शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

काँग्रेस, राष्ट्रवादीत दुसऱ्या फळीतील नेत्यांची घुसमट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 5:29 AM

आम्हाला अधिवेशनात बोलू द्या, किती दिवस तेच ते नेते बोलणार?

- अतुल कुलकर्णी मुंबई : युती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात तरी आम्हा तरुणांना पुढे येऊन बोलू द्या, किती दिवस तेच ते नेते सतत बोलत राहणार? आम्ही कधी बोलणार? अशी खदखद काँग्रेस] राष्टÑवादी काँग्रेसमधील तरुण नेत्यांनी बोलून दाखवलीत्न निवडणुका समोर आहेत, आम्ही विरोधात काम करुन दाखवू, संधी तरी द्या अशा भावना या नेत्यांनी बोलून दाखवल्या आहेत.दोन्ही काँग्रेसच्या एकत्रित बैठकीत ज्येष्ठ नेत्यांमध्ये उत्साह नव्हता. सगळे मिळून लढू, एकत्र काम करु, विषय एकत्रीतपणे लावून धरु, हे बोलण्यापलिकडे फारसे काही घडले नाही. तेच ते चेहरे सोडून दुसरे नेते समोर आणायचेच नाहीत का, असा सवाल बैठकीनंतर काही नेत्यांनी केला. काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या रुपाने दुसºया फळीतला ओबीसी नेता समोर केला. मात्र दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाड, शशीकांत शिंदे, सुनील केदार, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, अमित देशमुख, वर्षा गायकवाड अशा दुसºया फळीच्या नेत्यांना पुढे करा, त्यांना बोलू द्या अशी मागणी ज्येष्ठ नेत्यांना केली आहे. आ. आव्हाड आणि आ. केदार यांनी तर एक पत्रच लिहून सगळीकडे पाठवले आहे. हे पत्र कोण्या नेत्यासाठी नसून गाव पातळीपासून राज्य, राष्ट्रीय पातळीपर्यंतच्या नेत्यांसाठी आहे असे या दोघांनी म्हटले आहे.आ. आव्हाड म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये आली व अनेकजण १५ वर्षे मंत्री राहिले. काहींना २० ते २५ वर्षे लाभली. पण, मागची एक पिढी या नेत्यांच्या मागून चालत आहे हे त्यांनी विसरु नये. पुरोगामी विचारांची पुरस्कार करणारी, शाहू, फुले, आंबेडकरांवर प्रेम करणाºया या दुसºया पिढीचे आयुष्य, भविष्य या सगळ्या नेते मंडळींच्या हातात आहे. त्यामुळे पत्राद्वारे आम्ही त्यांना विनंती केली आहे की, तुमच्या मागून चालणाºया पिढीला विश्वास द्या, संधी द्या, तरुण कार्यकर्त्यांना पराभव जिव्हारी लागतो आणि ते उसळून उभे राहतात ही त्यांच्या वयाची किमया असते. या बंडखोरीला फुंकर मारुन जागवायचे काम या नेत्यांना करावे लागेल असेही ते म्हणाले.केदार आणि आव्हाड म्हणाले, आप-आपसातले मतभेद, पक्षीय राजकारण बंद खोलीत बसून मिटवा. ते वृत्तपत्रासमोर प्रदर्शित होणार नाही याची काळजी घ्या आणि ही लढाई जिंकून महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी विजय नोंदवा अशी कळकळीची विनंती आम्ही केली आहे, कोणत्याही नेत्याने ही व्यक्तीगत घेऊ नये, आमच्या भावना सगळ्यांसाठी आहेत असेही ते म्हणाले.तावडे यांनी घेतली विरोधी पक्षनेत्यांची भेटपावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी आ. गणपतराव देशमुख, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, नसिम खान, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, शेकापचे जयंत पाटील, अबु आझमी, जयंत पाटील हे नेते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस