शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
4
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
5
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
6
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
7
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
8
"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !
9
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
11
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
12
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
13
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
14
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
15
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
16
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
17
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
18
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
19
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
20
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा

Reservation: सामाजिक वाद निर्माण करून भाजप राजकीय पोळी भाजतंय; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 22:26 IST

Reservation: सामाजिक वाद निर्माण करून भाजप राजकीय पोळी भाजतंय अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

ठळक मुद्देआरक्षणावरून नाना पटोले यांनी भाजपवर केली टीकामहाविकास आघाडी सरकार कुठेही अडचणीत नाही - पटोलेभाजप ओबीसीविरोधी आहे; नाना पटोलेंचा दावा

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एकीकडे कोरोनाचे संकट असताना, दुसरीकडे मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर सत्ताधारी ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. यातच आता सामाजिक वाद निर्माण करून भाजप राजकीय पोळी भाजतंय अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (congress nana patole criticised bjp over obc and maratha reservation)

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मुंबईत काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षणासंदर्भातील मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. 

नवी मुंबईत एकही अद्ययावत सरकारी रूग्णालय का नाही?; हायकोर्टाने ठाकरे सरकारला सुनावले

भाजप खोटे बोलण्याचे काम करतेय

राज्यात २०१७ पासून मागासवर्गियांवर अन्याय सुरू आहेत. भाजप मोठ्या प्रमाणात खोटे बोलण्याचे काम करत आहे, असा दावा करत महाविकास आघाडी सरकार कुठेही अडचणीत नाही, असे ते म्हणाले. तसेच भाजप ओबीसीविरोधी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण देशाला लागू आहे. भाजपने संपूर्ण देशातील ओबीसी समाजाला अडचणीत आणले, असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. 

संजय राऊत यांच्याबद्दल रोज रोज काय बोलायचं? देवेंद्र फडणवीसांचा टोला

आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी

भाजपने ओबीसी समाजाचा घात केला आहे. त्यामुळे आता भाजपने ओबीसी समाजाला ग्राह्य धरू नये. भाजप हा दुतोंडी पक्ष आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला होता. आताचे पंतप्रधानही संघाचे प्रचारक आहेत. सरसंघचालकांचा आदेश प्रचारकाला मानावा लागतो. त्यामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी आहे, अशी जोरदार टीका नाना पटोले यांनी केली होती. 

“उत्तर प्रदेशमधील मृत्यूदर हा अमेरिका आणि युरोपपेक्षाही कमी”: योगी आदित्यनाथ

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यावर, देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षे नागपूर जिल्हा परिषद निवडणूक होऊ दिली नव्हती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर निवडणुका लागल्या, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी यावेळी बोलताना दिले.  

 

 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण