शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

Corona virus :लॉकडाऊन काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्या; मनसेचे गृहमंत्र्यांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 20:05 IST

लॉकडाऊन काळात राज्यात 1 लाख 30 हजार 396 गुन्हे दाखल

ठळक मुद्देआधीच महाराष्ट्रातील रोजगाराचा प्रश्न ऐरणीवरगृहमंत्र्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पत्राच्या प्रती

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर कलम १८८ नुसार जोरदार कारवाया राज्यभरात सुरू करण्यात आल्या होत्या. या कालावधीत राज्यभरात १ लाख ३० हजार ३९६ गुन्हे दाखल करण्यात आले असून २६ हजार लोकांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांच्या भवितव्याचा विचार करून हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेच्या महिलाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे.कोविड १९ विषाणूचा संसर्ग वाढू नये याकरिता संचारबंदी लागू करण्यात आली होती. ती अद्यापही कायम आहे. नागरिकांनी एकत्र येणे टाळावे याकरिता शासनाने नागरिकांना बाहेर फिरण्यास तसेच कार्यालये, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांसह नागरिकांवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येत होती. पोलिसांनी याकाळात नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर खटले भरले. हे खटले मागे घ्यावेत अशी मागणी पाटील यांनी केली आहे. 

महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते १५ जून या कालावधीत कलम १८८ नुसार तब्बल १ लाख ३० हजार ३९६ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच, २६ हजार ८८७ व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे. कोरोनामुळे आधीच सर्वसामान्यांची खूप हेळसांड झालेली आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. अनेकजण त्यांच्या सरकारी किंवा खासगी नोकरीवर अवलंबून आहेत. त्यांच्यावर दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्यांमुळे त्यांच्या नोकरीस धोका व अडचण निर्माण होऊन रोजगाराची समस्या उद्भवू शकते. आधीच महाराष्ट्रातील रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात कोरोना मधील या केसेस म्हणजे लोकांचे मरण अशी स्थिती होईल. हे गुन्हे मागे घेऊन या नागरिकांना दिलासा देण्याची मागणी मनसेने केली आहे.

गृहमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या पत्राच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAnil Deshmukhअनिल देशमुखMNSमनसेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या