शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Nana Patole : "इंग्रज सरकारपेक्षाही जुलमी भाजपा सरकारला जनता सत्तेवरून पायउतार करेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 18:04 IST

Congress Nana Patole Slams Modi Government : केंद्र सरकारच्या अत्याचाराविरोधात काँग्रेस देशभर शांततेत सत्याग्रह करत आहे पण हे आंदोलनही पोलीस बळावर दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुंबई - केंद्र सरकारने दूध, दही, तेल, तूप, खाण्यापिण्याच्या पदार्थांसह सर्वच वस्तुंवर जीएसटी लावल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा जनतेलाच भोगावा लागणार आहे. जीएसटी, महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना या मुद्द्यांवर काँग्रेस व सहयोगी पक्ष संसदेत आवाज उठवू पाहत आहेत म्हणून विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी खोट्या प्रकरण उकरून काढत सोनियाजी गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

सोनिया गांधी यांना सलग दुसऱ्या दिवशी ईडीने चौकशीला बोलावल्यामुळे राज्यभर आजही सत्याग्रह करून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत सत्याग्रह करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, नवी मुंबई काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल कौशिक, संतोष शेट्टी, महेंद्र घरतदिप्ती चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ईडी, सीबीआयसारख्या संस्था मोदी सरकारच्या काळात स्वतंत्र राहिलेल्या नाहीत, या संस्थांना मोदी सरकारने बाहुल्या बनवले आहे व ते सरकारच्या इशाऱ्यावर विरोधकांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. संसद अधिवेशन सुरू असल्याने जीएसटी, अग्निपथ योजनेवर काँग्रेस चर्चेची मागणी करत आहे पण मोदी सरकार चर्चेपासून पळ काढत आहे. प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदारांना लोकसभा व राज्यसभेतून निलंबित केले जात आहे. सोनियाजी व राहुलजी जनतेचा आवाज उठवत आहेत म्हणूनच घाबरून केंद्र सरकार त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. 

केंद्र सरकारच्या अत्याचाराविरोधात काँग्रेस देशभर शांततेत सत्याग्रह करत आहे पण हे आंदोलनही पोलीस बळावर दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस नेते राहुलजी गांधी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांच्यासह ५७ खासदारांना पोलिसांनी दिल्लीत सत्याग्रह करताना ताब्यात घेऊन दिवसभर डांबून ठेवले. भाजपा सरकार हे ब्रिटीश सरकारपेक्षा जास्त अत्याचारी आहे. काँग्रेसने शांततेत सत्याग्रह करून जुलमी ब्रिटीश सत्तेला देशातून पळवून लावले केंद्रातील भाजपा सरकारही पळ काढेल हे नक्की. सोनिया गांधी आजारी असतानाही चौकशीची नावाखाली त्यांचा छळ केला जात आहे म्हणून केंद्रातील जुलमी भाजपा सरकारच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही नवी मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, अकोला, नांदेडसह राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयी सत्याग्रह करण्यात आला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय