शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

राज्यामध्ये सोयीची राजकीय सोयरीक!

By admin | Updated: March 15, 2017 04:33 IST

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध दंड थोपटून मैदानात उतरलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती निवडीत मात्र गळ्यात गळे

मुंबई : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध दंड थोपटून मैदानात उतरलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती निवडीत मात्र गळ्यात गळे घालून सोयीनुसार राजकीय सोयरिका केल्या आहेत. मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले असून, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी राष्ट्रवादी-भाजपा तर नाशिक जिल्ह्यात सर्वच पक्ष एकमेकांसोबत आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हा सर्वपक्षीय पॅटर्न आगळाच म्हणावा लागेल.काँग्रेससोबत युती करत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेनेची खेळी यशस्वी झाली. औरंगाबाद पंचायत समितीच्या सभापतीपदावर काँग्रेसच्या करमाड गणातील ताराबाई उकिर्डे या विराजमान झाल्या, तर उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या गांधेली गणातील कविता राठोड यांची वर्णी लागली. तर कन्नडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे. जालना पंचायत समितीसाठी शिवसेना, काँग्रेस युती होऊन सभापतीपदी शिवसेनेचे पांडुरंग डोंगरे तर उपसभापती काँग्रेसच्या द्वारकाबाई खरात यांची निवड झाली. ही नवीन राजकीय आघाडी चर्चेचा विषय ठरत आहे. उमरग्यात काँग्रेस आणि भाजपाची मैत्री अधिक घट्ट झाली असून, या दोघांनी एकत्रित येवून पंचायत समितीत सत्ता काबीज केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)..............नवा नाशिक पॅटर्ननाशिक जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांमध्ये दोन भिन्न विचारसरणीच्या पक्षांनी परस्परांच्या गळ्यात गळे घालत सत्ता काबीज केल्याने पक्षीय सामिलकीचा नवा नाशिक पॅटर्नच निर्माण झाला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने माकपाशी युती करुन आपल्या पदरात उपसभापतीपद पाडून घेतले आहे. देवळा पंचायत समितीत राष्ट्रवादीला शिवसेनेची साथ मिळाली असून दिंडोरी पंचायत समितीमध्ये कॉँग्रेसने शिवसेनेसमोर नांगी टाकत त्यांच्यासोबत थेट गट नोंदणी करुन उपसभापतीपद पदरात पाडून घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ....................अकोल्यात लाठीमारअकोले पंचायत समितीत (जि. अहमदनगर) राष्ट्रवादीचे मधुकर पिचड यांनी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्यामुळे अकोल्यात सेना-भाजपमध्ये राडा झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. जिल्ह्यात सर्वाधिक चार पंचायत समित्यांवर भाजपचे सभापती झाले आहेत. राष्ट्रवादी व कॉंग्रेसला प्रत्येकी तीन, सेनेला दोन, महाआघाडीला एक, तर गडाख यांच्या शेतकरी क्रांती पक्षाला एक सभापतीपद मिळाले आहे. तीन ठिकाणी प्रस्थापित घराणी सत्तेवर बसली आहेत. ..................................साताऱ्यात ‘सब कुछ राष्ट्रवादी’सातारा जिल्ह्यातील अकराही पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सदस्यांची वर्णी लागली. खंडाळा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी काँग्रेस तर कऱ्हाडच्या उपसभापतिपदी कऱ्हाड विकास आघाडीचा सदस्य विराजमान झाला. उर्वरित सर्व ठिकाणी राष्ट्रवादीचाच गजर झाला आहे.