शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

घुमानचे साहित्य संमेलन म्हणजे संत साहित्य संमेलन होणार

By admin | Updated: July 3, 2014 00:46 IST

यंदाचे ८८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत होणार; हेच जवळपास निश्चित करण्यात आले होते. पण ऐनवेळी पंजाबने उचल घेतली. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या बाहेर साहित्य संमेलन झाले नाही.

राजेश पाणूरकर - नागपूर
यंदाचे ८८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत होणार; हेच जवळपास निश्चित करण्यात आले होते. पण ऐनवेळी पंजाबने उचल घेतली. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या बाहेर साहित्य संमेलन झाले नाही. संत नामदेवाच्या घुमान या गावी हे संमेलन घ्यावे, असा आग्रह काही महामंडळ सदस्यांनी केला. घुमान येथील आयोजकही पूर्ण तयारीनिशी तयार असल्याने यंदाचे साहित्य संमेलन पंजाबच्या गुरुदासपूर येथीव घुमान या गावी होणार आहे. संत नामदेवांच्या गावात हे संमेलन होत असल्याने हे साहित्य संमेलन संत साहित्यालाच अर्पण केलेले असेल, असा एकत्रित स्वर साहित्यिकांनी आळवला आहे. संत साहित्य संमेलन होण्यास कुणाचाही विरोध नाही. पण यामुळे संमेलनाध्यक्षपदासाठी असणारी गणितेच बदलली आहे.
उस्मानाबाद येथे हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असते तर संमेलनाध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या साहित्यिकांनी आता माघार घेतली आहे. संत नामदेवांच्या गावात होणाऱ्या संमेलनासाठी बहुतेक संत साहित्यिकांनी कंबर कसली आहे. यात प्रामुख्याने पुण्याचे अशोक कामत आणि नागपूरचे डॉ. रवींद्र शोभणे इच्छुक आहेत. याशिवाय रामचंद्र देखणे, सदानंद मोरे, यशवंत पाठक यांनीही संमेलनाध्यक्ष होण्यासाठी तयारी दर्शविल्याचे कळले आहे. अद्याप कुणीही अधिकृतपणे समोर आलेले नाही आणि ती प्रक्रिया सुरूही झालेली नाही. पण घुमानला संमेलन निश्चित झाल्यावर संत साहित्यिकांनी आनंद व्यक्त केला आहे. अशोक कामत हे पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख आणि राष्ट्रभाषा प्रचार समितीचेही सदस्य आहेत. त्यात ते पुण्याचेच असल्याने त्यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून जोर लावण्याची तयारी सुरू केल्याचे कळले. तर डॉ. रवींद्र शोभणे संत नामदेव यांच्यावर नवी कादंबरी लिहित आहेत. याशिवाय ते स्वत: संत नामदेवांच्या वंशातीलच असल्याने त्यांनी संमेलनाध्यक्षपदासाठी आपल्यासारखा योग्य उमेदवार नाही, असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या पुस्तकांनी रौप्यमहोत्सवी आकडाही गाठला आहे.
डॉ. शोभणेंच्या पाठीशी विदर्भ साहित्य संघही उभा राहू शकतो, अशी स्थिती आहे. याशिवाय सदानंद मोरे यांनीही संमेलनाध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. यशवंत पाठक आणि रामचंद्र देखणेही या रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. क ाय होणार, ते काळ सांगेलच.