शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

'भाजपाला तंगड्यात तंगडं घालायची सवय; मला अनुभव नसल्यानेच ते अडचणीत आणताहेत!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 15:59 IST

महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात आनंदाचं वातावरण आहे

नागपूर: नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी महाविकासआघाडीच्या विधिमंडळ पक्ष आमदारांची महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली होती. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर काही वेळ वादळी चर्चा झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आले होते. भाजपाच्या या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या बैठकीत टीका केली आहे.

महाविकासआघाडीतील प्रमुख नेते व आमदारांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. मला अनुभव नसल्यानं भाजपा अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच भाजपाला तंगड्यात तंगड घालण्याची सवय असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे जनतेचं काम करा, त्यांचा भ्रमनिरास होईल असं काम करु नका असं आवाहन त्यांनी सर्व आमदारांना केले. तसेच गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठा वाद सुरू आहे. या कायद्यामुळे देशभरात हिंसाचार घडत असताना आमदारांनी आपल्या मतदार संघात ही परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याचा सल्ला देखील उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला.

स्वातंत्र्य वीर सावरकरांबाबत आमची भावना होती ती आहे, कालही होती, आजही आहे, उद्याही तशीच राहेल, त्यात काही फरक पडणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. माफी मागायला मी काही सावरकर नाही, राहुल गांधींनी असं म्हटल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधींच्या या विधानावरून आता भाजपानं त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधींच्या या विधानावरून शिवसेनेनंही आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही राहुल गांधींना कडक शब्दांत इशारा दिला आहे. वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्याप्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला असल्याचे सांगत त्यांचा सन्मान करायलाच हवा असं संजय राऊत यांनी स्पष्टीकरणं दिलं होतं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक