शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

Reservation: सामाजिक वाद निर्माण करून भाजप राजकीय पोळी भाजतंय; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 22:26 IST

Reservation: सामाजिक वाद निर्माण करून भाजप राजकीय पोळी भाजतंय अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

ठळक मुद्देआरक्षणावरून नाना पटोले यांनी भाजपवर केली टीकामहाविकास आघाडी सरकार कुठेही अडचणीत नाही - पटोलेभाजप ओबीसीविरोधी आहे; नाना पटोलेंचा दावा

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एकीकडे कोरोनाचे संकट असताना, दुसरीकडे मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर सत्ताधारी ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. यातच आता सामाजिक वाद निर्माण करून भाजप राजकीय पोळी भाजतंय अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (congress nana patole criticised bjp over obc and maratha reservation)

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मुंबईत काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षणासंदर्भातील मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. 

नवी मुंबईत एकही अद्ययावत सरकारी रूग्णालय का नाही?; हायकोर्टाने ठाकरे सरकारला सुनावले

भाजप खोटे बोलण्याचे काम करतेय

राज्यात २०१७ पासून मागासवर्गियांवर अन्याय सुरू आहेत. भाजप मोठ्या प्रमाणात खोटे बोलण्याचे काम करत आहे, असा दावा करत महाविकास आघाडी सरकार कुठेही अडचणीत नाही, असे ते म्हणाले. तसेच भाजप ओबीसीविरोधी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण देशाला लागू आहे. भाजपने संपूर्ण देशातील ओबीसी समाजाला अडचणीत आणले, असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. 

संजय राऊत यांच्याबद्दल रोज रोज काय बोलायचं? देवेंद्र फडणवीसांचा टोला

आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी

भाजपने ओबीसी समाजाचा घात केला आहे. त्यामुळे आता भाजपने ओबीसी समाजाला ग्राह्य धरू नये. भाजप हा दुतोंडी पक्ष आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला होता. आताचे पंतप्रधानही संघाचे प्रचारक आहेत. सरसंघचालकांचा आदेश प्रचारकाला मानावा लागतो. त्यामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी आहे, अशी जोरदार टीका नाना पटोले यांनी केली होती. 

“उत्तर प्रदेशमधील मृत्यूदर हा अमेरिका आणि युरोपपेक्षाही कमी”: योगी आदित्यनाथ

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यावर, देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षे नागपूर जिल्हा परिषद निवडणूक होऊ दिली नव्हती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर निवडणुका लागल्या, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी यावेळी बोलताना दिले.  

 

 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण