शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

नागरी पतसंस्थांसाठी ‘सामोपचारा’ची तडजोड

By admin | Updated: March 27, 2015 23:38 IST

राज्यातील १७ हजार नागरी सहकारी पतसंस्थांच्या बळकटीकरणासाठी सहकार विभागाने ‘सामोपचारा’चा हात पुढे केला आहे. अडचणीत आलेल्या या संस्थांना सावरण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आली आहे.

विलास गावंडे ल्ल यवतमाळ राज्यातील १७ हजार नागरी सहकारी पतसंस्थांच्या बळकटीकरणासाठी सहकार विभागाने ‘सामोपचारा’चा हात पुढे केला आहे. अडचणीत आलेल्या या संस्थांना सावरण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आली आहे. ‘सामोपचार परतफेड योजनेला’ मुदतवाढ देताना संस्थेसोबतच कर्जदारांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पतसंस्थांनीही वसुलीसाठी चांगले प्रयत्न करण्याची गरज शासनाने व्यक्त केली आहे.कर्ज वसुलीचे प्रमाण नगण्य असल्याने नागरी सहकारी पतसंस्थांचा ‘एनपीए’ वाढला. परिणामी, थकीत कर्जाची तरतूद पतसंस्थांनाच करावी लागत आहे. ठेवीदारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. अनेक संस्थांमधील ठेवी कमी झाल्या. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठेवी काढल्या गेल्या. यामुळे अनेक पतसंस्था अडचणीत आल्या. वसुलीसाठी चांगले प्रयत्न पतसंस्थांकडून होत नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या संस्था टिकाव्यात यासाठी शासनाच्या सहकारी विभागाने पुढाकार घेत राज्यातील सर्व नागरी सहकारी पतसंस्थांसाठी ‘सामोपचार परतफेड’ योजनेला २००७ मध्ये मान्यता दिली होती. यानंतरही काही संस्थांचा ‘एनपीए’ कमी झाला नाही; परंतु काही संस्थांची कामगिरी चांगली राहिली. त्यामुळे सहकार विभागाने या योजनेला पुन्हा दोन वर्षे मुदतवाढ देण्याची विनंती शासनाकडे केली. सहकार आयुक्तांच्या प्रस्तावावरून शासनाने २६ मार्च रोजीच्या निर्णयानुसार सदर योजनेला ३१ मार्चपर्यंत सशर्त अटींसह मुदतवाढ दिली आहे. संस्थेला ‘एनपीए’तून बाहेर काढण्यासाठी या संस्थांना ही चांगली संधी असून, सहकार चळवळीला बळकटीसाठी त्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.४कर्ज ‘एनपीए’ ठरविण्यासाठी कट आॅफ डेट ३१ मार्च २०११ निश्चित करण्यात आली आहे. कर्जदार तडजोडीचा व्याजदर १२ टक्के राहणार आहे. तडजोडीची रक्कम एक रकमी भरणार असल्यास व्याजाची आकारणी आठ टक्के दराने करण्याची मुभा राहणार आहे.शासनाने घेतलेला निर्णय सहकार चळवळीला बळकटी देणारा आहे. ‘एनपीए’ वाढलेल्या संस्थांनी या संधीचा लाभ घेतला पाहिजे. पतसंस्था स्वत:चे नुकसान करून घेत कर्जदारांना आपले कर्ज खाते ‘निल’ करण्याची संधी देत आहे. त्यामुळे त्यांनीही सहकार्य केले पाहिजे.-राजुदास जाधव,उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन, मुंबई