शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
4
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
5
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
6
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
7
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
8
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
9
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
10
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
11
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
12
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
13
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
14
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
15
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
16
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
17
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
18
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
19
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
20
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Daily Top 2Weekly Top 5

Reservation: सामाजिक वाद निर्माण करून भाजप राजकीय पोळी भाजतंय; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 22:26 IST

Reservation: सामाजिक वाद निर्माण करून भाजप राजकीय पोळी भाजतंय अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

ठळक मुद्देआरक्षणावरून नाना पटोले यांनी भाजपवर केली टीकामहाविकास आघाडी सरकार कुठेही अडचणीत नाही - पटोलेभाजप ओबीसीविरोधी आहे; नाना पटोलेंचा दावा

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एकीकडे कोरोनाचे संकट असताना, दुसरीकडे मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर सत्ताधारी ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. यातच आता सामाजिक वाद निर्माण करून भाजप राजकीय पोळी भाजतंय अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (congress nana patole criticised bjp over obc and maratha reservation)

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मुंबईत काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षणासंदर्भातील मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. 

नवी मुंबईत एकही अद्ययावत सरकारी रूग्णालय का नाही?; हायकोर्टाने ठाकरे सरकारला सुनावले

भाजप खोटे बोलण्याचे काम करतेय

राज्यात २०१७ पासून मागासवर्गियांवर अन्याय सुरू आहेत. भाजप मोठ्या प्रमाणात खोटे बोलण्याचे काम करत आहे, असा दावा करत महाविकास आघाडी सरकार कुठेही अडचणीत नाही, असे ते म्हणाले. तसेच भाजप ओबीसीविरोधी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण देशाला लागू आहे. भाजपने संपूर्ण देशातील ओबीसी समाजाला अडचणीत आणले, असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. 

संजय राऊत यांच्याबद्दल रोज रोज काय बोलायचं? देवेंद्र फडणवीसांचा टोला

आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी

भाजपने ओबीसी समाजाचा घात केला आहे. त्यामुळे आता भाजपने ओबीसी समाजाला ग्राह्य धरू नये. भाजप हा दुतोंडी पक्ष आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला होता. आताचे पंतप्रधानही संघाचे प्रचारक आहेत. सरसंघचालकांचा आदेश प्रचारकाला मानावा लागतो. त्यामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी आहे, अशी जोरदार टीका नाना पटोले यांनी केली होती. 

“उत्तर प्रदेशमधील मृत्यूदर हा अमेरिका आणि युरोपपेक्षाही कमी”: योगी आदित्यनाथ

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यावर, देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षे नागपूर जिल्हा परिषद निवडणूक होऊ दिली नव्हती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर निवडणुका लागल्या, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी यावेळी बोलताना दिले.  

 

 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण