शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मेट्रो 3च्या सुमारे 200 मीटर बोगद्याचे काम पूर्ण, अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 16:41 IST

प्रत्यक्ष काम पाहिल्यावर त्याची अनुभूती येते, समाधान वाटते, एवढ्या कमी वेळात मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत, अशा शब्दात मुंबई भाजपा आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्यासह भाजपा आमदारांनी समाधान व्यक्त केले.

मुंबई- मेट्रो 3 कुलाबा ते सिप्झ या मेट्रोच्या कामाने वेग पकडला असून ही मेट्रो मुंबईकरांच्या पुढील पन्नास वर्षांसाठीची तरतूद आहे. प्रत्यक्ष काम पाहिल्यावर त्याची अनुभूती येते, समाधान वाटते, एवढ्या कमी वेळात मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत, अशा शब्दात मुंबई भाजपा आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्यासह भाजपा आमदारांनी समाधान व्यक्त केले.मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आज भाजपा आमदार भाई गिरकर, योगेश सागर, प्रसाद लाड यांनी मेट्रो 3 च्या कामाचा पाहणी दौरा केला. यावेळी एमएमआरडीएच्या अतिरिक्‍त आयुक्त अश्विनी भिडे आणि अन्य अधिकारीही उपस्थित होते. प्रथम आझाद मैदान येथील भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी करण्यात आली. सुमारे 150 मीटर खाली उतरून प्रत्यक्ष बोगद्यात उतरून या सर्वांनी कामाची माहिती अश्विनी भिडे यांच्याकडून जाणून घेतली.येथे एका बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली असून दुसऱ्या लाईनच्या बोगद्याचे मशीनही खाली उतरवण्यात आले आहे. नयानगर सह एकूण 200 मीटरच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून कामाने वेग पकडला आहे. तर त्यानंतर गिरगावातील मेट्रो स्टेशनचे जे काम सुरू आहे त्याचीही पाहणी केली. यावेळी बोलताना आमदार अ‍ॅड आशिष शेलार म्हणाले की, मेट्रो ची कामे सुरू आहेत त्यामुळे मुंबईकरांची आज गैरसोय होते आहे. पण त्यातून भविष्यात मोठे काम उभे राहणार आहे. आज मुंबईकर ज्या पध्दतीने गैरसोय सहन करीत आहेत त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत. आम्ही लोकप्रतिनी आहोत. नेमके काम किती झाले आहेत व ते कसे केले जात आहे हे पाहता यावे म्हणुन आज आम्ही हा दौरा केला. काही प्रश्न आम्हाला होते तसेच लोक आम्हाला विचारतात त्याची माहितीही जाणून आम्ही घेतली.प्रत्यक्ष काम पाहिल्यावर इंजिनिरींगच्या कामाचा हा अविष्कार असल्याची अनुभूती येते. काम समाधानकारक सुरू आहे. ज्या वेगाने मुंबईत सर्व मेट्रो ची कामे सुरू आहेत ती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईकरांच्या वतीने आभारच मानायला हवेत. ही मेट्रो मुंबईतील सिध्दीविनायक, मुंबा देवी, महालक्ष्मी, हाजी अली, माहिम दर्गा, चैत्यभूमी आणि माहीम चर्च सर्व धार्मिक स्थळे जोडणारी आहे. तसेच ती मोठी हास्पीटल यांनाही जोडणारी आहे. त्यामुळे मुंबई येणाऱ्या पर्यटकांना सुविधा होईलच शिवाय मुंबईकरांची ही गैरसोय दूर करणारी आहे. असेही आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, आमदार अ‍ॅड. आशिष शेलार आणि सर्वच भाजप आमदारांनी कामाबद्दल समाधान व्यक्त करीत अधिकारी, काम करणार्‍या कामगार, इंजिनिअर व त्यांच्या टीमचे कौतुक करून आभार ही मानले. आमदार प्रसाद लाड यांनी ही कामाबाबत समाधान व्यक्त करीत ही मेट्रो मुंबईकरांची भविष्य आहे अशा भावना व्यक्त केल्या तर आमदार भाई गिरकर आणि योगेश सागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले दिल्ली आणि अन्य शहरात मेट्रो होती पण मुंबईकरांसाठी ही सेवा मुख्यमंत्र्यामुळे उपलब्ध होणार आहे असे सांगितले. तर पश्चिम उपनगरातील मुंबईकर कोणत्याही अडथळ्यावीना या मेट्रोमुळे कुलाब्या पर्यंत येईल. त्यामुळे ही सेवा अत्यंत महत्त्वाचीच ठरेल असे सांगितले.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारMetroमेट्रोMumbaiमुंबई