शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

दिलासादायक : जगाच्या तुलनेत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 5:13 AM

इटली, इराण, अमेरिकेच्या तुलनेत भारताला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात बºयाच अंशी यश आले. याचे श्रेय आरोग्य संघटनेने भारताने वेळीच धाडसी निर्णय घेत केलेल्या लॉकडाऊनला दिले.

मुंबई : गेल्या काही दिवसांत भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आता कोरोना भारतात प्रचंड थैमान तर घालणार नाही ना, अशी भीती भारतीयांना आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे चीननंतर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणाºया मृत्यूंची संख्या ही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. याचे श्रेय जागतिक आरोग्य संघटनेने भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना दिले आहे.

कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३,२७० आहे. आता कोरोनावर नियंत्रण मिळविल्याचा दावा चीनने केला असला, तरी नुकतेच तिथे एकाच दिवशी ३६ नवे बाधित आढळले आहेत. कोरोनामुळे इराण, इटली, अमेरिका, स्पेनसह इतर युरोपियन देशांत भीषण परिस्थिती आहे. इटलीचा विचार केल्यास येथे ९ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. ८ मार्चपर्यंत येथे कोरोनाचे ७,३७५ रुग्ण होते, तर ३६६ जणांचा मृत्यू झाला होता. लॉकडाऊननंतर १७ मार्च रोजी येथे ३१,५०६ रुग्ण आढळले, तर २,५०३ जणांना जीवास मुकावे लागले. म्हणजे अवघ्या ९ दिवसांत २४,१३१ रुग्ण वाढले. मृतांची संख्याही तब्बल २,१३७ने वाढली.

इटली, इराण, अमेरिकेच्या तुलनेत भारताला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात बºयाच अंशी यश आले. याचे श्रेय आरोग्य संघटनेने भारताने वेळीच धाडसी निर्णय घेत केलेल्या लॉकडाऊनला दिले. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस एडरेनोम गैबरेयेसेस यांनी यासाठी भारताची प्रशंसा केली. तर संसर्गजन्य आजारांवर मात करण्याची भारताची चांगली क्षमता असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक जे. रेयान यांनी व्यक्त केले. मात्र कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या ही धोक्याची घंटा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याकडे लक्ष वेधले आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताने वेळेत उपाययोजना राबविल्या. लॉकडाऊनमुळे कम्युनिटी ट्रान्समिशन जास्त प्रमाणात दिसत नाही. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि सरकारी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले. यासाठी एक दिवस टाळ्या वाजवून काही होणार नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. म्हणूनच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येण्यासाठी भारतीयांनीही परिस्थितीचे (शारीरिक, सामाजिक, आर्थिक) गांभीर्य लक्षात घेऊन योग्य खबरदारी घ्यायला हवी.

अहवाल काय सांगतो?अमेरिकेतील न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या डिपार्टमेंट आॅफ बायो मेडिकल सायन्सेसने केलेल्या संशोधनानुसार बीसीजी लसीकरण करणाºया देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रभाव कमी दिसून येतो. बीसीजी म्हणजेच बेसिलस कार्मेट ग्युमिन्ग. मात्र, क्षयरोग हा तितकासा जीवघेणा राहिला नसल्याने अनेक प्रगत देशांमध्ये बीसीजीचे लसीकरण केले जात नाही. ज्या देशांनी बीसीजीचे लसीकरण अनेक वर्षांपूर्वी सोडले आहे तेच देश कोरोनाला जास्त बळी पडत आहेत, असे या अहवालात नमूद आहे. या अहवालातील निष्कर्षानुसार, लसीकरण मोहिमेत बीसीजी लस बंधनकारक असलेल्या भारतात यामुळेच कोरोनाचा प्रभाव कमी दिसून येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या