शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपाला तंगड्यात तंगडं घालायची सवय; मला अनुभव नसल्यानेच ते अडचणीत आणताहेत!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 15:59 IST

महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात आनंदाचं वातावरण आहे

नागपूर: नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी महाविकासआघाडीच्या विधिमंडळ पक्ष आमदारांची महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली होती. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर काही वेळ वादळी चर्चा झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आले होते. भाजपाच्या या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या बैठकीत टीका केली आहे.

महाविकासआघाडीतील प्रमुख नेते व आमदारांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. मला अनुभव नसल्यानं भाजपा अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच भाजपाला तंगड्यात तंगड घालण्याची सवय असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे जनतेचं काम करा, त्यांचा भ्रमनिरास होईल असं काम करु नका असं आवाहन त्यांनी सर्व आमदारांना केले. तसेच गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठा वाद सुरू आहे. या कायद्यामुळे देशभरात हिंसाचार घडत असताना आमदारांनी आपल्या मतदार संघात ही परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याचा सल्ला देखील उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला.

स्वातंत्र्य वीर सावरकरांबाबत आमची भावना होती ती आहे, कालही होती, आजही आहे, उद्याही तशीच राहेल, त्यात काही फरक पडणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. माफी मागायला मी काही सावरकर नाही, राहुल गांधींनी असं म्हटल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधींच्या या विधानावरून आता भाजपानं त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधींच्या या विधानावरून शिवसेनेनंही आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही राहुल गांधींना कडक शब्दांत इशारा दिला आहे. वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्याप्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला असल्याचे सांगत त्यांचा सन्मान करायलाच हवा असं संजय राऊत यांनी स्पष्टीकरणं दिलं होतं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक