शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

“केवळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले गेले नाहीत”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:08 IST

Congress Prithviraj Chavan Reaction on Union Budget 2025: चीनने एआयबाबत अमेरिकेला मागे टाकले आहे. यात आपण कुठे आहोत हा प्रश्न आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Congress Prithviraj Chavan Reaction on Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी सुमारे १ तास १४ मिनिटे चाललेल्या अर्थसंकल्पी भाषणामध्ये, युवा, शेतकरी, महिला, सेवाक्षेत्र, रोजगार, कर्ज आणि विशेष पॅकेज यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. एनडीएकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले असले, तरी महाविकास आघाडीकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात आली आहे. 

अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये १२ लाख रुपयांपर्यंतच्या कमाईवर कोणताही कर लागणार नसल्याची घोषणा करण्यात आली. नवीन इन्कम टॅक्स विधेयक पुढील आठवड्यात आणण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म्सबाबत पुढील आठवड्यात सांगण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. 

केवळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला अर्थसंकल्प

केवळ बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काही घोषणा यांनी केल्या आहेत. महागाईवर काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. देशाचा आर्थिक विकासदर मंदावत आहे. सरकारने ते मान्य केले आहे. २०४७ पर्यंत भारत विकसित होणार हे दिवा स्वप्न दाखवत आहात का, ते याबाबत नेमकेपणाने सांगत नाही. दरडोई उत्पन्नात आपण १४७ क्रमांकावर आहोत. लोकांचे सरासरी वार्षिक उत्पन्न वाढवण गरजेचे होते मात्र तसे दिसत नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसेच शेतकऱ्यांचे अश्रू पुसतील अशी अपेक्षा होती, परंतु असे काहीच केले नाही. शिक्षण क्षेत्रात काहीच केले नाही. अर्थमंत्र्यानी कृषी विभागाचे कौतुक केले. परंतु त्यांची प्रमुख मागणी म्हणजे हमी भाव मिळण्याचा कायदा, याबाबत काहीच केले नाही. आताही राज्यात दररोज ७ शेतकरी आत्महत्या करतात. खर्चापेक्षा कमी उत्पन मिळाले तर शेतकरी आत्महत्या रोखणार कसे, अशी विचारणा चव्हाण यांनी केली. १० लाख कोटी गुंतवणूक होणार अशी घोषणा केली. मात्र ते अस्तित्वात येईल असे वाटत नाही, असा दावा चव्हाण यांनी केला. 

दरम्यान, चीनने एआयबाबत अमेरिकेला मागे टाकले आहे. यात आपण कुठे आहोत हा प्रश्न आहे. २३ आयआयटी सुरू करण्यात आले आहे. परंतु आता तिथल्या दर्जा खालावण्याची परिस्थिती आहे. कारण तिथ शिकवण्यासाठी स्टाफ नाही. विमा क्षेत्रात १०० टक्के परकीय गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता परदेशी कंपन्या भारतात येतील. परदेशी विमा कंपन्या भारतात येतील. मात्र इथल्या विमा कंपन्यांना भक्कम करण गरजेचे आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.  

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Budget 2025अर्थसंकल्प २०२५Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेस