शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 12:35 IST

विधानसभा निवडणुकीसाठी आता काहीच महिने शिल्लक आहेत त्यामुळे सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळेच काँग्रेसनं राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. परंतु काँग्रेसची ही रणनीती आहे की महाविकास आघाडीत दबावतंत्राचं राजकारण असा प्रश्न निर्माण होत आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं महाराष्ट्रात सर्वाधिक १३ जागा जिंकल्या तर १ अपक्ष ज्यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली तेदेखील निवडून आल्यानंतर काँग्रेसमध्ये सहभागी झालेत. त्यामुळे काँग्रेसकडे एकूण १४ खासदारांचे बळ आहे. अशात विधानसभा निवडणुकीत मविआकडून जास्तीत जास्त लढवण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. मात्र तत्पूर्वी काँग्रेस २८८ मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवून पक्ष संघटनेची रणनीती आखत असल्याचं दिसून येते. 

काँग्रेसकडून इच्छुकांना पत्र गेले आहे. या पत्रात म्हटलंय की, राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून या निवडणुकीसाठी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारी अर्जाचा नमुना सोबत जोडला आहे असं मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना कळवण्यात आलं आहे.

पत्रात काय म्हटलंय?

इच्छुक उमेदवारांचा अर्ज प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात १० ऑगस्ट २०२४ पर्यंत जमा करावेत

विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्जासोबत सर्वसाधारण वर्गासाठी २० हजार आणि अनु जाती, जमाती, महिला उमेदवारांसाठी १० हजार रुपये पक्षनिधी म्हणून रोख अथवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नावे डी.डीद्वारे किंवा जिल्हा कमिटीकडे जमा करावेत.

जे उमेदवारी अर्ज जिल्हा काँग्रेस कमिटीकडे जमा होतील ते उमेदवारी अर्ज पक्षनिधीसह प्रदेश कार्यालयात उपरोक्त दिनांकापूर्वी सादर करावेत. आपापल्या जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहचवावी अशा सूचना प्रदेश काँग्रेसनं सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 

मविआतून लढण्यासाठी वरिष्ठ नेते आग्रही

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतूनच लढावी अशी सूचना काँग्रेसच्या वरिष्ठांनी राज्यातील नेत्यांना दिली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात दमदार यश मिळालं. राज्यातील ४८ पैकी ३१ जागांवर मविआ विजयी झाली, त्यात काँग्रेसनं सर्वाधिक १३ जागा जिंकल्या, त्यानंतर उद्धवसेनेनं २१ जागा लढवून ९ जागांवर विजय मिळवला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं १० जागा जिंकून ८ जागांवर विजय मिळवला. 

लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस, ठाकरे-पवार यांच्यात विधानसभेच्या जागांसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. राज्यातील २८८ मतदारसंघापैकी अधिक मतदारसंघ घेण्यास तिन्हीही पक्ष इच्छुक आहेत. अशा परिस्थितीत कुठेही वादंग होऊन स्वबळावर लढण्याची स्थिती आलीच तर पक्ष संघटना तयार राहावी यासाठी मविआतील तिन्ही पक्ष आपापल्या परीने पक्षाची ताकद वाढवण्यावर जोर देत आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीvidhan sabhaविधानसभा