शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कलागुणांमुळे रखडला दहावीचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 22:03 IST

राज्य शासनाकडून ऐनवेळी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला आदी क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवणा-या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत वाढीव गुणांची सवलत देण्याचा निर्णय

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 7 - राज्य शासनाकडून ऐनवेळी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला आदी क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवणा-या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत वाढीव गुणांची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या वाढीव गुणांचा समावेश विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये करण्याचे काम बोर्डाकडून सुरू असल्याने दहावीच्या निकालास विलंब होत असल्याचे सुत्रांनी सांगितले.
 
दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवडयात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होतो, यंदाही बारावीच्या निकाला पाठोपाठ दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवडयात लागणे अपेक्षित होते. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये कला गुणांचे वाढीव गुण समाविष्ट करण्याचा निर्णय ऐनवेळी घेण्यात आल्याने निकाल वेळेवर लावण्यास विलंब लागत आहे.
 
राज्य शासनाने ७ जानेवारी २०१७ रोजी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला आदी क्षेत्रात प्राविण्य मिळविणाºया विद्यार्थ्यांना वाढीव गुणांची सवलत देण्याचा निर्णय घेऊन त्याची कार्यपध्दती निश्चित केली. या निर्णयाची कार्यवाही मार्च २०१८ मध्ये होणाºया दहावीच्या परीक्षेपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अचानक १४ मार्च २०१७ रोजी शासनाकडून शुध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले, त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्च २०१८ ऐवजी मार्च २०१७ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करावी असे आदेश शासनाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी काढले.
 
यंदाच्या वर्षी मुंबई विभागातून सर्वाधिक ३० हजार विद्यार्थी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला आदी प्रकारांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे विभागातून २५ हजार तर कोकण विभागातून ५ हजार विद्यार्थींचा समावेश आहे. त्यांच्या गुणपत्रिकेमध्ये या कलागुणांची नोंद करण्याचे काम सध्या सुरू आहे. कला गुणांची नोंद पहिल्यांदाच केली जात असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपध्दतीनुसार काळजीपूर्वक त्या गुणांची नोंद करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी वेळ लागत असल्याने यंदा दहावीच्या निकालास विलंब झाला आहे.
 
दहावीचा निकाला पुढच्या आठवडयात लावला जाईल त्याबाबतची निकालाची तारीख लवकरच अधिकृतपणे जाहीर करू तरी विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयावरून उठणाºया अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.