शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

साईबाबांच्या जन्मस्थळावरून उफाळलेला वाद शमेना; शिर्डीकर घेणार मुख्यमंत्र्यांकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 06:47 IST

साईबाबांची जन्मभूमी शिर्डीच असल्याचा दावा शिर्डीतील साईभक्तांनी केला आहे.

शिर्डी/पाथरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी (जि. परभणी) येथील साईबाबांच्या जन्मभूमी विकास आराखड्यास १०० कोटी रुपयांचा निधी दिल्याने साईबाबांच्या जन्मस्थळावरून पाथरी आणि शिर्डी ग्रामस्थांमध्ये वाद सुरू झाला आहे. पाथरीत कृती समिती स्थापन झाली आहे, तर शिर्डीकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

साईबाबांची जन्मभूमी शिर्डीच असल्याचा दावा शिर्डीतील साईभक्तांनी केला आहे. शिर्डीकरांनी निर्माण केलेल्या वादाला प्रत्युत्तर देण्यासाठी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय पाथरी येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला़ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील बैठकीत पाथरी येथील श्री साईबाबा जन्मभूमीच्या १०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली होती़ त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला शिर्डीकरांकडून विरोध करण्यात येत आहे़ या बैठकीस पाथरीतील श्री साई संस्थानचे विश्वस्त आ़ बाबाजानी दुर्राणी, विश्वस्त संजय भुसारी, अ‍ॅड़ अतुल चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश ढगे आदींची उपस्थिती होती़

दरम्यान, याप्रश्नी ग्रामस्थ व साईभक्तांची मुख्यमंत्र्याशी भेट घालून देण्यासाठी शिवसेनेचे नेते कमलाकर कोते व शहर प्रमुख सचिन कोते यांनी मुंबईत शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी ग्रामस्थांचा संवाद घडवून आणावा यासाठी ग्रामस्थांनी त्यांना विनंती केली़ दरम्यान येत्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री भेटीसाठी वेळ देणार असल्याचे राऊत यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

सध्या साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद सुरू आहेत़ शिर्डीकरांचा पाथरीला निधी देण्यास अथवा विकासासाठी कोणताही विरोध नाही़ मात्र त्याची ओळख साईजन्मस्थान असू नये, एवढीच शिर्डीकरांची मागणी आहे़ साईबाबांनी आपला जात, धर्म कधी सांगितला नाही़ त्यामुळेच ते सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहेत़ त्यांची ओळख अबाधित राहावी यासाठी शिर्डीकरांनी पाथरीच्या विकासाला नाही तर जन्मस्थान या उल्लेखाला आक्षेप घेतला आहे़ दरम्यान या प्रश्नी चर्चा करण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात प्रमुख ग्रामस्थांची लवकरच बैठक होणार आहे.शिर्डीकरांनी पुरावे द्यावेत!पाथरी ही श्री साईबाबा यांची जन्मभूमी असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत़ विकासापासून अनेक वर्षे दूर असलेल्या या श्री सार्इंच्या जन्मभूमीच्या विकासाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीनंतर चालना मिळाली़ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला असताना शिर्डीकरांनी नाहक विरोध सुरू केला आहे़ श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळासंदर्भात त्यांनी पुरावे सादर करावेत, असेही आमदार बाबाजानी दुर्राणी म्हणाले़

 

टॅग्स :saibabaसाईबाबाshirdiशिर्डीUddhav Thackerayउद्धव ठाकरे