शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

“तसं काही नव्या सहकार मंत्रालयाकडून होऊ नये”; ठाकरे सरकारमधील मंत्र्याने व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 18:02 IST

केंद्र सरकारने नव्याने निर्माण केलेल्या सहकार खात्याचा हेतु आम्हाला अद्याप समजलेला नाही. त्यामुळे त्यावर आताच काही बोलता येणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अहमदनगर: केंद्राने नवीन सहकार मंत्रालयाची स्थापना करून त्याची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यानंतर राज्यातील या विषयावरून चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील ठाकरे सरकारच्या एका मंत्र्याने, केंद्र सरकारने नव्याने निर्माण केलेल्या सहकार खात्याचा हेतु आम्हाला अद्याप समजलेला नाही. त्यामुळे त्यावर आताच काही बोलता येणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (congress balasaheb thorat react on central cooperative ministry)

केंद्र सरकारच्या नवीन सहकार मंत्रालय सुरू केले. त्यासाठी ज्येष्ठ मंत्र्यांची नियुक्ती केली. मात्र, या खात्याचा हेतु अद्याप आम्हाला कळलेला नाही. मध्यतंरी केंद्र सरकारने एक कायदा केला. त्यानुसार आपल्याकडील अर्बन आणि सर्वच सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण येणार आहे. हे नियंत्रणही मर्यादेपलीकडील आहे, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी ते बोलत होते. 

कोरोनाची लस घेतल्यानंतर सेक्सपासून दूर राहा; ‘या’ देशाचा नागरिकांना सल्ला

हे सहकाराच्या तत्वाला धरून नाही

या बँकांचे अध्यक्षही संचालकांतून नव्हे तर रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेने नियुक्त केले जाणार आहेत. कार्यकारी संचालकही रिझर्व्ह बँकेकडूनच येणार. संचालकांचे अधिकारही कमी करून टाकले आहेत. हे सहकाराच्या तत्वाला धरून नाही. जर सहकारात काही चुकत असेल तर संबंधितांना शिक्षा जरूर केली पाहिजे. मात्र, सहकाराचे जे तत्व आहे, सहकाराचा जो प्राण आहे, तो तर टिकला पाहिजे. दुर्दैवाने त्या कायद्यामध्ये असे होताना दिसत नाही. आता नव्या सहकार खात्याकडून असे काही न होता, सहकार बळकट करण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा आहे, असे थोरात म्हणाले. 

“भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता कॅबिनेट मंत्री बनवले”

भाजपने देशाची माफी मागावी

गेल्या ७ वर्षांत भाजपच्या सत्ता काळात देशासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले. सामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले. सरकारची सगळी धोरणे चूकत गेली. त्यामुळे महागाई, बेरोजगारी वाढली. तेव्हा इंधनाचे दर काही पैशांत जरी वाढले तरी भाजपचे नेते आक्रमक होऊन आंदोलने करीत असत. आता भरमसाठ दरवाढ होत असूनही, ते देशाची दिशाभूल करणारी विधाने करीत आहेत. त्यामुळे त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करत त्यांचा हा फोलपणा उघड करण्यासाठी काँग्रेसतर्फे आंदोलन हाती घेण्यात आले आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAmit Shahअमित शहाBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसBJPभाजपा