शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

“मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ”; जळगाव दुर्घटनेवरून काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 21:02 IST

Congress Nana Patole Reaction On Jalgaon Railway Accident: जळगाव रेल्वे अपघातावरून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Congress Nana Patole Reaction On Jalgaon Railway Accident: पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन कर्नाटक एक्सप्रेस आली. या ट्रेनखाली येऊन जवळपास १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ही भीषण घटना पाचोरा ते परधाडे दरम्यान घडली. यात ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरून आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली असून, काँग्रेसने या प्रकरणी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

माहिजी-परधाडे स्थानक येण्यापूर्वी एका बोगीत चैन ओढली गेली. त्यानंतर वेगात असलेल्या रेल्वेगाडीने अचानक ब्रेक दाबायला सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेरुळांवर ठिणग्या उडत गेल्या. परधाडे स्टेशनवर रेल्वेगाडी थांबली. तेव्हा एका बोगीतील प्रवाशांना या ठिणग्या दिसल्यावर बोगीत आग लागली असावी, या शक्यतेने ५० ते ६० जण समोरच्या रुळावर धावले. तशातच समोरुन वेगात कर्नाटक एक्स्प्रेस आली. त्यावेळी रुळावरच्या प्रवाशांची धावाधाव सुरु केली असतानाच काही जण रेल्वेखाली चिरडले गेले, असे म्हटले जात आहे. 

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ झालेली आहे. यात निर्दोष लोकांचा जीव जात आहे. पंतप्रधान मोदी यांचे सरकार योजना आणण्याच्या घोषणा करतात. कोणाचा जीव जाणार नाही, असे दावे करतात. कवच नावाची योजना आणणार असल्याचेही सांगितले जाते. परंतु, त्याचा किती उपयोग होत आहे, हे स्पष्ट आहे. कवच योजना ही जुमलेबाजी आहे. उलट आमच्या सरकारच्या कार्यकाळात रेल्वेची तिकिटे स्वस्त होती. आता मोदी सरकारच्या कार्यकाळात तिकीट दर तर वाढवण्यात आले आहेतच. पण लोकांचा जीवही जात आहे. हे प्रकार अजून किती होत राहणार, असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. 

दरम्यान, रेल्वे अपघातांवर केंद्र सरकारचे नियंत्रण नाही. केंद्र सरकार त्यांच्या मित्रांची मालगाडी अधिकाधिक कशी धावेल, हे पाहत आहे. मित्रांचा फायदा कसा होईल, हे पाहत आहे. सामान्य प्रवाशांसाठी असलेल्या प्रवासी रेल्वेचा अशा प्रकारे अपघात होणे दुर्दैवी आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :JalgaonजळगावNana Patoleनाना पटोलेNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारIndian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वे