटेन्मेंट झोन्स ३४ असून, सक्रिय सीलबंद इमारती २६७ इतक्या आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील १२ हजार ६१ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे. शहरात आतापर्यंत कोरोनाच्या ३६ लाख १४ हजार ५२८ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

सात दिवसांत एक लाख १८ हजार ४५० रुग्ण१७ मार्च     २३,१७९१६ मार्च     १७,८६४१५ मार्च     १५,०५११४ मार्च     १६,६२०१३ मार्च     १५,६०२१२ मार्च     १५,८१७११ मार्च     १४,३१७ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबईAurangabadऔरंगाबादnagpurनागपूरNashikनाशिकMalegaonमालेगांवthaneठाणे