भाजपसोबत पुन्हा युती करणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 20:16 IST2022-02-25T20:11:14+5:302022-02-25T20:16:18+5:30

पुन्हा येईन म्हणायचं आणि यायचं नाही हे वाईट; पुन्हा येईन हे न सांगता येण्यात गंमत; ठाकरेंचा फडणवीसांना टोला

cm uddhav thackeray statement on shiv sena and bjp alliance in future | भाजपसोबत पुन्हा युती करणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

भाजपसोबत पुन्हा युती करणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई: मी पुन्हा येईन म्हणायचं आणि यायचंच नाही हे वाईट आहे. त्यापेक्षा पुन्हा येईन न म्हणता येण्यात गंमत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. दैनिक लोकसत्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र वि. राज्य संघर्ष, भाजपचं राजकारण, शिवसेनेची वाटचाल यावर ठाकरेंनी सविस्तर भाष्य केलं.

गेल्या आठवड्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव मुंबईत येऊन गेले. त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा झाली. केंद्र विरुद्ध राज्य संघर्षावर आम्ही बोललो. पण त्यात कुठेही कोणाचा द्वेष नव्हता. कारण आमच्यासाठी देश महत्त्वाचा आहे. सगळे एकत्र आले तर पुढे काय ते बघू, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्याचं हित लक्षात घेऊन निर्णय घेतला. आता देशाच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेऊ, असं सूचक विधान त्यांनी केलं.

यापुढे भाजपसोबत युती करणार का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. आता ज्या दिशेनं भाजपची वाटचाल सुरू आहे, जे काही राजकारण चाललं आहे, त्यात काही सुधारणा होणार आहे का, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. भाजपसोबतची युती वैचारिक होती. एक वैचारिक पातळी होती. आता ती पातळी कुठेतरी पातळात गेली आहे. त्यांना कोणासोबतही युती केली. त्यांचाच कित्ता मग आम्ही गिरवला, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: cm uddhav thackeray statement on shiv sena and bjp alliance in future