शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण टोलमुक्तीच हवी

By admin | Updated: May 20, 2015 00:58 IST

कृती समितीची बैठक : पर्याय स्वीकाराल तर कडेलोटाची शिक्षा : एन. डी. पाटील

कोल्हापूर : केवळ एमएच ०९ च्या वाहनांना १ जूनपासून टोलमुक्त करण्याचा पालकमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळून संपूर्ण टोलमुक्तीच हवी, त्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा सूर टोलविरोधी कृती समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत उमटला. यासंदर्भात येत्या शुक्रवारी ‘कोल्हापूर बंद’ ची हाक देण्याची मागणीही अनेक वक्त्यांनी केली. मात्र, त्यासंदर्भात आज, बुधवारी पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे बैठकीत जाहीर करण्यात आले.१ जूनपासून कोल्हापूर टोलमुक्त करण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती. मात्र, त्यावर घूमजाव करीत केवळ एमएच ०९ या वाहनांनाच टोलमुक्त करण्याचा शासनाचा विचार आहे. तशी अधिसूचना काढण्यात येणार आहे. असे असले तरी संपूर्ण टोलमाफीला आम्ही बांधील आहोत, असे त्यांनी सोमवारी प्रा. एन. डी. पाटील यांच्यासह कृती समितीच्या नेत्यांशी चर्चेत सांगितले होते आणि विरोध मागे घेण्याचे आवाहन केले होते. कृती समितीच्या नेत्यांनी त्यांना कोणतेच आश्वासन न देता मंगळवारी बैठकीत निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यानुसार ही बैठक झाली.तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत विविध पक्ष व संघटनांच्या ३६ कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत संपूर्ण टोल रद्दच झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. आजच्या बैठकीला कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठी होती.टोलमुक्त कोल्हापूरच्या लढ्याचे दायित्व स्वीकारलेल्या कृती समितीचे आणि टोल रद्द करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारचे दोर आता तुटलेले आहेत. टोलला पर्याय स्वीकारणे म्हणजे जनतेच्या अस्मितेला धक्का पोहोचविण्या-सारखे आहे. जर पर्याय स्वीकारला तर जनता कडेलोटाचीच शिक्षा देईल, असा खणखणीत इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी या बैठकीत बोलताना दिला.कोणत्याही पर्यायावर आज आम्ही चर्चा करणार नाही. संपूर्ण टोलमुक्ती झाली पाहिजे, ही जनतेची मागणी आहे. आम्ही या भूमिकेशी आजही ठाम आहोत. ज्या जनतेच्या विश्वासावर आम्ही लढा उभारला, तिचा विश्वासघात करून संपूर्ण टोलमुक्तीचा नारा आम्ही सोडून दिला, तर जनता पुढे कधीही आमच्यावर विश्वास ठेवणार नाही. उलट ती आम्हाला खड्यासारखे बाजूला करील, अशी भीतीही प्रा. पाटील यांनी व्यक्त केली.परिणाम भोगावे लागलेटोल रद्दसाठी ठाम आहोत म्हणून राज्यकर्ते पर्याय घेऊन आले आहेत. हा पर्याय आताच कसा आला, पूर्वी का आणला नाही? असा सवाल करीत प्रा. पाटील म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण सरकारने निर्णय घेतला नाही; त्यामुळे त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले. कोल्हापूरच्या एका मंत्र्याने टोलची पावती फाडली. त्याचीही त्याला किंमत मोजावी लागली; परंतु आम्ही लढ्याच्या मैदानावर ठामपणे उभे आहोत. त्यामुळे अंतिम विजय हा जनतेचाच असेल. राज्यसत्ता नमणार आहे. (प्रतिनिधी)कर्जाचा बोजा महापालिकेवर नकोबैठकीला महानगरपलिकेचे उपमहापौर मोहन गोंजारे, परिवहन सभापती अजित पवार, सभागृहाचे नेते चंद्रकांत घाडगे, गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. यावेळी गोंजारे यांनी रस्ते प्रकल्पाचा खर्च कर्जाच्या स्वरूपात महानगरपलिकेवर टाकू नये. तो आम्ही स्वीकारणार नाही, असे सांगितले.‘कोल्हापूर बंद’चा निर्णय आज शक्यटोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी म्हणजेच येत्या शुक्रवारी ‘कोल्हापूर बंद’ ची हाक देऊन निदर्शने करण्याची मागणी अनेक वक्त्यांनी केली. मात्र, कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तो आज, बुधवारी पुन्हा होणाऱ्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.