शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

थेट सरपंच निवडीमुळे गावागावांत वाद - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 20:24 IST

राज्य सरकारच्या थेट सरपंच निवडणुकीच्या धोरणामुळे राज्यातील गावागावात वाद निर्माण होऊ लागले आहेत. विकासकामे ठप्प झाली आहेत. राज्य सरकारचा हा निर्णय लोकशाहीला अत्यंत मारक आहे, असा थेट आरोप राज्य सरकारवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी येथे केला.

पुणे - राज्य सरकारच्या थेट सरपंच निवडणुकीच्या धोरणामुळे राज्यातील गावागावात वाद निर्माण होऊ लागले आहेत. विकासकामे ठप्प झाली आहेत. राज्य सरकारचा हा निर्णय लोकशाहीला अत्यंत मारक आहे, असा थेट आरोप राज्य सरकारवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी येथे केला.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील ३२ सरपंच आणि २७ ग्रामसेवक यांचा सत्कार सोहळा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कॅम्प येथील नेहरू मेमोरियल हॉल येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते-पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, प्रभारी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, महिला बालकल्याण सभापती राणी शेळके, समाजकल्याण सभापती सुरेखा चौरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले, संदीप कोहिणकर तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे महापालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक चेतन तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, राज्यात विकासकामे करताना आमदार विविध कामांबाबत कार्यशाळा घ्यावी. तशीच कार्यशाळा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांची घेणे गरजेचे आहे. त्यामुळे दर्जेदार कामे होतील. समाजाचा पैशाचा समाजाच्या विकास कामांसाठी होणे आवश्यक आहे. यातून विकासाची गाडी खेड्याकडे नेता येतील.

विश्वास देवकाते म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेचे मुद्रांक शुल्कचे तब्बल २९० कोटी रूपये राज्य सरकारकडून येणे बाकी आहे. हा निधी तातडीने मिळाल्यास जिल्ह्यातील रखडलेली विविध कामे करता येतील. त्याचबरोबर राज्यातील सर्वच शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.

सूरज मांढरे म्हणाले, सरपंच हे पद गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे जबाबदारीने प्रत्येकाने काम करावे, तरच गावात विकासकामे होतील. यंदा सरपंच आणि ग्रामसेवक पुरस्कार देण्यास उशिर झाला आहे. दोन्ही पुरस्कार हे २०१४-१५ आणि २०१५-१६ या दोन वर्षांतील आहेत. यापुढे दरवर्षी पुरस्कार देण्याच्या दृष्टीने नियोजन करू. 

सन २०१४-१५ मधील एकूण १६, तर सन २०१५-१६ मधील १६ अशी एकूण ३२ सरपंचांचा गौरव करण्यात आला. यामध्ये तब्बल १६ महिला सरपंचांचा समावेश आहे. तसेच  सन २०१४-१५ मधील १४ आणि सन २०१५-१६ मधील १३ ग्रामसवेक असे दोन वर्षांतील एकूण २७ जणांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरवण्यात आले. संदीप कोहिणकर यांनी प्रास्ताविक, तर आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले. 

त्रिस्तरीय रचना उदध्वस्त करण्याचा डाव

राज्य सरकारचा जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत नष्ट करण्याचा डाव आहे. जनतेमधून थेट सरपंच निवड करण्याचा हा त्यांचा चाचणी आहे. यापुढे ते जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही त्रिस्तरीय रचना उदध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे मला खात्रीलायक माहित आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जबाबदारीने काम करावे, असा सल्ला अजित पवार यांनी या वेळी दिला. तसेच राज्य सरकारला सर्वच थेट हवे असेल तर मुख्यमंत्री, पंतप्रधानही थेट जनतेतून का निवडत नाही, असे आव्हान दिले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसsarpanchसरपंचMaharashtraमहाराष्ट्र