शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

“मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ”; जळगाव दुर्घटनेवरून काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 21:02 IST

Congress Nana Patole Reaction On Jalgaon Railway Accident: जळगाव रेल्वे अपघातावरून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Congress Nana Patole Reaction On Jalgaon Railway Accident: पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन कर्नाटक एक्सप्रेस आली. या ट्रेनखाली येऊन जवळपास १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ही भीषण घटना पाचोरा ते परधाडे दरम्यान घडली. यात ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरून आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली असून, काँग्रेसने या प्रकरणी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

माहिजी-परधाडे स्थानक येण्यापूर्वी एका बोगीत चैन ओढली गेली. त्यानंतर वेगात असलेल्या रेल्वेगाडीने अचानक ब्रेक दाबायला सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेरुळांवर ठिणग्या उडत गेल्या. परधाडे स्टेशनवर रेल्वेगाडी थांबली. तेव्हा एका बोगीतील प्रवाशांना या ठिणग्या दिसल्यावर बोगीत आग लागली असावी, या शक्यतेने ५० ते ६० जण समोरच्या रुळावर धावले. तशातच समोरुन वेगात कर्नाटक एक्स्प्रेस आली. त्यावेळी रुळावरच्या प्रवाशांची धावाधाव सुरु केली असतानाच काही जण रेल्वेखाली चिरडले गेले, असे म्हटले जात आहे. 

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ झालेली आहे. यात निर्दोष लोकांचा जीव जात आहे. पंतप्रधान मोदी यांचे सरकार योजना आणण्याच्या घोषणा करतात. कोणाचा जीव जाणार नाही, असे दावे करतात. कवच नावाची योजना आणणार असल्याचेही सांगितले जाते. परंतु, त्याचा किती उपयोग होत आहे, हे स्पष्ट आहे. कवच योजना ही जुमलेबाजी आहे. उलट आमच्या सरकारच्या कार्यकाळात रेल्वेची तिकिटे स्वस्त होती. आता मोदी सरकारच्या कार्यकाळात तिकीट दर तर वाढवण्यात आले आहेतच. पण लोकांचा जीवही जात आहे. हे प्रकार अजून किती होत राहणार, असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. 

दरम्यान, रेल्वे अपघातांवर केंद्र सरकारचे नियंत्रण नाही. केंद्र सरकार त्यांच्या मित्रांची मालगाडी अधिकाधिक कशी धावेल, हे पाहत आहे. मित्रांचा फायदा कसा होईल, हे पाहत आहे. सामान्य प्रवाशांसाठी असलेल्या प्रवासी रेल्वेचा अशा प्रकारे अपघात होणे दुर्दैवी आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :JalgaonजळगावNana Patoleनाना पटोलेNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारIndian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वे