शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

थेट सरपंच निवडीमुळे गावागावांत वाद - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 20:24 IST

राज्य सरकारच्या थेट सरपंच निवडणुकीच्या धोरणामुळे राज्यातील गावागावात वाद निर्माण होऊ लागले आहेत. विकासकामे ठप्प झाली आहेत. राज्य सरकारचा हा निर्णय लोकशाहीला अत्यंत मारक आहे, असा थेट आरोप राज्य सरकारवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी येथे केला.

पुणे - राज्य सरकारच्या थेट सरपंच निवडणुकीच्या धोरणामुळे राज्यातील गावागावात वाद निर्माण होऊ लागले आहेत. विकासकामे ठप्प झाली आहेत. राज्य सरकारचा हा निर्णय लोकशाहीला अत्यंत मारक आहे, असा थेट आरोप राज्य सरकारवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी येथे केला.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील ३२ सरपंच आणि २७ ग्रामसेवक यांचा सत्कार सोहळा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कॅम्प येथील नेहरू मेमोरियल हॉल येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते-पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, प्रभारी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, महिला बालकल्याण सभापती राणी शेळके, समाजकल्याण सभापती सुरेखा चौरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले, संदीप कोहिणकर तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे महापालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक चेतन तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, राज्यात विकासकामे करताना आमदार विविध कामांबाबत कार्यशाळा घ्यावी. तशीच कार्यशाळा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांची घेणे गरजेचे आहे. त्यामुळे दर्जेदार कामे होतील. समाजाचा पैशाचा समाजाच्या विकास कामांसाठी होणे आवश्यक आहे. यातून विकासाची गाडी खेड्याकडे नेता येतील.

विश्वास देवकाते म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेचे मुद्रांक शुल्कचे तब्बल २९० कोटी रूपये राज्य सरकारकडून येणे बाकी आहे. हा निधी तातडीने मिळाल्यास जिल्ह्यातील रखडलेली विविध कामे करता येतील. त्याचबरोबर राज्यातील सर्वच शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.

सूरज मांढरे म्हणाले, सरपंच हे पद गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे जबाबदारीने प्रत्येकाने काम करावे, तरच गावात विकासकामे होतील. यंदा सरपंच आणि ग्रामसेवक पुरस्कार देण्यास उशिर झाला आहे. दोन्ही पुरस्कार हे २०१४-१५ आणि २०१५-१६ या दोन वर्षांतील आहेत. यापुढे दरवर्षी पुरस्कार देण्याच्या दृष्टीने नियोजन करू. 

सन २०१४-१५ मधील एकूण १६, तर सन २०१५-१६ मधील १६ अशी एकूण ३२ सरपंचांचा गौरव करण्यात आला. यामध्ये तब्बल १६ महिला सरपंचांचा समावेश आहे. तसेच  सन २०१४-१५ मधील १४ आणि सन २०१५-१६ मधील १३ ग्रामसवेक असे दोन वर्षांतील एकूण २७ जणांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरवण्यात आले. संदीप कोहिणकर यांनी प्रास्ताविक, तर आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले. 

त्रिस्तरीय रचना उदध्वस्त करण्याचा डाव

राज्य सरकारचा जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत नष्ट करण्याचा डाव आहे. जनतेमधून थेट सरपंच निवड करण्याचा हा त्यांचा चाचणी आहे. यापुढे ते जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही त्रिस्तरीय रचना उदध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे मला खात्रीलायक माहित आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जबाबदारीने काम करावे, असा सल्ला अजित पवार यांनी या वेळी दिला. तसेच राज्य सरकारला सर्वच थेट हवे असेल तर मुख्यमंत्री, पंतप्रधानही थेट जनतेतून का निवडत नाही, असे आव्हान दिले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसsarpanchसरपंचMaharashtraमहाराष्ट्र